शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

२५ गावातील शेतकरी सिंचनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:31 IST

पोहरा नदीवर बांधलेला बंधारा विहीरगाव येथे अडविण्यात आला आहे. त्यामुळे २० ते २५ गावांमधील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पोहरा नदीचे पाणी भांडेवाडीला जाण्यापासून प्रशासनाने तत्काळ थांबवावे या मागणीला घेऊन सोमवारी शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी शासन, प्रशासनाविरुद्ध तीव्र नारे-निदर्शने केली.

ठळक मुद्देपोहराचे पाणी भांडेवाडीला जाण्यापासून थांबवा शेतकऱ्यांची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पोहरा नदीवर बांधलेला बंधारा विहीरगाव येथे अडविण्यात आला आहे. त्यामुळे २० ते २५ गावांमधील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पोहरा नदीचे पाणी भांडेवाडीला जाण्यापासून प्रशासनाने तत्काळ थांबवावे या मागणीला घेऊन सोमवारी शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी शासन, प्रशासनाविरुद्ध तीव्र नारे-निदर्शने केली.संघर्ष जगण्याचा जनआंदोलन चळवळीच्या अध्यक्ष प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. पोहरा नदीवरील पाण्यावर कामठी व कुही तालुक्यातील पांढुर्णा, तरोडी (बु), खेडी, परसोडी, टेमसना, पांढरकवडा, कुसुंबी, आदी २० ते २५ गावातील शेतीचे सिंचन होते. येथील ८० टक्के शेती पोहरा नदीच्या पाण्यावर होते. परंतु, मागील वर्षभरापासून विहीरगाव येथे पोहरा नदीचे पाणी बंधारा बांधून अडविण्यात आले व मनपाद्वारे पोहरा पंपिंग स्टेशनमधून पाणी भांडेवाडी येथील वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये आणून शुद्ध करण्यात येत आहे. शुद्ध केलेले २०० एमएलडी पाणी खापरखेडा येथील विद्युत निर्मिती केंद्राला पुरविण्यात येणार असल्याचा आंदोलनकर्त्याचा आरोप आहे. सध्या हा प्लांट पूर्ण न झाल्याने हे पाणी शुद्ध करून नागनदीला सोडण्यात येते. पाणी शुद्ध करण्याला विरोध नाही. परंतु, शुद्ध केल्यानंतर ते पाणी पुन्हा पोहरा नदीत सोडावे किंवा पोहरा पंपिंग हाऊस विहीरगावच्या बाजूच्या स्मॉल वॉटर ट्रीटमेंट प्लांट तयार करावा, विद्युत प्रकल्पाला पुरविण्यात येणारे २०० एमएलडी पाणी रद्द करावे व नदीचे खोलीकरण करून पाण्याची पातळी वाढवावी आदी शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. दरम्यान हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी तीव्र नारे-निदर्शने करून १०० शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी मुंडण केले. नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले आंदोलनस्थळाला भेट दिली. त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुरुषोत्तम शहाणे, हुकुमचंद आमदरे, रमेश जोध, सुरेश वर्षे, आशिष मल्लेवार वामन येवले, मनोहर कोरडे, तापेश्वर वैद्य, राजेंद्र लांडे, राजेश निनावे, राजेश ठवकर, क्रिष्णा शहाणे, दिनेश ढोले, अतुल बाळबुधे, प्रेम चांभारे, अमोल चांभारे, श्रीहरी देवगडे, संजय गावंडे, मदन गोमकर, मनोहरजी शहाणे, विलास मोहड, माणिक खेटमले, अमोल मोहड, केवल फळके आदींचा समावेश होता.५ ऑगस्टपर्यंत पोहरा नदीचे पाणी शेतकऱ्यांना देण्याविषयी निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी दिला.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरी