शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 07:30 IST

Nagpur News महापुरुषांशी संबंधित नावांचे प्रकल्प, त्यांची स्मारके असोत किंवा ऐतिहासिक स्थळांचा विकास असो, यासाठी राज्य शासनातर्फे सामाजिक न्याय विभागाचा निधी सर्रास वापरला जात आहे.

ठळक मुद्देअनुसूचित जातीच्या मूळ योजनांनाच धक्काआर्थिक,सामाजिक व शैक्षणिक विकासाकडे दुर्लक्ष

आनंद डेकाटे

नागपूर : महापुरुषांशी संबंधित नावांचे प्रकल्प, त्यांची स्मारके असोत किंवा ऐतिहासिक स्थळांचा विकास असो, यासाठी राज्य शासनातर्फे सामाजिक न्याय विभागाचा निधी सर्रास वापरला जात आहे. सरकार कुणाचेही असो; परंतु मागील काही वर्षांपासून हा प्रकार वाढला आहे. परिणामी अनुसूचित जातीच्या मूळ योजनांनाच धक्का बसला असून, अनुसूचित जातीच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासाकडे शासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे.

अनुसूचित जातीच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासाचा निधी केवळ त्याच कामासाठी खर्च करण्याचे सरकारला बंधनकारक आहे; मात्र आतापर्यंत सरकार यापैकी बराच निधी बौद्ध- अनुसूचित जातीच्या विकासाशी संबंध नसलेल्या इतर कामांसाठी अन्य विभागांकडे वर्ग करीत असल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ महापुरुषांच्या नावावर रुग्णालय किंवा एखादा प्रकल्प असो, किंवा त्यांची स्मारके व ऐतिहासिक स्थळांचा विकासाच्या नावावर हा निधी वळविला जात आहे. तर मागील दहा वर्षात अनुसूचित जाती योजनेचे जवळपास १९ हजार कोटी रुपये अखर्चित ठेवून परत करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर सन २०१९-२० मध्ये मंजूर करण्यात आलेल्या ९२०८ कोटीपैकी २४११ कोटी रुपये अखर्चित ठेवून परत करण्यात आले. दुसरीकडे बौद्ध-अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही. बार्टीच्या विविध केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फेलोशिप रोखून ठेवण्यात आली. परदेशी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभार्थीची संख्या अजूनही वाढलेली नाही. बौद्ध-अनुसूचित जातीच्या औद्योगिक सहकारी संस्थांना उद्योग उभारणीसाठी देण्यात यावयाच्या अर्थसहाय्याची योजना पूर्णतः स्थगित करण्यात आली आहे. बौद्ध-अनुसूचित जातीच्या अशा अनेक विकासात्मक योजना सरकारने रोखून धरल्या आहेत व दुसरीकडे स्मारके बांधण्यासाठी, तीर्थस्थळ विकासासाठी कोट्यवधी रक्कमेचे वाटप अनुसूचित जाती योजनेच्या निधीतून करण्यात येत आहे. त्यामुळे आंबेडकरी संघटनांमध्ये असंतोष पसरला असून, सामाजिक न्याय विभागाच्या मूळ योजनांवरच खर्च व्हावा, अशी मागणी लावून धरली असून, यासंदर्भात विविध सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्र्यांसह सामाजिक न्याय विभागाकडेही लेखी तक्रार केली आहे.

- महापुरुषांना विभागापुरते मर्यादित करू नये

महापुरुष सगळ्यांचेच असतात, त्यांना विभागापुरते मर्यादित करू नये. त्यांचे स्मारकासाठी जनरल फंड वापरला पाहिजे. ऐतिहासिक स्थळांचा विकाससुद्धा जनरल फुंडातून केला पाहिजे. सरकारची तीर्थस्थळे विकास तसेच पर्यटन स्थळे विकास अशी योजना आहे. त्यासाठी डीपीसीमार्फत निधी देऊन विकास केला जाऊ शकतो. दीक्षाभूमीसारख्या जागतिक कीर्तीच्या ऐतिहासिक स्थळांचा विकास सरकारने जनरल फुंडातून केला पाहिजे. रुग्णालयाचा वापर हा सर्वांसाठी राहणार आहे. तेव्हा त्यासाठी आरोग्य विभाग किंवा शासनाने निधी द्यावा.

ई.झेड. खोब्रागडे

माजी सनदी अधिकारी,

- अनुसूचित जातीच्या बजेटचा कायदा करावा

राज्य सरकारला अनुसूचित जातीच्या लोकांचा खरच विकास करायचा असेल तर तेलंगणा राज्याच्या धर्तीवर अनुसूचित जातीच्या बजेटचा लवकरात लवकर कायदा करावा. जेणेकरून हा निधी दुसरीकडे वळविला जाणार नाही.

-अतुल खोब्रागडे

परिवर्तन संघटन ,नागपूर.

टॅग्स :historyइतिहासGovernmentसरकार