शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नागपूर जिल्ह्यातील ३१ हजारावर शेतकरी कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 23:50 IST

महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३१ हजार ४१३ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात २७२ कोटी ४६ लाख रुपये जमा झाले.

ठळक मुद्दे २७२.४६ कोटी रुपये खात्यात जमा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३१ हजार ४१३ शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात २७२ कोटी ४६ लाख रुपये जमा झाले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे जाहीर केले. दोन लाख रुपयांच्या थकबाकीदार शेतकऱ्यांनाच लाभ देण्याचे आदेश काढले. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतचे कर्जदार व ३० सप्टेंबर २०१९ मुद्दल व व्याज मिळून २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. दोन लाखांवरील कर्जदार शेतकऱ्यांना या माफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांसोबत शेतकरी संघटनाकडूनही टीका करण्यात आली. सरकारने दोन लाखांवरील शेतकऱ्यांसोबत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचे जाहीर केले आहे. कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज मागविण्यात आले नाही. बँकांकडूनच यादी घेण्यात आली.सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या असून त्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यात ४० हजार ९० शेतकरी पात्र ठरले आहेत. यातील ३४ हजार ७९० शेतकऱ्यांच्या आधार नंबरचे प्रमाणीकरण पूर्ण झाले. आतापर्यंत ३१ हजार ४१३ शेतकऱ्यांच्या खात्यात २७२ कोटी ४६ लाखांची रक्कम जमा झाल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :FarmerशेतकरीbankबँकState Governmentराज्य सरकार