शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शेतीच्या समृद्धीसाठी शेतकरी, सरकार व गुंतवणूकदार एकत्र येण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2022 20:25 IST

Nagpur News शेतकरी, सरकार आणि गुंतवणूकदार एकत्र आले तर शेतीला समृद्ध करणे शक्य आहे, असे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चाैहान यांनी ॲग्राेव्हीजन कृषिप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

ठळक मुद्देॲग्राेव्हीजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला सुरुवात

नागपूर : शेतकऱ्यांनी परंपरागत शेतीला तंत्रज्ञानाची जाेड देऊन प्रयाेगशील शेतीकडे वळण्याची आवश्यकता आहे, मात्र शेतकऱ्यांना उत्पादनाचा याेग्य लाभ मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. या कृषी उत्पादनाचे पॅकेजिंग, मार्केटिंग आणि ब्रॅन्डिंग करण्यासाठी गुंतवणूकदारांनी समाेर येणे गरजेचे आहे. अशाप्रकारे शेतकरी, सरकार आणि गुंतवणूकदार एकत्र आले तर शेतीला समृद्ध करणे शक्य आहे, असे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चाैहान यांनी ॲग्राेव्हीजन कृषिप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील ॲग्राेव्हिजनच्या राष्ट्रीय कृषिप्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी अमरावती राेडवरील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (पीडीकेव्ही) दाभा मैदानावर झाले. याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने, खा. रामदास तडस, आमदार समीर मेघे, जिल्हाधिकारी विपीन इटणकर, इंडियन ऑइलचे कार्यकारी संचालक शांतनू गुप्ता, पीडीकेव्हीचे कुलगुरू डाॅ. शरद गडाख, पशू व मत्स्य शिक्षण विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. आशिष पातूरकर, स्टेट बॅंकेचे सीजीएम शांतनू पेंडसे, आमदार प्रवीण दटके, आ. नागाे गाणार, माजी आमदार अनिल साेले, गिरीश गांधी, डाॅ. सी. डी. मायी आदी मान्यवर उपस्थित हाेते.

मुख्यमंत्री चाैहान यांनी यावेळी कृषी विकासाची पंचसूत्री सांगितली. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे, शेतीचा खर्च कमी करणे, उत्पादनाला याेग्य भाव देणे, नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानाची याेग्य भरपाई देणे आणि तंत्रज्ञानाद्वारे आधुनिक शेतीसाठी प्राेत्साहन देणे आवश्यक आहे. मध्य प्रदेशात सिंचनाच्या साेयी करून या पंचसूत्रीने कृषी विकास घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले. ४५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. गव्हाच्या उत्पादनात राज्य पंजाब, हरयाणाच्याही पुढे गेले. औषधी शेतीसह फळ, फूल, भाज्यांच्या उत्पादनात सातत्याने वाढ हाेत आहे. १० वर्षांपासून कृषी विकास दर १८ टक्क्यांवर असल्याचे त्यांनी सांगितले. चाैहान यांनी नितीन गडकरींच्या कार्याचे काैतुक केले. त्यांच्या सूचनेनुसार राज्यात साैरपंपचा वापर व इथेनाॅलचे उत्पादन सुरू केल्याचे सांगत ॲग्राेव्हीजनसारखे कृषिप्रदर्शन मध्य प्रदेशातही घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविक ॲग्राेव्हीजनचे आयाेजन सचिव रवि बाेरटकर यांनी केले. रमेश मानकर यांनी आभार मानले.

अन्नदात्या शेतकऱ्याने आता ऊर्जादाता बनावे : गडकरी

नितीन गडकरी यांनी दरवर्षी आपल्या देशात १६ लाख काेटी रुपयांचे इंधन आयात केले जात असल्याचे सांगत, कृषी क्षेत्रातून हा खर्च राेखणे शक्य असल्याचे ते म्हणाले. पूर्वी प्रदूषणाचे कारण ठरलेल्या परळीपासून इथेनाॅल व बिटुमिन तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विदर्भातील भात उत्पादक जिल्ह्यात वेस्ट मटेरियलपासून सीएनजी तयार हाेत आहे. शिवाय पाण्यातून हायड्राेजन वेगळे करून ग्रीन हायड्राेजन इंधन तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. हे सर्व भविष्यात पेट्राेल, डिझेलचे पर्याय ठरणार आहेत. शेतकऱ्यांनी बाॅयाे इंधननिर्मितीत पुढाकार घ्यावा. त्यांनी अन्नदात्यापासून ऊर्जादाता बनण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :agricultureशेती