शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

लॉकडाऊनची मुदत वाढल्याने सलून व्यावसायिक झाले पुन्हा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 20:19 IST

Salon man became helpless राज्य सरकारने लॉकडाऊनची मुदत पुन्हा १५ दिवस वाढविल्याने सलून व्यावसायिक हतबल झाले आहेत. मागील १५ दिवसात कसलीही शासकीय मदत मिळाली नसतानाही तग धरून दिवस काढणाऱ्या या व्यावसायिकांवर भविष्यात उपासमार ओढावण्याची पाळी येणार आहे.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील ४० हजारांवर कारागिरांपुढचे संकट टळेना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारने लॉकडाऊनची मुदत पुन्हा १५ दिवस वाढविल्याने सलून व्यावसायिक हतबल झाले आहेत. मागील १५ दिवसात कसलीही शासकीय मदत मिळाली नसतानाही तग धरून दिवस काढणाऱ्या या व्यावसायिकांवर भविष्यात उपासमार ओढावण्याची पाळी येणार आहे.

नागपूर जिल्ह्यामध्ये १७ ते २० हजार सलून दुकाने आहेत. शहरामध्ये १० हजारांच्या जवळपास तर ग्रामीण भागात ७ ते ९ हजार दुकाने आहेत. या दुकानांमध्ये सुमारे ४० हजार सलून कारागीर, दुकानदार वर्ग काम करतो. मागील १५ दिवसांपासून हा व्यवसाय ठप्प आहे. राज्यात ‘ब्रेक द चेन’ लागू करताना दुर्बल घटकांना आणि कारागपर, लघु व्यावसायिकांना अर्थसकहाय्य देण्याची घोषणा सरकारने केली होती. प्रत्यक्षात मागणी करूनही सलून व्यावसायिकांचा या मदतीमध्ये विचार झाला नाही. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये तब्बल सात महिने व्यवसाय बंद होता. यामुळे अनेकजण कर्जबाजारी झाले. राज्यभरातील सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या. नागपुरात आणि विदर्भातही आत्महत्यांच्या घटना घडल्या. हा अनुभव लक्षात घेता यावेळी लॉकडाऊन लागू करताना सरकारकडून अर्थसाहाय्य मिळण्याची अपेक्षा होती. मात्र आंदोलने करूनही ही मागणी दुर्लक्षित ठरली.

लॉकडाऊनला पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ मिळाल्याने सलून कारागीर वर्गाचा संयम सुटला आहे. जगण्याचा आणि कुटुंबाला जगविण्याचा प्रश्न या वर्गासमोर असल्याने जटील सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. ही अवस्था लक्षात घेऊन सरकारने सर्व सलून कारागीर, दुकानदारांना अर्थसाहाय्य द्यावे, अशी मागणी नागपुरातील सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे.

सरकारने उपवासाने मारू नये : संघटनांची मागणी

मागील वर्षीच्या लाॅकडाऊनमध्ये समाजसेवी संस्थांकडून धान्याच्या किटवाटपाची मदत झाली. यंदा परिस्थिती विपरीत आहे. रुग्णसंख्या वाढली आहे. उपचारासाठी पैसा नाही. आजाराने मरण्यासोबतच सरकारने समाजातील कारागिरांना आणि व्यावसायिकांना उपवासाने मारू नये, अशी भावनिक विनंती सामाजिक संघटनांनी केली आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष श्याम आस्करकर, नाभिक एकता मंचचे संस्थापक-अध्यक्ष धनराज वालुकार, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सतीश तलवारकर आदींनी संघटनांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्याची तयार दर्शविली आहे. लॉकडाऊन काळात सरकारने अनुदान द्यावे, दुकानदारांचे हाल ओळखावे, पॅकेजबद्दल सहानुभूतीने विचार करावा, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर