शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या; आठवडाभरातील तिसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2022 20:44 IST

Nagpur News आधीच्या वर्षीची नापिकी, यावर्षी अतिमुसळधार पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान आणि डोक्यावर असलेल्या कर्जामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने शेतातील झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली.

ठळक मुद्देशेतात गळफास लावून संपविले जीवन

नागपूर : आधीच्या वर्षीची नापिकी, यावर्षी अतिमुसळधार पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान आणि डोक्यावर असलेल्या कर्जामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने शेतातील झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळदरा येथे साेमवारी (दि. १२) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. आठवडाभरातील नरखेड तालुक्यातील ही तिसरी शेतकरी आत्महत्या आहे.

राजीव बाबुराव जुडपे (वय ५८, रा. पिंपळदरा, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. राजीव यांच्याकडे तीन एकर शेती असून, ती त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. त्यांनी यावर्षी काही शेती ठेक्यानेही केली हाेती. शिवाय, शेतीच्या खर्चासाठी भारतीय स्टेट बँकेच्या थडीपवनी (ता. नरखेड) शाखेकडून पीक कर्ज घेतले हाेते.

यावर्षी सुरुवातीच्या काळात चांगल्या असलेल्या पिकांचे मध्यंतरी कोसळलेल्या मुसळधार व नुकत्याच झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. पिकांच्या मशागतीवर खर्च केलेला पैसा हाती येण्याची शक्यता मावळल्याने तसेच पीक कर्जाचा भरणा करणे व वर्षभराच्या घर खर्चाची व्यवस्था करण्याच्या चिंतेमुळे ते हताश हाेते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी दिली. त्यातच त्यांनी साेमवारी दुपारी शेतातील झाडाला गळफास लावून घेत जीवन संपविले.

गावातील एकजण बकऱ्या चारण्यासाठी राजीव जुडपे यांच्या शेताकडे गेला असता, त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली असून, तपास बिट जमादार धोंडे करीत आहेत.

आठवडाभरातील तिसरी शेतकरी आत्महत्या

नरखेड तालुक्यातील आठवडाभरातील ही तिसरी शेतकरी आत्महत्या आहे. याच कारणामुळे यापूर्वी लाेहारीसावंगा येथील बंडू ऊर्फ ईश्वरदास नारायण बन्नगरे (५२) यांनी साेमवारी (दि. ५), तर विठ्ठल नत्थूजी उमरकर (६२, रा. अंबाडा) यांनी शनिवारी (दि. ३) आत्महत्या केली. मागील महिन्यात तालुक्यातील आणखी दाेन शेतकऱ्यांनी हताश हाेऊन मृत्यूला कवटाळले. या शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, यासाठी सरकार व प्रशासन काहीही करायला तयार नाही.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या