शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

प्रवासभाडे पेटले; अव्वाच्या सव्वा आकारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 20:49 IST

Nagpur News गावाखेड्यात पोहोचलेली एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना ये-जा करणे अवघड झाले आहे. त्याचा फायदा खासगी वाहतूकदार भरपूर घेत आहेत.

ठळक मुद्देएसटीच्या संपाचा गैरफायदा खासगी वाहतूकदारांकडून लूट

नागपूर : ऐन सणासुदीच्या दिवसांत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपाचा सर्वांत मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. गावाखेड्यात पोहोचलेली एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांना ये-जा करणे अवघड झाले आहे. त्याचा फायदा खासगी वाहतूकदार भरपूर घेत आहेत. अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची अक्षरश: लूट सुरू आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीचे अर्धे तिकीट लागते, त्यांना वाहतूकदाराने मागितलेले पूर्ण भाडे द्यावे लागत आहे. खासगी वाहतूकदाराच्या भाडेवाढीवर प्रवासी संतप्त झाले असून, संबंधित विभागाने भाववाढीवर नियंत्रण ठेवावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.

ग्रामीण प्रवाशांचे हाल

दरम्यान, एसटीच्या संपाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील प्रवाशांना बसला. माेठ्या शहराच्या मार्गाने ट्रॅव्हल्स चालत असतात. ग्रामीण भागातील नागरिकांना एसटीशिवाय पर्याय राहत नाही, मात्र बस बंद असल्याने साधन नसलेल्यांना प्रवास टाळावा लागला. निकडीचे काम असलेल्या आत मधल्या गावातील लाेकांना खासगी साधन मिळविण्यासाठी माेठ्या गावापर्यंत पायी प्रवास करावा लागत आहे. येथे आल्यावरही साधनाची वाट पाहत ताटकळत बसावे लागल्याचे चित्र हाेते.

काळीपिवळी, ट्रॅक्स खचाखच

बस बंद असल्याचा पूर्ण फायदा काळीपिवळी, ट्रॅक्स अशा खासगी प्रवासी वाहनचालकांनी घेतला. ९ प्रवाशांची परवानगी असलेल्या ट्रॅक्समध्ये अशा दिवशी १५ प्रवासी बसविले जातात, पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता १८ ते २० प्रवाशांना अक्षरश: काेंबण्यात येत आहे. उमरेड, आंभाेरा मार्गावर हे चित्र सर्रास दिसून येत आहे. राेजच्यापेक्षा २० ते ३० रुपये जादाचे आकारले गेल्याच्याही तक्रारी प्रवाशांनी केल्या. शिवाय, अर्ध्या तिकिटाने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही अधिक पैसे माेजावे लागत आहेत. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरणाऱ्या खासगी वाहनचालकांवर कुठलीही कारवाई पाेलिसांकडून करण्यात आली नाही.

शालेय विद्यार्थ्यांची होणार गोची

दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर गुरुवारपासून शाळा सुरू होणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्याचे महत्त्वाचे साधन एसटी महामंडळाच्या बस असतात. पण कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सर्वच डेपोतील बस डेपोतच थांबल्या आहेत. अशात महामंडळाने नागपूर डेपोतील १८ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे संप आणखी चिघळेल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. अशात दोन दिवसांत संप न मिटल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत पोहोचू शकणार नाहीत.

टॅग्स :state transportएसटी