शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शेतीच्या समृद्धीसाठी शेतकरी, सरकार व गुंतवणूकदार एकत्र येण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2022 20:25 IST

Nagpur News शेतकरी, सरकार आणि गुंतवणूकदार एकत्र आले तर शेतीला समृद्ध करणे शक्य आहे, असे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चाैहान यांनी ॲग्राेव्हीजन कृषिप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

ठळक मुद्देॲग्राेव्हीजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला सुरुवात

नागपूर : शेतकऱ्यांनी परंपरागत शेतीला तंत्रज्ञानाची जाेड देऊन प्रयाेगशील शेतीकडे वळण्याची आवश्यकता आहे, मात्र शेतकऱ्यांना उत्पादनाचा याेग्य लाभ मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. या कृषी उत्पादनाचे पॅकेजिंग, मार्केटिंग आणि ब्रॅन्डिंग करण्यासाठी गुंतवणूकदारांनी समाेर येणे गरजेचे आहे. अशाप्रकारे शेतकरी, सरकार आणि गुंतवणूकदार एकत्र आले तर शेतीला समृद्ध करणे शक्य आहे, असे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चाैहान यांनी ॲग्राेव्हीजन कृषिप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील ॲग्राेव्हिजनच्या राष्ट्रीय कृषिप्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी अमरावती राेडवरील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (पीडीकेव्ही) दाभा मैदानावर झाले. याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने, खा. रामदास तडस, आमदार समीर मेघे, जिल्हाधिकारी विपीन इटणकर, इंडियन ऑइलचे कार्यकारी संचालक शांतनू गुप्ता, पीडीकेव्हीचे कुलगुरू डाॅ. शरद गडाख, पशू व मत्स्य शिक्षण विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. आशिष पातूरकर, स्टेट बॅंकेचे सीजीएम शांतनू पेंडसे, आमदार प्रवीण दटके, आ. नागाे गाणार, माजी आमदार अनिल साेले, गिरीश गांधी, डाॅ. सी. डी. मायी आदी मान्यवर उपस्थित हाेते.

मुख्यमंत्री चाैहान यांनी यावेळी कृषी विकासाची पंचसूत्री सांगितली. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे, शेतीचा खर्च कमी करणे, उत्पादनाला याेग्य भाव देणे, नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानाची याेग्य भरपाई देणे आणि तंत्रज्ञानाद्वारे आधुनिक शेतीसाठी प्राेत्साहन देणे आवश्यक आहे. मध्य प्रदेशात सिंचनाच्या साेयी करून या पंचसूत्रीने कृषी विकास घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले. ४५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. गव्हाच्या उत्पादनात राज्य पंजाब, हरयाणाच्याही पुढे गेले. औषधी शेतीसह फळ, फूल, भाज्यांच्या उत्पादनात सातत्याने वाढ हाेत आहे. १० वर्षांपासून कृषी विकास दर १८ टक्क्यांवर असल्याचे त्यांनी सांगितले. चाैहान यांनी नितीन गडकरींच्या कार्याचे काैतुक केले. त्यांच्या सूचनेनुसार राज्यात साैरपंपचा वापर व इथेनाॅलचे उत्पादन सुरू केल्याचे सांगत ॲग्राेव्हीजनसारखे कृषिप्रदर्शन मध्य प्रदेशातही घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक ॲग्राेव्हीजनचे आयाेजन सचिव रवि बाेरटकर यांनी केले. रमेश मानकर यांनी आभार मानले.

अन्नदात्या शेतकऱ्याने आता ऊर्जादाता बनावे : गडकरी

नितीन गडकरी यांनी दरवर्षी आपल्या देशात १६ लाख काेटी रुपयांचे इंधन आयात केले जात असल्याचे सांगत, कृषी क्षेत्रातून हा खर्च राेखणे शक्य असल्याचे ते म्हणाले. पूर्वी प्रदूषणाचे कारण ठरलेल्या परळीपासून इथेनाॅल व बिटुमिन तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विदर्भातील भात उत्पादक जिल्ह्यात वेस्ट मटेरियलपासून सीएनजी तयार हाेत आहे. शिवाय पाण्यातून हायड्राेजन वेगळे करून ग्रीन हायड्राेजन इंधन तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. हे सर्व भविष्यात पेट्राेल, डिझेलचे पर्याय ठरणार आहेत. शेतकऱ्यांनी बाॅयाे इंधननिर्मितीत पुढाकार घ्यावा. त्यांनी अन्नदात्यापासून ऊर्जादाता बनण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :agricultureशेती