शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
2
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
3
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
4
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
5
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
6
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
7
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
8
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
9
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
10
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
11
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
12
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
13
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
14
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
15
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
16
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
17
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
18
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावमध्ये एमआयएम-काँग्रेस युतीचा प्रयोग; वरिष्ठांच्या हालचाली, जागा वाटपाचीही चर्चा
19
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
20
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या; आठवडाभरातील तिसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2022 20:44 IST

Nagpur News आधीच्या वर्षीची नापिकी, यावर्षी अतिमुसळधार पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान आणि डोक्यावर असलेल्या कर्जामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने शेतातील झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली.

ठळक मुद्देशेतात गळफास लावून संपविले जीवन

नागपूर : आधीच्या वर्षीची नापिकी, यावर्षी अतिमुसळधार पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान आणि डोक्यावर असलेल्या कर्जामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने शेतातील झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळदरा येथे साेमवारी (दि. १२) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. आठवडाभरातील नरखेड तालुक्यातील ही तिसरी शेतकरी आत्महत्या आहे.

राजीव बाबुराव जुडपे (वय ५८, रा. पिंपळदरा, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. राजीव यांच्याकडे तीन एकर शेती असून, ती त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. त्यांनी यावर्षी काही शेती ठेक्यानेही केली हाेती. शिवाय, शेतीच्या खर्चासाठी भारतीय स्टेट बँकेच्या थडीपवनी (ता. नरखेड) शाखेकडून पीक कर्ज घेतले हाेते.

यावर्षी सुरुवातीच्या काळात चांगल्या असलेल्या पिकांचे मध्यंतरी कोसळलेल्या मुसळधार व नुकत्याच झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. पिकांच्या मशागतीवर खर्च केलेला पैसा हाती येण्याची शक्यता मावळल्याने तसेच पीक कर्जाचा भरणा करणे व वर्षभराच्या घर खर्चाची व्यवस्था करण्याच्या चिंतेमुळे ते हताश हाेते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी दिली. त्यातच त्यांनी साेमवारी दुपारी शेतातील झाडाला गळफास लावून घेत जीवन संपविले.

गावातील एकजण बकऱ्या चारण्यासाठी राजीव जुडपे यांच्या शेताकडे गेला असता, त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली असून, तपास बिट जमादार धोंडे करीत आहेत.

आठवडाभरातील तिसरी शेतकरी आत्महत्या

नरखेड तालुक्यातील आठवडाभरातील ही तिसरी शेतकरी आत्महत्या आहे. याच कारणामुळे यापूर्वी लाेहारीसावंगा येथील बंडू ऊर्फ ईश्वरदास नारायण बन्नगरे (५२) यांनी साेमवारी (दि. ५), तर विठ्ठल नत्थूजी उमरकर (६२, रा. अंबाडा) यांनी शनिवारी (दि. ३) आत्महत्या केली. मागील महिन्यात तालुक्यातील आणखी दाेन शेतकऱ्यांनी हताश हाेऊन मृत्यूला कवटाळले. या शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, यासाठी सरकार व प्रशासन काहीही करायला तयार नाही.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या