शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

शेतकरी कर्जमाफी प्रकरण : सहकार प्रधान सचिवांना अवमानना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 19:54 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील प्रकरणामध्ये सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, सहकार आयुक्त व निबंधक सतीश सोनी, अकोला जिल्हाधिकारी आस्तिक पांडे आणि जिल्हा सहकार उपनिबंधक गोपाल मालवे यांना अवमानना नोटीस बजावली.

ठळक मुद्देहायकोर्ट : आदेशाचे पालन केले नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील प्रकरणामध्ये सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, सहकार आयुक्त व निबंधक सतीश सोनी, अकोला जिल्हाधिकारी आस्तिक पांडे आणि जिल्हा सहकार उपनिबंधक गोपाल मालवे यांना अवमानना नोटीस बजावली.लायसन्सधारक सावकारांनी स्वत:च्या अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन कर्ज दिले अशा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी अपात्र ठरवता येणार नाही. त्यामुळे अशा प्रत्येक शेतकऱ्याची प्रकरणे स्वतंत्ररीत्या तपासून त्यावर कायद्यानुसार निर्णय घेण्यात यावा असे आदेश उच्च न्यायालयाने २० सप्टेंबर २०१७ रोजी सावकारग्रस्त शेतकरी समितीचे अध्यक्ष अरुण इंगळे यांची जनहित याचिका निकाली काढताना दिले होते. त्या आदेशाचे पालन झाले नाही असा दावा करून इंगळे यांनी उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता वरील अधिकाऱ्यांना अवमानना नोटीस बजावून यावर येत्या ५ डिसेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले.राज्य सरकारने २०१५ मध्ये शेतकरी कर्जमाफी घोषित करून त्यासंदर्भात १० एप्रिल २०१५ रोजी निर्णय जारी केला होता. त्या निर्णयाचा लाभ देण्यासाठी विविध अटी निर्धारित करण्यात आल्या होत्या. बँकांसह लायसन्सधारक सावकाराकडून कर्ज घेणारे शेतकरीही त्या निर्णयाचा लाभ मिळण्यासाठी पात्र होते. परंतु, ते शेतकरी कर्जदात्या सावकाराच्या लायसन्स क्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक होते. निर्णयातील अट क्र. ३ मध्ये ही तरतूद होती. परिणामी, या तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या म्हणजे, सावकारांनी अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन कर्ज दिले अशा अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीसाठी अपात्र ठरविण्यात आले. उच्च न्यायालयाने जनहित याचिकेमध्ये दिलेल्या आदेशानंतर अकोला तालुक्यातील अशा काही शेतकऱ्यांनी ११ जानेवारी २०१८ रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिवांकडे निवेदन सादर करून कर्जमाफीचे दावे तपासण्याची विनंती केली होती. त्यानंतर जिल्हा सहकार उपनिबंधकांनी १७ एप्रिल २०१८ रोजी निवेदनकर्त्या शेतकऱ्यांना पत्र पाठवून ते कर्जमाफीसाठी अपात्र असल्याचे कळविले. परंतु, त्यासंदर्भात अद्याप आदेश जारी करण्यात आला नाही. या कृतीमुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला असा दावा अवमानना याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. विपुल भिसे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयFarmerशेतकरी