शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
2
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
3
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
4
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
5
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
6
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
7
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
8
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
9
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
10
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
11
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
12
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
13
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
14
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
15
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
16
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
17
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
18
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
19
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
20
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?

शेतकरी कर्जमाफी प्रकरण : सहकार प्रधान सचिवांना अवमानना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 19:54 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील प्रकरणामध्ये सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, सहकार आयुक्त व निबंधक सतीश सोनी, अकोला जिल्हाधिकारी आस्तिक पांडे आणि जिल्हा सहकार उपनिबंधक गोपाल मालवे यांना अवमानना नोटीस बजावली.

ठळक मुद्देहायकोर्ट : आदेशाचे पालन केले नसल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील प्रकरणामध्ये सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, सहकार आयुक्त व निबंधक सतीश सोनी, अकोला जिल्हाधिकारी आस्तिक पांडे आणि जिल्हा सहकार उपनिबंधक गोपाल मालवे यांना अवमानना नोटीस बजावली.लायसन्सधारक सावकारांनी स्वत:च्या अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन कर्ज दिले अशा शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी अपात्र ठरवता येणार नाही. त्यामुळे अशा प्रत्येक शेतकऱ्याची प्रकरणे स्वतंत्ररीत्या तपासून त्यावर कायद्यानुसार निर्णय घेण्यात यावा असे आदेश उच्च न्यायालयाने २० सप्टेंबर २०१७ रोजी सावकारग्रस्त शेतकरी समितीचे अध्यक्ष अरुण इंगळे यांची जनहित याचिका निकाली काढताना दिले होते. त्या आदेशाचे पालन झाले नाही असा दावा करून इंगळे यांनी उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता वरील अधिकाऱ्यांना अवमानना नोटीस बजावून यावर येत्या ५ डिसेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले.राज्य सरकारने २०१५ मध्ये शेतकरी कर्जमाफी घोषित करून त्यासंदर्भात १० एप्रिल २०१५ रोजी निर्णय जारी केला होता. त्या निर्णयाचा लाभ देण्यासाठी विविध अटी निर्धारित करण्यात आल्या होत्या. बँकांसह लायसन्सधारक सावकाराकडून कर्ज घेणारे शेतकरीही त्या निर्णयाचा लाभ मिळण्यासाठी पात्र होते. परंतु, ते शेतकरी कर्जदात्या सावकाराच्या लायसन्स क्षेत्रातील रहिवासी असणे आवश्यक होते. निर्णयातील अट क्र. ३ मध्ये ही तरतूद होती. परिणामी, या तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या म्हणजे, सावकारांनी अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन कर्ज दिले अशा अनेक शेतकऱ्यांना या कर्जमाफीसाठी अपात्र ठरविण्यात आले. उच्च न्यायालयाने जनहित याचिकेमध्ये दिलेल्या आदेशानंतर अकोला तालुक्यातील अशा काही शेतकऱ्यांनी ११ जानेवारी २०१८ रोजी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिवांकडे निवेदन सादर करून कर्जमाफीचे दावे तपासण्याची विनंती केली होती. त्यानंतर जिल्हा सहकार उपनिबंधकांनी १७ एप्रिल २०१८ रोजी निवेदनकर्त्या शेतकऱ्यांना पत्र पाठवून ते कर्जमाफीसाठी अपात्र असल्याचे कळविले. परंतु, त्यासंदर्भात अद्याप आदेश जारी करण्यात आला नाही. या कृतीमुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला असा दावा अवमानना याचिकेत करण्यात आला आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. विपुल भिसे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयFarmerशेतकरी