शहरं
Join us  
Trending Stories
1
आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी, निवडणुकांची चाचपणी
2
पाकिस्तानच्या थाळीतून टोमॅटो गायब! लाहोर, कराचीत महागाईचा भडका; अफगाणिस्तानने शिकवला 'हा' धडा
3
ट्रम्प-पुतिन भेट रद्द; व्हाईट हाऊसने फेटाळले बुडापेस्ट शिखर परिषदेचे वृत्त
4
आजचे राशीभविष्य : बुधवार २२ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ संभवतो, व्यापारी वर्गाचे गुंतलेले पैसे मिळतील
5
PM मोदींचा स्वदेशी नारा; जनतेला पत्र; ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ बुलंद करण्यासाठी प्रयत्न करा
6
बाधित क्षेत्र ३ हेक्टर मानून मदत; राज्य सरकारचा निर्णय, पूरग्रस्त शेतकऱ्यांना होणार लाभ
7
दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
8
अपात्र लाडक्या बहिणींनी उकळले १६४ कोटी रुपये, १२ हजारांवर पुरूष तर अपात्र महिला ७७ हजार
9
मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ऐन दिवाळीत पावसाचा बार; पुढील तीन दिवस असेच वातावरण राहणार
10
उमेदवार जाहीर होताच महाआघाडीतील दरी स्पष्ट; राजद, काँग्रेस, डाव्या पक्षांनी केले दुहेरी अर्ज
11
बिहार निवडणूक २०२५: १२१ मतदारसंघांत एकूण १,३१४ उमेदवार; महिला मतदारांच्या आधारे ‘जदयु’ बळकट
12
“महाआघाडीला नव्हे, भाजप जनसुराजला घाबरतेय; आमचे उमेदवार फोडतेय”; प्रशांत किशोर यांचा आरोप
13
...तर H1B व्हिसाधारकांना वाढीव शुल्क लागणार नाही; पण वाढ कायम; ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्टता
14
७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
15
सर्व न्यायालयांमधील ‘सू’ व्यवस्था दयनीय; देशातील सर्व हायकोर्टांचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर
16
विभक्त पती, आईला फ्लॅटमध्ये राहण्यास हायकोर्टाची परवानगी; नेमके प्रकरण काय?
17
नवी मुंबई-पनवेलमध्ये आगीत ६ जणांचा मृत्यू; ठाण्यात एकाच दिवशी आगीच्या सहा घटना
18
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
19
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
20
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती

सडलेला शेतमाल घेऊन शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 23:29 IST

जिल्ह्यातील शेतमालाची अवस्था व शेतकऱ्यांच्या वेदना प्रशासकीय प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडण्यासाठी सडलेला माल जिल्हाधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी बुधवारी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

ठळक मुद्देपोलिसांनी केली धरपकड : आंदोलक संतप्त, सडलेली संत्री फेकली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटपुढे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परतीच्या पावसाने सोयाबीन, कापूस, धान, भाजीपाल्यासह संत्रा, मोसंबीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण झाले. लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी, याच्या प्रतीक्षेत सध्या शेतकरी आहेत. मात्र प्रशासकीय यंत्रणा अजूनही शेतापर्यंत पोहचली नाही. जिल्ह्यातील शेतमालाची अवस्था व शेतकऱ्यांच्या वेदना प्रशासकीय प्रमुख असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडण्यासाठी सडलेला माल जिल्हाधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी बुधवारी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. परंतु पोलिसांनी केलेल्या धरपकडीमुळे आंदोलक चांगलेच संतापले. सडलेली संत्री जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटपुढे फेकून पोलीस व जिल्हा प्रशासनाचा तीव्र निषेध आंदोलकांनी केला.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते. आकाशवाणी चौकात कळमेश्वर, काटोल, सावनेर भागातून शेतकरी सडलेल्या पऱ्हाट्या, सोयाबीन, संत्री, मोसंबी घेऊन आले होते. शेतमालाची ही अवस्था आणि शेतकऱ्यांची वेदना प्रशासनापर्यंत पोहचविण्यासाठी आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाले. परंतु ताबडतोब पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या धरपकडीमुळे आंदोलक चांगलेच संतप्त झाले. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देऊ लागले. काही आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा आग्रह धरला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटपुढेच ठिय्या मांडला. यावेळी कळमेश्वरहून एका शेतकऱ्याने आणलेली पोतीभर सडलेली संत्री कार्यालयाच्या गेटपुढे फेकली. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आंदोलकांचा आग्रह होता. दरम्यान पोलिसांशी आंदोलकांची तू तू मै मै सुद्धा झाली. अखेर पोलिसांनी पाच लोकांच्या शिष्टमंडळाला भेटण्याची सूट दिली. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. दरम्यान पोलिसांनी राम नेवले, मुकेश मासूरकर, सुनील वडस्कर, वृषभ वानखेडे, वसंतराव वैद्य, प्रभाकर बेले, मोहन पाटोडे, विजय मौंदेकर, डॉ. पुखराज रेवतकर, विनायक खोरगडे, मोहन पाटोडे, भय्यालाल माकडे यांना अटक केली. आंदोलनात प्रीती देडमुठे, राजाभय्या, शेखर काकडे, अण्णाजी राजेदर, मुरलीधर ठाकरे, धर्मराज रेवतकर, पुंडलिक हरणे, रामदास राऊत, गुलाबराव धांडे, अशोक नेवले, श्रीराम अंबाडकर, पुरुषोत्तम हगवणे, नरेश निमजे, अनिल केशरवाणी, गणेश गंधेवार, नंदू पेरकर, भारत बावीसटाले, रमेश कन्नमवार, वसंतकुमार चौरसिया, योगेश कानोरकर, मोरेश्वर गौर आदी सहभागी झाले होते.आम्ही जिल्हाधिकाऱ्यांपुढे नुकसान भरपाई लवकर मिळावी, अशी मागणी करण्यासाठी आलो होतो, परंतु पोलिसांनी दडपशाही केली. शेतकऱ्यांवर एवढा कठीण प्रसंग आला असतानाही जिल्हाधिकाऱ्यांपर्र्यंत वेदना मांडण्यासाठी पोलिसांनी जाऊ दिले नाही. हे सरकार शेतकरीविरोधी आहे, हे स्पष्ट झाले आहे. नुकसान झाल्यानंतर सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्र्यांच्या संगीत खुर्चीमध्ये सर्व व्यस्त असून, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.राम नेवले, संयोजक, विदर्भ राज्य आंदोलन समिती.आंदोलकांच्या मागण्याप्रशासनाला पंचनामे करण्यासाठी एक महिना लागणार असल्याने, उपग्रह अथवा नवीन तंत्रज्ञानाद्वारे ताबडतोब पिकांचे सर्वेक्षण करावे.कापूस, सोयाबीन, धान, भाजीपाला पिकाला ३० हजार प्रति एकर आणि संत्रा व मोसंबी पिकाला ५० हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई द्यावी.शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जातून व वीज बिलातून मुक्त करावे.हमीभावाचे खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे.रब्बीच्या पेरणीसाठी त्वरित नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन