शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

शेतकरीच बनत आहेत शेतकऱ्यांचे प्रेरणास्त्रोत; राष्ट्रीय शेतकरी दिन विशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 21:27 IST

शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत असे निराशादायी चित्र असतानाही, काही शेतकरी या व्यवस्थेपुढे पंगू न होता, आपल्या कर्तुत्वाने शेतकऱ्यांचेच प्रेरणास्त्रोत ठरते आहे.

ठळक मुद्देशेतीतून दिला उद्योगाचा मंत्रदरवर्षी २३ डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिन माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो

अंकिता देशकरआॅनलाईन लोकमतनागपूर : भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतीक्षेत्रात गेल्या काही वर्षात निराशा पसरली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सावकारीचे ग्रहण, शेती मालाला न मिळणारे भाव, सरकारी धोरणं, शेतकऱ्यांवर होत असलेले राजकारण यामुळे शेती आणि शेतकरी यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला आहे. विदर्भात तर शेतकऱ्यांच्या विदारक अवस्था बघून शेतकरी कुठेतरी कुजलेला, पिचलेला दिसतो आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत असे निराशादायी चित्र असतानाही, काही शेतकरी या व्यवस्थेपुढे पंगू न होता, आपल्या कर्तुत्वाने शेतकऱ्यांचेच प्रेरणास्त्रोत ठरते आहे.राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त अशा काही प्रेरणादायी शेतकऱ्यांची यशोगाथेवर प्रकाश टाकला आहे. या शेतकऱ्यांनी शेतीतूनच दर्जेदार उत्पादन घेऊन, शेतीला उद्योगाची जोड दिली आहे. हे शेतकरी आता परिसरातील शेतकऱ्यांचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान ठरत आहे.शेतीचा खर्च कमी करणे हा उद्देशरामटेक परिसरात हळदीची शेती करण्यामागे उमाकांत पोफळी अनेक शेतकऱ्यांना प्रेरीत केले आहेत. कृषिभूषण पुरस्कार प्राप्त पोफळी यांनी शेतकऱ्यांसाठी अगदी कमी खर्चात हळदीचे पॉलिश यंत्र तयार केले आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे यंत्र उपयोगात आणले जाते. यात १५ ते २० मिनिटात १२० किलो हळद पॉलिश होते. लोकमतशी बोलताना पोफळी म्हणाले, शेतकºयांनी आत्महत्येचा विचार करू नये, असा विचार मनात आलाच तर थोडे तिर्थाटन करा आणि परत येऊन कामाला लागा. पोफळी हे सेंद्रीय पद्धतीने हळदीचे उत्पादन घेतात. त्यांना आयुर्वेदाचा भरपूर अनुभव आहे. ते सेंद्रीय खताची सुद्धा निर्मिती करतात.मधमाशी पालनातून थाटला व्यवसायउमरेड तालुक्यातील शुद्धोधन रामटेके यांनी शेतीला जोड म्हणून मधमाशी पालन सुरू केले. आज मधमाशी पालन हा त्यांचा व्यवसाय झाला आहे. २०१४ पासून त्यांनी शेतीबरोबर मधमाशीपालन सुरू केले. आज वर्षाला २०००० किलो मध गोळा करतात. त्यांनी स्वत:ची कंपनी तयार केली आहे. मधमाशी पालन करणाऱ्यांना प्रशिक्षण देतात. प्रशिक्षणाबरोबरच त्यांना स्टायफंडही स्वत:कडून देतात. विशेष म्हणजे त्यांनी केलेल्या मधाची निर्मिती ही वेगवेगळ्या ‘फ्लेवर’ मध्ये आहे. ते पंजाब, हरियाणा, बिहार येथील शेतीतून मधाची निर्मिती करतात. मोठमोठ्या कंपन्यांना ते मधाचा पुरवठाही करतात.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरी