शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्याची आत्महत्या; आठवडाभरातील तिसरी घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2022 20:44 IST

Nagpur News आधीच्या वर्षीची नापिकी, यावर्षी अतिमुसळधार पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान आणि डोक्यावर असलेल्या कर्जामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने शेतातील झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली.

ठळक मुद्देशेतात गळफास लावून संपविले जीवन

नागपूर : आधीच्या वर्षीची नापिकी, यावर्षी अतिमुसळधार पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान आणि डोक्यावर असलेल्या कर्जामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने शेतातील झाडाच्या फांदीला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना जलालखेडा (ता. नरखेड) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळदरा येथे साेमवारी (दि. १२) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. आठवडाभरातील नरखेड तालुक्यातील ही तिसरी शेतकरी आत्महत्या आहे.

राजीव बाबुराव जुडपे (वय ५८, रा. पिंपळदरा, ता. नरखेड) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. राजीव यांच्याकडे तीन एकर शेती असून, ती त्यांच्या पत्नीच्या नावे आहे. त्यांनी यावर्षी काही शेती ठेक्यानेही केली हाेती. शिवाय, शेतीच्या खर्चासाठी भारतीय स्टेट बँकेच्या थडीपवनी (ता. नरखेड) शाखेकडून पीक कर्ज घेतले हाेते.

यावर्षी सुरुवातीच्या काळात चांगल्या असलेल्या पिकांचे मध्यंतरी कोसळलेल्या मुसळधार व नुकत्याच झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. पिकांच्या मशागतीवर खर्च केलेला पैसा हाती येण्याची शक्यता मावळल्याने तसेच पीक कर्जाचा भरणा करणे व वर्षभराच्या घर खर्चाची व्यवस्था करण्याच्या चिंतेमुळे ते हताश हाेते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी दिली. त्यातच त्यांनी साेमवारी दुपारी शेतातील झाडाला गळफास लावून घेत जीवन संपविले.

गावातील एकजण बकऱ्या चारण्यासाठी राजीव जुडपे यांच्या शेताकडे गेला असता, त्यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जलालखेडा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात आणला. याप्रकरणी जलालखेडा पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूची नाेंद केली असून, तपास बिट जमादार धोंडे करीत आहेत.

आठवडाभरातील तिसरी शेतकरी आत्महत्या

नरखेड तालुक्यातील आठवडाभरातील ही तिसरी शेतकरी आत्महत्या आहे. याच कारणामुळे यापूर्वी लाेहारीसावंगा येथील बंडू ऊर्फ ईश्वरदास नारायण बन्नगरे (५२) यांनी साेमवारी (दि. ५), तर विठ्ठल नत्थूजी उमरकर (६२, रा. अंबाडा) यांनी शनिवारी (दि. ३) आत्महत्या केली. मागील महिन्यात तालुक्यातील आणखी दाेन शेतकऱ्यांनी हताश हाेऊन मृत्यूला कवटाळले. या शेतकरी आत्महत्या थांबाव्यात, यासाठी सरकार व प्रशासन काहीही करायला तयार नाही.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या