शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

नको पाहणी, नको मोबदला फक्त हवा सात बारा कोरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 10:58 IST

भिवापूर : तालुक्यात तब्बल चारवेळा अतिवृष्टी झाली. त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला.

ठळक मुद्देकेंद्रीय पथकाच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांची नाराजी१५ हजार हेक्टरमध्ये नुकसान२३ हजारावर शेतकऱ्यांना बसला फटका

शरद मिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तालुक्यात तब्बल चारवेळा अतिवृष्टी झाली. त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला. पाहणी, सर्वे, पंचनाम्यापुढे प्रशासनाचे घोडे सरकले नाही. शेतकरी कर्जाची परतफेड करण्याच्या विवंचनेत असताना केंद्राचे विशेष पाहणी पथक सोमवारी तालुक्यात पोहोचले. मोबाईलच्या प्रकाशात फक्त दोन शेतांची पाहणी केली. अंधारात नुकसान दिसले कसे हे त्यांचे त्यांनाच माहीत. मात्र आता पाहणी नको, मोबदला नको सातबारा कोरा करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे तालुक्यातील १५ हजार ५९८.९ हेक्टर मधील शेतपिकांचे नुकसान झाले. याचा २३ हजार २३५ शेतकऱ्यांना फटका बसला. त्यानंतर परतीच्या पावसाने १,०६६ हेक्टर शेतातील धान आडवे झाले. तालुक्यात धानाची लागवड २ हजार ९५४ हेक्टर, सोयाबीन १८ हजार २६३ हेक्टर, कापूस १५ हजार १३३ हेक्टर मिरची ९२६ हेक्टर, ऊस ३१.५० हेक्टर, हळद १४५.५० हेक्टर, भाजीपाला व इतर ५६४ हेक्टर अशी एकूण ३९ हजार ५८२ हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची लागवड करण्यात आली होती. निसर्गाच्या चक्रव्यूहात ही पिके उभी होत असताना २ व ३ ऑगस्टच्या पावसाने तालुक्यातील ४ हजार २८८ शेतकऱ्यांच्या २ हजार ९१९.३१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. ६ व ७ सप्टेंबरच्या पावसात १७ हजार ८८१ शेतकऱ्यांच्या १२ हजार २४१.५९ हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाले. यात सोयाबीन व मिरचीचा प्रामुख्याने समावेश होता. नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. अशात शेतकऱ्यांच्या आशा धान पिकावर होत्या. दरम्यान ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले. उभे धान आडवे झाले. शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.सोमवारी नुकसानीची पाहणी करण्याकरिता अंधारात आलेले केंद्राचे पथक शेतात मोबाईलचा उजेड पाडून चालते झाले. त्यामुळे आता पाहणी किंवा तुटपुंज्या मदतीचे केवळ सोपस्कार पार न पाडता शेतकऱ्यांना पूर्णत: कर्जमुक्त करा त्यांचा सात बारा कोरा करा अशी मागणी सेलोटी येथील सुजित अवचट, मांगली येथील नितेश राऊत, भिवापूर येथील संजय बोराडे आदी शेतकऱ्यांनी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे रात्रकालीन केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्याबाबत शेतकऱ्यांनी नाराजीचे सूर आळवले आहे.

‘शंभरीपार’अतिवृष्टीमंडळनिहाय पावसाच्या नोंदी बघितल्यास प्रत्येक मंडळात अनेकदा अतिवृष्टी झाली आहे. ताालुक्याच्या सरासरी नोंदीमध्ये ७ जुलै १५२.६३ मि.मी. ३ व १४ ऑगस्ट रोजी अनुक्रमे १५७.९३ मि.मी. व ७७.३५ मि.मी., १ सप्टेंबर रोजी १३५.७५ मि.मी पाऊस अशी अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने संपूर्ण तालुक्यासह विशेषत: चिखली, रोहणा, वडध, नक्षी, महालगाव, चिखलापार ही गावे बिथरल्या गेलीत.

नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता केंद्रीय पथक सोमवारी आले होते. तालुक्यात १०६६ शेतकºयांचे एकूण ३९८ हेक्टरमधील धान पिकाचे नुकसान झाले. त्यासाठी हेक्टरी आठ हजार रुपयाप्रमाणे पहिल्या टप्प्यात आठ लाख रुपये प्राप्त झाले आहे. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या टप्प्यानुसार गावनिहाय नुकसान भरपाईची रक्कम वितरण करण्यात येईल.- अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार,भिवापूर

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती