शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

नागपुरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा उडाला बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 12:35 AM

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या ‘हायरिस्क’ व ‘लो रिस्क’ संपर्कातील नागरिकांचा शोध (ट्रेसिंग) घेऊन तपासणी करण्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असला तरी, प्रत्यक्षात दारावर स्टीकर लावण्यापलिकडे ट्रेसिंग व टेस्टिंग होत नसल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकशी तुटणार कोरोनाची साखळी? : ‘हायरिस्क’ व ‘लोरिस्क’ संपर्कातील लोकांपर्यंत पोहचले जात नाही

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या ‘हायरिस्क’ व ‘लो रिस्क’ संपर्कातील नागरिकांचा शोध (ट्रेसिंग) घेऊन तपासणी करण्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असला तरी, प्रत्यक्षात दारावर स्टीकर लावण्यापलिकडे ट्रेसिंग व टेस्टिंग होत नसल्याचे समोर आले आहे. अपुऱ्या यंत्रणामुळे अनेक बाधितांच्या संपर्कातील लोकांची चाचणी होत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत या महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यात कमालीची वाढ झाली आहे. दोन हजारावर गेलेली रुग्णसंख्या आता १२०० वर आली आहे. परंतु मृत्यूची संख्या अद्यापही ४० ते ५० दरम्यान असल्याने कोरोनाची दहशत कायम आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संशयित कोरोनाबाधितांची चाचणी होणे, पॉझिटिव्ह आल्यास उपचाराखाली आणणे, रुग्णाच्या जवळून संपर्कात आलेल्या म्हणजे ‘हायरिस्क’ व दुरून संपर्क आलेला म्हणजे ‘लो रिस्क’ नागरिकांचा शोध घेणे आवश्यक असते. यात साधारण १३ ते २० लोकांची तपासणी करणे अपेक्षित असते. सोबतच रुग्णांच्या परिसरात सर्वेक्षण करणे गरजेचे असते. मात्र, ‘ट्रेसिंग’, ‘टेस्टिंग’ व सर्वेक्षण प्रत्यक्षात होत नसून बोजवारा उडल्याचे चित्र आहे. -मुंढे यांच्या काळात ‘ट्रेसिंग’, ‘टेस्टिंग’वर होता जोर तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे कार्यरत असताना त्यांनी ‘ट्रेसिंग’, ‘टेस्टिंग’ व सर्वेक्षणावर विशेष भर दिला होता. परंतु त्यांची बदली होताच आता याकडे दुर्लक्ष होत असल्याचे खुद्द रुग्णांचे म्हणणे आहे.नाव लिहून घेतले परंतु संपर्कच केला नाहीएका कोरोनाबाधित रुग्ण महिलेने ‘लोकमत’ला सांगितले, पतीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मनपाकडून कुठलाही फोन आला नाही. स्वत:हून कोविडची तपासणी केली. तपासणीनंतर दोन दिवसाने मनपाकडून फोन आला. त्यांनी पत्ता विचारून घराला भेट दिली. कोणकोण संपर्कात आले यांची नावे लिहून घेतली. घराला स्टीकर लावले. परंतु नंतर काहीच केले नाही.ट्रेसिंगची आकडेवारी देण्यास टाळाटाळशहरात आतापर्यंत किती लोकांचे ट्रेसिंग केले याची माहिती मनपाच्या संबंधित विभागाला मागितली असता मागील दोन आठवड्यापासून टाळटाळ करीत आहे. या संदर्भात मनपाचे अप्पर आयुक्त राम जोशी यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही या संदर्भातील माहिती मागितली, परंतु यांच्याकडूनही कुठलेच उत्तर मिळाले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर