शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरीच बनत आहेत शेतकऱ्यांचे प्रेरणास्त्रोत; राष्ट्रीय शेतकरी दिन विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:27 IST

शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत असे निराशादायी चित्र असतानाही, काही शेतकरी या व्यवस्थेपुढे पंगू न होता, आपल्या कर्तुत्वाने शेतकऱ्यांचेच प्रेरणास्त्रोत ठरते आहे.

ठळक मुद्देशेतीतून दिला उद्योगाचा मंत्रदरवर्षी २३ डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिन माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो

अंकिता देशकरआॅनलाईन लोकमतनागपूर : भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीक्षेत्रात गेल्या काही वर्षात निराशा पसरली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सावकारीचे ग्रहण, शेती मालाला न मिळणारे भाव, सरकारी धोरणं, शेतकऱ्यांवर होत असलेले राजकारण यामुळे शेती आणि शेतकरी यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला आहे. विदर्भात तर शेतकऱ्यांच्या विदारक अवस्था बघून शेतकरी कुठेतरी कुजलेला, पिचलेला दिसतो आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत असे निराशादायी चित्र असतानाही, काही शेतकरी या व्यवस्थेपुढे पंगू न होता, आपल्या कर्तुत्वाने शेतकऱ्यांचेच प्रेरणास्त्रोत ठरते आहे.राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त अशा काही प्रेरणादायी शेतकऱ्यांची यशोगाथेवर प्रकाश टाकला आहे. या शेतकऱ्यांनी शेतीतूनच दर्जेदार उत्पादन घेऊन, शेतीला उद्योगाची जोड दिली आहे. हे शेतकरी आता परिसरातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान ठरत आहे.शेतीचा खर्च कमी करणे हा उद्देशरामटेक परिसरात हळदीची शेती करण्यामागे उमाकांत पोफळी अनेक शेतकऱ्यांना प्रेरीत केले आहेत. कृषिभूषण पुरस्कार प्राप्त पोफळी यांनी शेतकऱ्यांसाठी अगदी कमी खर्चात हळदीचे पॉलिश यंत्र तयार केले आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे यंत्र उपयोगात आणले जाते. यात १५ ते २० मिनिटात १२० किलो हळद पॉलिश होते. लोकमतशी बोलताना पोफळी म्हणाले, शेतकºयांनी आत्महत्येचा विचार करू नये, असा विचार मनात आलाच तर थोडे तिर्थाटन करा आणि परत येऊन कामाला लागा. पोफळी हे सेंद्रीय पद्धतीने हळदीचे उत्पादन घेतात. त्यांना आयुर्वेदाचा भरपूर अनुभव आहे. ते सेंद्रीय खताची सुद्धा निर्मिती करतात.मधमाशी पालनातून थाटला व्यवसायउमरेड तालुक्यातील शुद्धोधन रामटेके यांनी शेतीला जोड म्हणून मधमाशी पालन सुरू केले. आज मधमाशी पालन हा त्यांचा व्यवसाय झाला आहे. २०१४ पासून त्यांनी शेतीबरोबर मधमाशीपालन सुरू केले. आज वर्षाला २०००० किलो मध गोळा करतात. त्यांनी स्वत:ची कंपनी तयार केली आहे. मधमाशी पालन करणाऱ्यांना प्रशिक्षण देतात. प्रशिक्षणाबरोबरच त्यांना स्टायफंडही स्वत:कडून देतात. विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या मधाची निर्मिती ही वेगवेगळ्या ‘फ्लेवर’ मध्ये आहे. ते पंजाब, हरियाणा, बिहार येथील शेतीतून मधाची निर्मिती करतात. मोठमोठ्या कंपन्यांना ते मधाचा पुरवठाही करतात.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरी