शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या; आठवडाभरातील तिसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2022 20:44 IST

Nagpur News आधीच्या वर्षीची नापिकी, यावर्षी अतिमुसळधार पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान आणि डोक्यावर असलेल्या कर्जामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने शेतातील झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली.

ठळक मुद्देशेतात गळफास लावून संपविले जीवन

नागपूर : आधीच्या वर्षीची नापिकी, यावर्षी अतिमुसळधार पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान आणि डोक्यावर असलेल्या कर्जामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने शेतातील झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळदरा येथे साेमवारी (दि. १२) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. आठवडाभरातील नरखेड तालुक्यातील ही तिसरी शेतकरी आत्महत्या आहे.

राजीव बाबुराव जुडपे (वय ५८, रा. पिंपळदरा, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. राजीव यांच्याकडे तीन एकर शेती असून, ती त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. त्यांनी यावर्षी काही शेती ठेक्यानेही केली हाेती. शिवाय, शेतीच्या खर्चासाठी भारतीय स्टेट बँकेच्या थडीपवनी (ता. नरखेड) शाखेकडून पीक कर्ज घेतले हाेते.

यावर्षी सुरुवातीच्या काळात चांगल्या असलेल्या पिकांचे मध्यंतरी कोसळलेल्या मुसळधार व नुकत्याच झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. पिकांच्या मशागतीवर खर्च केलेला पैसा हाती येण्याची शक्यता मावळल्याने तसेच पीक कर्जाचा भरणा करणे व वर्षभराच्या घर खर्चाची व्यवस्था करण्याच्या चिंतेमुळे ते हताश हाेते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी दिली. त्यातच त्यांनी साेमवारी दुपारी शेतातील झाडाला गळफास लावून घेत जीवन संपविले.

गावातील एकजण बकऱ्या चारण्यासाठी राजीव जुडपे यांच्या शेताकडे गेला असता, त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली असून, तपास बिट जमादार धोंडे करीत आहेत.

आठवडाभरातील तिसरी शेतकरी आत्महत्या

नरखेड तालुक्यातील आठवडाभरातील ही तिसरी शेतकरी आत्महत्या आहे. याच कारणामुळे यापूर्वी लाेहारीसावंगा येथील बंडू ऊर्फ ईश्वरदास नारायण बन्नगरे (५२) यांनी साेमवारी (दि. ५), तर विठ्ठल नत्थूजी उमरकर (६२, रा. अंबाडा) यांनी शनिवारी (दि. ३) आत्महत्या केली. मागील महिन्यात तालुक्यातील आणखी दाेन शेतकऱ्यांनी हताश हाेऊन मृत्यूला कवटाळले. या शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, यासाठी सरकार व प्रशासन काहीही करायला तयार नाही.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या