शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

सडलेला शेतमाल घेऊन शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 23:29 IST

जिल्ह्यातील शेतमालाची अवस्था व शेतकऱ्यांच्या वेदना प्रशासकीय प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडण्यासाठी सडलेला माल जिल्हाधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी बुधवारी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

ठळक मुद्देपोलिसांनी केली धरपकड : आंदोलक संतप्त, सडलेली संत्री फेकली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटपुढे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस, धान, भाजीपाल्यासह संत्रा, मोसंबीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले. लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी, याच्या प्रतीक्षेत सध्या शेतकरी आहेत. मात्र प्रशासकीय यंत्रणा अजूनही शेतापर्यंत पोहचली नाही. जिल्ह्यातील शेतमालाची अवस्था व शेतकऱ्यांच्या वेदना प्रशासकीय प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडण्यासाठी सडलेला माल जिल्हाधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी बुधवारी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. परंतु पोलिसांनी केलेल्या धरपकडीमुळे आंदोलक चांगलेच संतापले. सडलेली संत्री जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटपुढे फेकून पोलीस व जिल्हा प्रशासनाचा तीव्र निषेध आंदोलकांनी केला.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते. आकाशवाणी चौकात कळमेश्वर, काटोल, सावनेर भागातून शेतकरी सडलेल्या पऱ्हाट्या, सोयाबीन, संत्री, मोसंबी घेऊन आले होते. शेतमालाची ही अवस्था आणि शेतकऱ्यांची वेदना प्रशासनापर्यंत पोहचविण्यासाठी आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. परंतु ताबडतोब पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या धरपकडीमुळे आंदोलक चांगलेच संतप्त झाले. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देऊ लागले. काही आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा आग्रह धरला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटपुढेच ठिय्या मांडला. यावेळी कळमेश्वरहून एका शेतकऱ्याने आणलेली पोतीभर सडलेली संत्री कार्यालयाच्या गेटपुढे फेकली. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आंदोलकांचा आग्रह होता. दरम्यान पोलिसांशी आंदोलकांची तू तू मै मै सुद्धा झाली. अखेर पोलिसांनी पाच लोकांच्या शिष्टमंडळाला भेटण्याची सूट दिली. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. दरम्यान पोलिसांनी राम नेवले, मुकेश मासूरकर, सुनील वडस्कर, वृषभ वानखेडे, वसंतराव वैद्य, प्रभाकर बेले, मोहन पाटोडे, विजय मौंदेकर, डॉ. पुखराज रेवतकर, विनायक खोरगडे, मोहन पाटोडे, भय्यालाल माकडे यांना अटक केली. आंदोलनात प्रीती देडमुठे, राजाभय्या, शेखर काकडे, अण्णाजी राजेदर, मुरलीधर ठाकरे, धर्मराज रेवतकर, पुंडलिक हरणे, रामदास राऊत, गुलाबराव धांडे, अशोक नेवले, श्रीराम अंबाडकर, पुरुषोत्तम हगवणे, नरेश निमजे, अनिल केशरवाणी, गणेश गंधेवार, नंदू पेरकर, भारत बावीसटाले, रमेश कन्नमवार, वसंतकुमार चौरसिया, योगेश कानोरकर, मोरेश्वर गौर आदी सहभागी झाले होते.आम्ही जिल्हाधिकाऱ्यांपुढे नुकसान भरपाई लवकर मिळावी, अशी मागणी करण्यासाठी आलो होतो, परंतु पोलिसांनी दडपशाही केली. शेतकऱ्यांवर एवढा कठीण प्रसंग आला असतानाही जिल्हाधिकाऱ्यांपर्र्यंत वेदना मांडण्यासाठी पोलिसांनी जाऊ दिले नाही. हे सरकार शेतकरीविरोधी आहे, हे स्पष्ट झाले आहे. नुकसान झाल्यानंतर सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्र्यांच्या संगीत खुर्चीमध्ये सर्व व्यस्त असून, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.राम नेवले, संयोजक, विदर्भ राज्य आंदोलन समिती.आंदोलकांच्या मागण्याप्रशासनाला पंचनामे करण्यासाठी एक महिना लागणार असल्याने, उपग्रह अथवा नवीन तंत्रज्ञानाद्वारे ताबडतोब पिकांचे सर्वेक्षण करावे.कापूस, सोयाबीन, धान, भाजीपाला पिकाला ३० हजार प्रति एकर आणि संत्रा व मोसंबी पिकाला ५० हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई द्यावी.शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जातून व वीज बिलातून मुक्त करावे.हमीभावाचे खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे.रब्बीच्या पेरणीसाठी त्वरित नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन