शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

प्रसिद्ध न्यूरो सर्जन व कवी लोकेंद्र सिंह  म्हणतात , लोकांची मानसिकताच खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 23:16 IST

लोकांचे डोके नाही तर मानसिकताच खराब आहे. हे तर एका हार्डवेअरसारखे आहे. त्यात आपण जसे सॉफ्टवेअर अपलोड केले, तसे परिणाम मिळतील. आमचा देश महान आहे, परंतु नागरिकांमध्ये महानता नाही. आम्ही आमचे नैतिक कर्तव्य आणि मूल्य जाणून घेत नाही. भ्रष्टाचार, गुन्हेगारी हे खराब मानसिकतेचे प्रतीक असल्याचे मत सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन व कवी लोकेंद्र सिंह ‘सरजन’ यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे ‘संवाद’मध्ये मांडले विचार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकांचे डोके नाही तर मानसिकताच खराब आहे. हे तर एका हार्डवेअरसारखे आहे. त्यात आपण जसे सॉफ्टवेअर अपलोड केले, तसे परिणाम मिळतील. आमचा देश महान आहे, परंतु नागरिकांमध्ये महानता नाही. आम्ही आमचे नैतिक कर्तव्य आणि मूल्य जाणून घेत नाही. भ्रष्टाचार, गुन्हेगारी हे खराब मानसिकतेचे प्रतीक असल्याचे मत सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन व कवी लोकेंद्र सिंह ‘सरजन’ यांनी व्यक्त केले.बुधवारी सायंकाळी झाशी राणी चौकातील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या ‘संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. सिंह यांचा जीवन प्रवास, संघर्ष, यश आणि साहित्याबाबत डॉ. सागर खादीवाला यांनी संवाद साधला. आपल्या जीवन प्रवासाबाबत ते म्हणाले, मथुरेत माझा जन्म झाला. कुटुंब जयपूरमध्ये स्थायिक झाले. येथूनच शालेय, महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यानंतर न्यूरो सर्जनच्या रूपाने काही वेळ काम केले. वडिलांच्या आदेशामुळे मी ते सोडून दुसऱ्या क्षेत्रात जाण्याचा विचार केला. परंतु मला डोक्याच्या उपचारात आवड निर्माण झाली. चंदीगडवरून न्यूरो सर्जरीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. दरम्यान, प्रोफेसरने मला नागपुरात डॉ. टावरींकडे पाठविले. या शहराच्या आत्मियतेने मला परत जाऊ दिले नाही. कार्यक्रमात डॉ. सिंह यांच्या पत्नी मधुबाला सिंह यांनीही वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीचा काळ गंमतीशीर मांडला. चर्चेपूर्वी साहित्यिक मधुप पांडेय यांनी डॉ. सिंह यांचा शाल-श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.सर्जन ते सरजनचा प्रवासडॉ. खादीवाला यांच्या साहित्य क्षेत्रात पदार्पणाबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, कॉलेजमध्ये पॅथालॉजी विभागाच्या निवडणुकीदरम्यान एक हास्य कविता लिहिली. ती लोकांना खूप आवडली. त्यानंतर गंभीरपणे मी ‘मस्तिष्क और मेरे बीच संवाद’च्या कल्पनेला कवितेत बदलविले. आयएमएच्या मंचावर पहिल्यांदा सादरीकरण केले. त्यानंतर हा छंद जडला आणि आज ६५० पेक्षा अधिक कविता लिहिल्या. सर्जन सोबत साहित्याचे सृजन करता करता मी सरजन झालो.जिंकणे-हरण्याचा निकाल त्वरितसर्जन म्हणून काम करतानाच्या संघर्षाबाबत ते म्हणाले, ‘मी औषध देतो, तो (ईश्वर) रक्षा करतो.’ डॉक्टरला नेहमी रुग्ण लवकर बरा व्हावा, असे वाटते. डॉक्टरच्या व्यवसायावर चुकीचे आरोप होतात. या व्यवसायात जिंकण्याचा आणि हरण्याचा निर्णय त्वरित होतो. काही डॉक्टरांनी यास व्यवसायाचे रूप दिले आहे. परंतु त्यासही समाजच जबाबदार आहे. कोट्यवधी रुपये खर्च केल्यावर डॉक्टरच्याही अपेक्षा वाढतात.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर