शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

कळमन्यात शेतकऱ्यांचा माल विक्रीविना परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 00:47 IST

अनेक दिवसानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता सुरू झालेल्या कळमना भाजी बाजारात शेतकऱ्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त भाजीपाला विक्रीविना परत गेल्याचा आरोप कळमना सब्जी बाजार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला.

ठळक मुद्देसमितीच्या मनमानीचा असोसिएशनचा आरोप : वेळेची मर्यादा, गाड्या आत सोडल्या नाहीत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अनेक दिवसानंतर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजता सुरू झालेल्या कळमना भाजी बाजारात शेतकऱ्यांचा अर्ध्यापेक्षा जास्त भाजीपाला विक्रीविना परत गेल्याचा आरोप कळमना सब्जी बाजार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना केला. याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मनमानी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला.असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर गौर म्हणाले, दुचाकींना मार्केट परिसरात प्रवेश करण्यास मनाई होती. शिवाय किरकोळ विक्रेत्यांच्या ३०० तीनचाकी वाहनांना मार्केटमध्ये प्रवेशाला परवानगी होती. पण समितीच्या कर्मचाऱ्यांनी कळमन्याच्या चिखली गेटवर बॅरिकेट्स लावून केवळ ६० ते ७० तीनचाकी आत सोडल्या. किरकोळ विक्रेत्यांना खरेदीसाठी आत न सोडल्याने शेतकऱ्यांचा माल विक्रीविना पडून राहिला. सकाळी ७ वाजता समितीचे कर्मचारी आणि पोलिसांनी बाजार बंद केला. अखेर शेतकऱ्यांना भाज्या गाड्यांमध्ये भरून खुल्या बाजारात विक्रीसाठी न्याव्या लागल्या. कळमन्यात भाजीपाला विक्रीसाठी आणण्याऐवजी खुल्या बाजारातच विक्री केली असती तर बरे झाले असते, अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया होत्या, असे गौर म्हणाले.कळमना भाजी बाजार सुरू करताना समितीने बाजाराला तीन परिसरात विभागले असून २०५ अडतियांपैकी एका दिवशी ५० अडतियांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली. खरे पाहता चिखली प्रवेशद्वारापासून भाजी बाजाराचे अंतर अर्धा किमी तर न्यू ग्रेन मार्केटमधील दुसºया बाजाराचे अंतर पाऊण किमी आहे. अनेक किरकोळ विक्रेत्यांना गेटबाहेर गाड्या ठेवून बाजारात पायी जाण्यास सांगितले. त्यामुळे अनेकजण बाजारात गेलेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची विक्री झाली नाही. समितीने एका अडतियाला दोन गाड्यांमधील भाज्या विकण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक गाड्या गेटबाहेरून परत पाठविण्यात आल्या. या सर्व घडामोडींमुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला. समितीने योग्यरीत्या नियोजन केल्यास शेतकऱ्यांचा पूर्ण माल विकला जाईल आणि त्यांना आर्थिक फटका बसणार नाही, असे गौर म्हणाले. तीन बाजारात विभागल्या गेलेल्या बाजारापैकी न्यू ग्रेन मार्केटमध्ये पाच अडतियांनी विक्रीसाठी बोलविलेल्या भाज्या विकल्याच नाही. ग्राहक या भागात फिरकलेच नाही. कळमना भाजी बाजाराची वेळ रात्री १ ते सकाळी ७ ऐवजी ९ वाजेपर्यंत वाढवावी, असे गौर म्हणाले.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्याMarketबाजार