शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

नको पाहणी, नको मोबदला फक्त हवा सात बारा कोरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 10:58 IST

भिवापूर : तालुक्यात तब्बल चारवेळा अतिवृष्टी झाली. त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला.

ठळक मुद्देकेंद्रीय पथकाच्या दौऱ्यावर शेतकऱ्यांची नाराजी१५ हजार हेक्टरमध्ये नुकसान२३ हजारावर शेतकऱ्यांना बसला फटका

शरद मिरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तालुक्यात तब्बल चारवेळा अतिवृष्टी झाली. त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला. पाहणी, सर्वे, पंचनाम्यापुढे प्रशासनाचे घोडे सरकले नाही. शेतकरी कर्जाची परतफेड करण्याच्या विवंचनेत असताना केंद्राचे विशेष पाहणी पथक सोमवारी तालुक्यात पोहोचले. मोबाईलच्या प्रकाशात फक्त दोन शेतांची पाहणी केली. अंधारात नुकसान दिसले कसे हे त्यांचे त्यांनाच माहीत. मात्र आता पाहणी नको, मोबदला नको सातबारा कोरा करा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे तालुक्यातील १५ हजार ५९८.९ हेक्टर मधील शेतपिकांचे नुकसान झाले. याचा २३ हजार २३५ शेतकऱ्यांना फटका बसला. त्यानंतर परतीच्या पावसाने १,०६६ हेक्टर शेतातील धान आडवे झाले. तालुक्यात धानाची लागवड २ हजार ९५४ हेक्टर, सोयाबीन १८ हजार २६३ हेक्टर, कापूस १५ हजार १३३ हेक्टर मिरची ९२६ हेक्टर, ऊस ३१.५० हेक्टर, हळद १४५.५० हेक्टर, भाजीपाला व इतर ५६४ हेक्टर अशी एकूण ३९ हजार ५८२ हेक्टर क्षेत्रात विविध पिकांची लागवड करण्यात आली होती. निसर्गाच्या चक्रव्यूहात ही पिके उभी होत असताना २ व ३ ऑगस्टच्या पावसाने तालुक्यातील ४ हजार २८८ शेतकऱ्यांच्या २ हजार ९१९.३१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. ६ व ७ सप्टेंबरच्या पावसात १७ हजार ८८१ शेतकऱ्यांच्या १२ हजार २४१.५९ हेक्टर मधील पिकांचे नुकसान झाले. यात सोयाबीन व मिरचीचा प्रामुख्याने समावेश होता. नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला. अशात शेतकऱ्यांच्या आशा धान पिकावर होत्या. दरम्यान ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते केले. उभे धान आडवे झाले. शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.सोमवारी नुकसानीची पाहणी करण्याकरिता अंधारात आलेले केंद्राचे पथक शेतात मोबाईलचा उजेड पाडून चालते झाले. त्यामुळे आता पाहणी किंवा तुटपुंज्या मदतीचे केवळ सोपस्कार पार न पाडता शेतकऱ्यांना पूर्णत: कर्जमुक्त करा त्यांचा सात बारा कोरा करा अशी मागणी सेलोटी येथील सुजित अवचट, मांगली येथील नितेश राऊत, भिवापूर येथील संजय बोराडे आदी शेतकऱ्यांनी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे रात्रकालीन केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्याबाबत शेतकऱ्यांनी नाराजीचे सूर आळवले आहे.

‘शंभरीपार’अतिवृष्टीमंडळनिहाय पावसाच्या नोंदी बघितल्यास प्रत्येक मंडळात अनेकदा अतिवृष्टी झाली आहे. ताालुक्याच्या सरासरी नोंदीमध्ये ७ जुलै १५२.६३ मि.मी. ३ व १४ ऑगस्ट रोजी अनुक्रमे १५७.९३ मि.मी. व ७७.३५ मि.मी., १ सप्टेंबर रोजी १३५.७५ मि.मी पाऊस अशी अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने संपूर्ण तालुक्यासह विशेषत: चिखली, रोहणा, वडध, नक्षी, महालगाव, चिखलापार ही गावे बिथरल्या गेलीत.

नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता केंद्रीय पथक सोमवारी आले होते. तालुक्यात १०६६ शेतकºयांचे एकूण ३९८ हेक्टरमधील धान पिकाचे नुकसान झाले. त्यासाठी हेक्टरी आठ हजार रुपयाप्रमाणे पहिल्या टप्प्यात आठ लाख रुपये प्राप्त झाले आहे. शासनाकडून प्राप्त होणाऱ्या टप्प्यानुसार गावनिहाय नुकसान भरपाईची रक्कम वितरण करण्यात येईल.- अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार,भिवापूर

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती