शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

कळमन्यात शेतकऱ्यांचा माल विक्रीविना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 00:47 IST

अनेक दिवसानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता सुरू झालेल्या कळमना भाजी बाजारात शेतकऱ्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त भाजीपाला विक्रीविना परत गेल्याचा आरोप कळमना सब्जी बाजार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला.

ठळक मुद्देसमितीच्या मनमानीचा असोसिएशनचा आरोप : वेळेची मर्यादा, गाड्या आत सोडल्या नाहीत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अनेक दिवसानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता सुरू झालेल्या कळमना भाजी बाजारात शेतकऱ्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त भाजीपाला विक्रीविना परत गेल्याचा आरोप कळमना सब्जी बाजार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला. याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमानी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, दुचाकींना मार्केट परिसरात प्रवेश करण्यास मनाई होती. शिवाय किरकोळ विक्रेत्यांच्या ३०० तीनचाकी वाहनांना मार्केटमध्ये प्रवेशाला परवानगी होती. पण समितीच्या कर्मचाऱ्यांनी कळमन्याच्या चिखली गेटवर बॅरिकेट्स लावून केवळ ६० ते ७० तीनचाकी आत सोडल्या. किरकोळ विक्रेत्यांना खरेदीसाठी आत न सोडल्याने शेतकऱ्यांचा माल विक्रीविना पडून राहिला. सकाळी ७ वाजता समितीचे कर्मचारी आणि पोलिसांनी बाजार बंद केला. अखेर शेतकऱ्यांना भाज्या गाड्यांमध्ये भरून खुल्या बाजारात विक्रीसाठी न्याव्या लागल्या. कळमन्यात भाजीपाला विक्रीसाठी आणण्याऐवजी खुल्या बाजारातच विक्री केली असती तर बरे झाले असते, अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या, असे गौर म्हणाले.कळमना भाजी बाजार सुरू करताना समितीने बाजाराला तीन परिसरात विभागले असून २०५ अडतियांपैकी एका दिवशी ५० अडतियांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली. खरे पाहता चिखली प्रवेशद्वारापासून भाजी बाजाराचे अंतर अर्धा किमी तर न्यू ग्रेन मार्केटमधील दुसºया बाजाराचे अंतर पाऊण किमी आहे. अनेक किरकोळ विक्रेत्यांना गेटबाहेर गाड्या ठेवून बाजारात पायी जाण्यास सांगितले. त्यामुळे अनेकजण बाजारात गेलेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची विक्री झाली नाही. समितीने एका अडतियाला दोन गाड्यांमधील भाज्या विकण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक गाड्या गेटबाहेरून परत पाठविण्यात आल्या. या सर्व घडामोडींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. समितीने योग्यरीत्या नियोजन केल्यास शेतकऱ्यांचा पूर्ण माल विकला जाईल आणि त्यांना आर्थिक फटका बसणार नाही, असे गौर म्हणाले. तीन बाजारात विभागल्या गेलेल्या बाजारापैकी न्यू ग्रेन मार्केटमध्ये पाच अडतियांनी विक्रीसाठी बोलविलेल्या भाज्या विकल्याच नाही. ग्राहक या भागात फिरकलेच नाही. कळमना भाजी बाजाराची वेळ रात्री १ ते सकाळी ७ ऐवजी ९ वाजेपर्यंत वाढवावी, असे गौर म्हणाले.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्याMarketबाजार