शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

२५ गावातील शेतकरी सिंचनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:31 IST

पोहरा नदीवर बांधलेला बंधारा विहीरगाव येथे अडविण्यात आला आहे. त्यामुळे २० ते २५ गावांमधील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पोहरा नदीचे पाणी भांडेवाडीला जाण्यापासून प्रशासनाने तत्काळ थांबवावे या मागणीला घेऊन सोमवारी शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी शासन, प्रशासनाविरुद्ध तीव्र नारे-निदर्शने केली.

ठळक मुद्देपोहराचे पाणी भांडेवाडीला जाण्यापासून थांबवा शेतकऱ्यांची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पोहरा नदीवर बांधलेला बंधारा विहीरगाव येथे अडविण्यात आला आहे. त्यामुळे २० ते २५ गावांमधील शेतकऱ्यांच्या सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पोहरा नदीचे पाणी भांडेवाडीला जाण्यापासून प्रशासनाने तत्काळ थांबवावे या मागणीला घेऊन सोमवारी शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकऱ्यांनी शासन, प्रशासनाविरुद्ध तीव्र नारे-निदर्शने केली.संघर्ष जगण्याचा जनआंदोलन चळवळीच्या अध्यक्ष प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. पोहरा नदीवरील पाण्यावर कामठी व कुही तालुक्यातील पांढुर्णा, तरोडी (बु), खेडी, परसोडी, टेमसना, पांढरकवडा, कुसुंबी, आदी २० ते २५ गावातील शेतीचे सिंचन होते. येथील ८० टक्के शेती पोहरा नदीच्या पाण्यावर होते. परंतु, मागील वर्षभरापासून विहीरगाव येथे पोहरा नदीचे पाणी बंधारा बांधून अडविण्यात आले व मनपाद्वारे पोहरा पंपिंग स्टेशनमधून पाणी भांडेवाडी येथील वॉटर ट्रीटमेंट प्लांटमध्ये आणून शुद्ध करण्यात येत आहे. शुद्ध केलेले २०० एमएलडी पाणी खापरखेडा येथील विद्युत निर्मिती केंद्राला पुरविण्यात येणार असल्याचा आंदोलनकर्त्याचा आरोप आहे. सध्या हा प्लांट पूर्ण न झाल्याने हे पाणी शुद्ध करून नागनदीला सोडण्यात येते. पाणी शुद्ध करण्याला विरोध नाही. परंतु, शुद्ध केल्यानंतर ते पाणी पुन्हा पोहरा नदीत सोडावे किंवा पोहरा पंपिंग हाऊस विहीरगावच्या बाजूच्या स्मॉल वॉटर ट्रीटमेंट प्लांट तयार करावा, विद्युत प्रकल्पाला पुरविण्यात येणारे २०० एमएलडी पाणी रद्द करावे व नदीचे खोलीकरण करून पाण्याची पातळी वाढवावी आदी शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. दरम्यान हक्काच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी तीव्र नारे-निदर्शने करून १०० शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी मुंडण केले. नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले आंदोलनस्थळाला भेट दिली. त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पुरुषोत्तम शहाणे, हुकुमचंद आमदरे, रमेश जोध, सुरेश वर्षे, आशिष मल्लेवार वामन येवले, मनोहर कोरडे, तापेश्वर वैद्य, राजेंद्र लांडे, राजेश निनावे, राजेश ठवकर, क्रिष्णा शहाणे, दिनेश ढोले, अतुल बाळबुधे, प्रेम चांभारे, अमोल चांभारे, श्रीहरी देवगडे, संजय गावंडे, मदन गोमकर, मनोहरजी शहाणे, विलास मोहड, माणिक खेटमले, अमोल मोहड, केवल फळके आदींचा समावेश होता.५ ऑगस्टपर्यंत पोहरा नदीचे पाणी शेतकऱ्यांना देण्याविषयी निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी दिला.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरी