शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची मागणी ठाम ; हळदीसाठी वायदे बाजार आवश्यकच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 15:12 IST

Nagpur : भविष्यातील दर कळणार नसल्याने शेतकरी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वायदे बाजारातील 'एनसीडीईएक्स'च्या निझामाबाद येथील हळद भेसळ प्रकरणात काही व्यापाऱ्यांनी हळदीचे वायदे बंद करण्याची मागणी केली आहे. वायदे बंद केल्यास हळदीची मूल्य पडताळणी (प्राइस डिस्कव्हरी) संपुष्टात येणार आहे. भविष्यातील दर (फ्यूचर रेट) कळणार नसल्याने शेतकरीदेखील संकटात सापडणार असल्याने हळदीला वायदे बाजाराचे कवच असणे अनिवार्य आहे. एनसीडीईएक्सच्या प्राइस अॅडव्हायझरी कमिटीच्या सदस्यांनी नुकतीच निझामाबाद येथील त्यांच्या गोदामात व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या हळदीची तपासणी केली. काही पोत्यांमधील हळदीत भेसळ झाल्याचे निदर्शनास येताच त्यांची तातडीचे चौकशी सुरू केली. सांगली जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी याचे भांडवल करीत हळदीच्या वायद्यांवर बंदी घालण्याची मागणी केली. 

या मागणीला शेतकरी उत्पादक कंपन्या व हळद उत्पादकांसोबत गुंतवणूकदार व अनेक व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला असून, वायदे सुरू ठेवण्याची मागणी रेटून धरली आहे, सध्या पाच ते सात टक्के हळद शेतकऱ्यांकडे शिल्लक असून, किमान १० टक्के हळद व्यापाऱ्यांकडे आहे. त्यांनी ती १० गोदामात व्यापाऱ्यांनी ठेवलेल्या हळदीची तपासणी केली. काही पोत्यांमधील हळदीत भेसळ झाल्याचे निदर्शनास येताच त्यांची तातडीचे चौकशी सुरू केली. सांगली जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी याचे भांडवल करीत हळदीच्या वायद्यांवर बंदी घालण्याची मागणी केली. या मागणीला शेतकरी उत्पादक कंपन्या व हळद उत्पादकांसोबत गुंतवणूकदार व अनेक व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला असून, वायदे सुरू ठेवण्याची मागणी रेटून धरली आहे. सध्या पाच ते सात टक्के हळद शेतकऱ्यांकडे शिल्लक असून, किमान १० टक्के हळद व्यापाऱ्यांकडे आहे. त्यांनी ती १० ते १५ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करून गोदामांमध्ये ठेवली आहे. चांगला दर मिळाल्याने यावर्षी महाराष्ट्रासोबतच देशात हळदीचे पेरणी क्षेत्र वाढल्याने उत्पादनही वाढणार आहे.

कुणाचे नुकसान, कुणाचा फायदा?

  • वायद्यांवर बंदी घातल्यास हळदीची प्राइस डिस्कव्हरी संपुष्टात येऊन शेतकरी, गुंतवणूकदार, प्रक्रियादार, इतर व्यापारी व निर्यातदारांना फ्यूचर रेट कळणार नाही. त्यांना दराबाबत अंदाज बांधणे कठीण जाईल. ते त्यांचे दरावरील नियंत्रण गमावणार असल्याने या सर्वांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
  • मोजकेच व्यापारी हळदीचे दर नियंत्रणात ठेवतील. ते शेतकऱ्यांकडून कमी दरात हळद खरेदी करीत प्रक्रियादारांना चढ्या दराने विकणार असल्याने त्यांचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.

एप्रिलचे दर ऑक्टोबरमध्येमे २०२५ मध्ये सुरू झालेले वायद्यांची मुदत २० ऑगस्ट २०२५ ला संपली आहे. १ ऑक्टोबर २०२५ ला एप्रिल २०२६ चे वायदे सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच एप्रिल २०२६ मधील हळदीचे दर ऑक्टोबर २०२५ मध्येच कळणार आहेत. ते वायदे खुले करू नका, अशी मागणी हे व्यापारी करीत असल्याने ते इतरांचा दर निर्णय अधिकार हिरावून घेत आहेत.

सात शेतमालावर बंदीतुरीच्या वायद्यांवर मागील १४ वर्षांपासून बंदी घातली आहे. २० डिसेंबर २०२१ पासून सोयाबीन व सोया कॉम्प्लेक्स, मोहरी व मोहरी कॉम्प्लेक्स त्यानंतर हरभरा, गहू, मूग, बिगर बासमती तांदूळ व कच्च्या पामतेलाच्या वायद्यांवर ३१ मार्च २०२६ पर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे या शेतमालाचे दर वर्षभर दबावात राहण्याचे प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरfarmingशेती