शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिव्यांगजनासह परिवाराचे कोरोना काळात सक्षमीकरण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 19:47 IST

कोविड १९ च्य प्रकोपामुळे सामान्यजन जिथे हवालदील झाले आहेत तिथे दिव्यांगजन व त्याचे कुटुंबिय यांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कोविड १९ च्य प्रकोपामुळे सामान्यजन जिथे हवालदील झाले आहेत तिथे दिव्यांगजन व त्याचे कुटुंबिय यांना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. या काळजीमध्ये त्यांची आरोग्य, सामाजिक, आर्थिक, मानसिक अशा सर्व पातळ्यावरील देखरेख व सक्षमीकरण अपेक्षित ठरते.गेल्या दोन-अडीच महिन्यापासून सगळेजण घरात बंदिस्त आहेत. अशा परिस्थितीत घरातील सदस्यांमध्ये चिंता, भय, क्रोध, अपराधीपण आदी भावना उत्पन्न होणे स्वाभाविक आहे. त्याचसोबत आत्मविश्वास डळमळणे, निर्णयक्षमता हरवणे याही बाबी संभवात. अशात जर घरात एखादे दिव्यांग मूल असेल तर या भावनांचा उद्रेक तीव्रतेने होण्याची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी व त्यावर नियंत्रण राखण्यासाठी त्या कुटुंबाचे सक्षमीकरण करणे गरजेचे ठरते.यात स्वच्छता आणि आरोग्य हे प्रथम स्थानी येते. सामान्यांच्या तुलनेत दिव्यांगजनांना कोरोना व इतर संक्रमणांचा धोका अधिक होऊ शकतो. त्यासाठी काही उपाय करणे आवश्यक ठरते. यात नियमित मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर जपणे, बाहेरच्या वस्तूला स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुणे, तोंडाला हात लावण्याआधी तो स्वच्छ धुणे, शौच केल्यानंतर हात स्वच्छ धुणे, दोन वेळेस स्नान करणे, नखे नियमित कापणे, दररोज ताजे घरचे अन्न घेणे, ताजी फळे व हिरव्या पालेभाज्या स्वच्छ धुणे याचा समावेश होतो. तसेच दररोज भरपूर पाणी पिणे, पुरेशी झोप घेणे हेही महत्त्वाचे ठरते. घराची स्वच्छता राखणे हेही अतिशय महत्त्वाचे आहे.शासनानेही दिव्यांगजन, शेतकरी, लघु-मध्यम वा कुटीर उद्योगासाठी मदत करणे गरजेचे आहे. निराधार पेन्शनसारख्या योजनेतून मिळणाऱ्या रकमेत वाढ करणे, तीव्र दिव्यांगजन व बहुविकलांग व्यक्तींना घरपोच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे आवश्यक ठरते. दिव्यांगांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी आॅनलाईन शिक्षण, वेबिनारच्या माध्यमांचा वापर करणे योग्य ठरते. या सर्वासोबत मार्गदर्शन व समुदेशन याचेही महत्त्व आहेच.या संकटकाळात वरील उपायांचा अवलंब करून दिव्यांगजन व त्यांच्या परिवाराला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रित्या मदत दिली जाऊ शकते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस