शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

शेतकऱ्यांची मागणी ठाम ; हळदीसाठी वायदे बाजार आवश्यकच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 15:12 IST

Nagpur : भविष्यातील दर कळणार नसल्याने शेतकरी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वायदे बाजारातील 'एनसीडीईएक्स'च्या निझामाबाद येथील हळद भेसळ प्रकरणात काही व्यापाऱ्यांनी हळदीचे वायदे बंद करण्याची मागणी केली आहे. वायदे बंद केल्यास हळदीची मूल्य पडताळणी (प्राइस डिस्कव्हरी) संपुष्टात येणार आहे. भविष्यातील दर (फ्यूचर रेट) कळणार नसल्याने शेतकरीदेखील संकटात सापडणार असल्याने हळदीला वायदे बाजाराचे कवच असणे अनिवार्य आहे. एनसीडीईएक्सच्या प्राइस अॅडव्हायझरी कमिटीच्या सदस्यांनी नुकतीच निझामाबाद येथील त्यांच्या गोदामात व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या हळदीची तपासणी केली. काही पोत्यांमधील हळदीत भेसळ झाल्याचे निदर्शनास येताच त्यांची तातडीचे चौकशी सुरू केली. सांगली जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी याचे भांडवल करीत हळदीच्या वायद्यांवर बंदी घालण्याची मागणी केली. 

या मागणीला शेतकरी उत्पादक कंपन्या व हळद उत्पादकांसोबत गुंतवणूकदार व अनेक व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला असून, वायदे सुरू ठेवण्याची मागणी रेटून धरली आहे, सध्या पाच ते सात टक्के हळद शेतकऱ्यांकडे शिल्लक असून, किमान १० टक्के हळद व्यापाऱ्यांकडे आहे. त्यांनी ती १० गोदामात व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या हळदीची तपासणी केली. काही पोत्यांमधील हळदीत भेसळ झाल्याचे निदर्शनास येताच त्यांची तातडीचे चौकशी सुरू केली. सांगली जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी याचे भांडवल करीत हळदीच्या वायद्यांवर बंदी घालण्याची मागणी केली. या मागणीला शेतकरी उत्पादक कंपन्या व हळद उत्पादकांसोबत गुंतवणूकदार व अनेक व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला असून, वायदे सुरू ठेवण्याची मागणी रेटून धरली आहे. सध्या पाच ते सात टक्के हळद शेतकऱ्यांकडे शिल्लक असून, किमान १० टक्के हळद व्यापाऱ्यांकडे आहे. त्यांनी ती १० ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करून गोदामांमध्ये ठेवली आहे. चांगला दर मिळाल्याने यावर्षी महाराष्ट्रासोबतच देशात हळदीचे पेरणी क्षेत्र वाढल्याने उत्पादनही वाढणार आहे.

कुणाचे नुकसान, कुणाचा फायदा?

  • वायद्यांवर बंदी घातल्यास हळदीची प्राइस डिस्कव्हरी संपुष्टात येऊन शेतकरी, गुंतवणूकदार, प्रक्रियादार, इतर व्यापारी व निर्यातदारांना फ्यूचर रेट कळणार नाही. त्यांना दराबाबत अंदाज बांधणे कठीण जाईल. ते त्यांचे दरावरील नियंत्रण गमावणार असल्याने या सर्वांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
  • मोजकेच व्यापारी हळदीचे दर नियंत्रणात ठेवतील. ते शेतकऱ्यांकडून कमी दरात हळद खरेदी करीत प्रक्रियादारांना चढ्या दराने विकणार असल्याने त्यांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

एप्रिलचे दर ऑक्टोबरमध्येमे २०२५ मध्ये सुरू झालेले वायद्यांची मुदत २० ऑगस्ट २०२५ ला संपली आहे. १ ऑक्टोबर २०२५ ला एप्रिल २०२६ चे वायदे सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच एप्रिल २०२६ मधील हळदीचे दर ऑक्टोबर २०२५ मध्येच कळणार आहेत. ते वायदे खुले करू नका, अशी मागणी हे व्यापारी करीत असल्याने ते इतरांचा दर निर्णय अधिकार हिरावून घेत आहेत.

सात शेतमालावर बंदीतुरीच्या वायद्यांवर मागील १४ वर्षांपासून बंदी घातली आहे. २० डिसेंबर २०२१ पासून सोयाबीन व सोया कॉम्प्लेक्स, मोहरी व मोहरी कॉम्प्लेक्स त्यानंतर हरभरा, गहू, मूग, बिगर बासमती तांदूळ व कच्च्या पामतेलाच्या वायद्यांवर ३१ मार्च २०२६ पर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे या शेतमालाचे दर वर्षभर दबावात राहण्याचे प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरfarmingशेती