शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

शेतकरीच बनत आहेत शेतकऱ्यांचे प्रेरणास्त्रोत; राष्ट्रीय शेतकरी दिन विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:27 IST

शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत असे निराशादायी चित्र असतानाही, काही शेतकरी या व्यवस्थेपुढे पंगू न होता, आपल्या कर्तुत्वाने शेतकऱ्यांचेच प्रेरणास्त्रोत ठरते आहे.

ठळक मुद्देशेतीतून दिला उद्योगाचा मंत्रदरवर्षी २३ डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिन माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो

अंकिता देशकरआॅनलाईन लोकमतनागपूर : भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीक्षेत्रात गेल्या काही वर्षात निराशा पसरली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सावकारीचे ग्रहण, शेती मालाला न मिळणारे भाव, सरकारी धोरणं, शेतकऱ्यांवर होत असलेले राजकारण यामुळे शेती आणि शेतकरी यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला आहे. विदर्भात तर शेतकऱ्यांच्या विदारक अवस्था बघून शेतकरी कुठेतरी कुजलेला, पिचलेला दिसतो आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत असे निराशादायी चित्र असतानाही, काही शेतकरी या व्यवस्थेपुढे पंगू न होता, आपल्या कर्तुत्वाने शेतकऱ्यांचेच प्रेरणास्त्रोत ठरते आहे.राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त अशा काही प्रेरणादायी शेतकऱ्यांची यशोगाथेवर प्रकाश टाकला आहे. या शेतकऱ्यांनी शेतीतूनच दर्जेदार उत्पादन घेऊन, शेतीला उद्योगाची जोड दिली आहे. हे शेतकरी आता परिसरातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान ठरत आहे.शेतीचा खर्च कमी करणे हा उद्देशरामटेक परिसरात हळदीची शेती करण्यामागे उमाकांत पोफळी अनेक शेतकऱ्यांना प्रेरीत केले आहेत. कृषिभूषण पुरस्कार प्राप्त पोफळी यांनी शेतकऱ्यांसाठी अगदी कमी खर्चात हळदीचे पॉलिश यंत्र तयार केले आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे यंत्र उपयोगात आणले जाते. यात १५ ते २० मिनिटात १२० किलो हळद पॉलिश होते. लोकमतशी बोलताना पोफळी म्हणाले, शेतकºयांनी आत्महत्येचा विचार करू नये, असा विचार मनात आलाच तर थोडे तिर्थाटन करा आणि परत येऊन कामाला लागा. पोफळी हे सेंद्रीय पद्धतीने हळदीचे उत्पादन घेतात. त्यांना आयुर्वेदाचा भरपूर अनुभव आहे. ते सेंद्रीय खताची सुद्धा निर्मिती करतात.मधमाशी पालनातून थाटला व्यवसायउमरेड तालुक्यातील शुद्धोधन रामटेके यांनी शेतीला जोड म्हणून मधमाशी पालन सुरू केले. आज मधमाशी पालन हा त्यांचा व्यवसाय झाला आहे. २०१४ पासून त्यांनी शेतीबरोबर मधमाशीपालन सुरू केले. आज वर्षाला २०००० किलो मध गोळा करतात. त्यांनी स्वत:ची कंपनी तयार केली आहे. मधमाशी पालन करणाऱ्यांना प्रशिक्षण देतात. प्रशिक्षणाबरोबरच त्यांना स्टायफंडही स्वत:कडून देतात. विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या मधाची निर्मिती ही वेगवेगळ्या ‘फ्लेवर’ मध्ये आहे. ते पंजाब, हरियाणा, बिहार येथील शेतीतून मधाची निर्मिती करतात. मोठमोठ्या कंपन्यांना ते मधाचा पुरवठाही करतात.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरी