शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पाकिस्तानचा जगवायचा की भारताचा ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 20:49 IST

एकीकडे पाकिस्तान दररोज सीमेवर आपल्या जवानांचे बळी घेत आहे. निष्पाप लोकांवर गोळीबारी करीत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला ठोस उत्तर देण्याचे सोडून भाजपा सरकारने देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असताना पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना जगविण्यासाठी तेथील साखर आयात केली. तेव्हा आता आपल्या देशातील शेतकऱ्यांना जगवायचे आहे की पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना हे भाजप सरकारनेच स्पष्ट करावे, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चिमटा काढला.

ठळक मुद्देअजित पवार यांनी काढला चिमटा : प्राधान्य कशाला, सरकारनेच स्पष्ट करावे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकीकडे पाकिस्तान दररोज सीमेवर आपल्या जवानांचे बळी घेत आहे. निष्पाप लोकांवर गोळीबारी करीत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला ठोस उत्तर देण्याचे सोडून भाजपा सरकारने देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले असताना पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना जगविण्यासाठी तेथील साखर आयात केली. तेव्हा आता आपल्या देशातील शेतकऱ्यांना जगवायचे आहे की पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना हे भाजप सरकारनेच स्पष्ट करावे, अशा शब्दात माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चिमटा काढला.भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत प्रचारासाठी जात असताना नागपुरात पत्रकारांशी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, आज आत्महत्या करणारे शेतकरी थेट मुख्यमंत्र्यांच्या नावाने चिठ्ठ्या लिहित आहेत. सरकारच्या धोरणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीद्वारे सांगत आहे. हे एकप्रकारचे भाजप-शिवसेना सरकारचे अपयश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. निरंजन डावखरे यांनी भाजपात प्रवेश केल्याबाबत विचारले असता पवार यांनी सांगितले की, स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी पक्ष सोडला. राजकारणात काही लोकं उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे असतात तर काही जण निष्ठा पाळणारे असतात. त्यामुळे ते चालतच राहते. नागपुरात होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाबाबत त्यांना विचारले असता अधिवेशन कुठे घ्यावे, हा सरकारचा अधिकार आहे. त्याला आपला पाठिंबा राहील. सरकारला जाब विचारण्याचे आमचे काम आहे, अधिवेशन कुठेही झाले तरी ते आम्ही करूच, असेही त्यांनी स्पषट केले.मित्रपक्षासोबत भाजपाची वागणूक चांगली नाही. राजू शेट्टी नाराज आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील बातम्या पाहता शिवसेनाही नाराज असल्याचे दिसून येते. विनायक मेटे यांना अजूनही मंत्री करण्यात आले नाही. एकूणच गाजर दाखविण्यात येत असल्याने नाराज असल्याचेही ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख आणि आ. प्रकाश गजभिये उपस्थित होते.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारnagpurनागपूर