शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
3
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
4
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
5
दिल्ली स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठ रडारवर; 200 हून अधिक शिक्षक-डॉक्टरांची चौकशी
6
सिबिल स्कोअर कमी आहे? काळजी करू नका! 'या' ५ मार्गांनी तुम्हाला कमी स्कोअरवरही मिळू शकते कर्ज
7
Gold Silver Price 20 Nov: सोन्या-चांदीचे दर धडाम, Silver २२८० रुपयांनी स्वस्त; Gold मध्येही मोठी घसरण, पाहा नवे दर
8
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर तेजस्वी यादव यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'नवीन सरकारने आपली आश्वासने पूर्ण करावीत'
9
"मी मुलींसारखा चालायचो आणि बोलायचो", करण जोहरचा मोठा खुलासा, म्हणाला- "पुरुषांसारखं बोलण्यासाठी मी ३ वर्ष ..."
10
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
11
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
12
Crime: भाचीचा लग्नासाठी तगादा अन् मामा संतापला; धावत्या रेल्वेतून ढकलले!
13
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
14
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
15
पार्थ पवारांसाठी दुय्यम निबंधकांचा 'हातभार', जमीन स्थावर मालमत्ता असताना दाखवली जंगम, गैरवापर केल्याचे अहवालातून स्पष्ट
16
Social Media: 16 वर्षाखाली मुलांचे इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंट बंद होणार, मेटाने ऑस्ट्रेलियासाठी का घेतला निर्णय?
17
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
18
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
19
ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…
20
"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनची मुदत वाढल्याने सलून व्यावसायिक झाले पुन्हा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 20:19 IST

Salon man became helpless राज्य सरकारने लॉकडाऊनची मुदत पुन्हा १५ दिवस वाढविल्याने सलून व्यावसायिक हतबल झाले आहेत. मागील १५ दिवसात कसलीही शासकीय मदत मिळाली नसतानाही तग धरून दिवस काढणाऱ्या या व्यावसायिकांवर भविष्यात उपासमार ओढावण्याची पाळी येणार आहे.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील ४० हजारांवर कारागिरांपुढचे संकट टळेना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारने लॉकडाऊनची मुदत पुन्हा १५ दिवस वाढविल्याने सलून व्यावसायिक हतबल झाले आहेत. मागील १५ दिवसात कसलीही शासकीय मदत मिळाली नसतानाही तग धरून दिवस काढणाऱ्या या व्यावसायिकांवर भविष्यात उपासमार ओढावण्याची पाळी येणार आहे.

नागपूर जिल्ह्यामध्ये १७ ते २० हजार सलून दुकाने आहेत. शहरामध्ये १० हजारांच्या जवळपास तर ग्रामीण भागात ७ ते ९ हजार दुकाने आहेत. या दुकानांमध्ये सुमारे ४० हजार सलून कारागीर, दुकानदार वर्ग काम करतो. मागील १५ दिवसांपासून हा व्यवसाय ठप्प आहे. राज्यात ‘ब्रेक द चेन’ लागू करताना दुर्बल घटकांना आणि कारागपर, लघु व्यावसायिकांना अर्थसकहाय्य देण्याची घोषणा सरकारने केली होती. प्रत्यक्षात मागणी करूनही सलून व्यावसायिकांचा या मदतीमध्ये विचार झाला नाही. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये तब्बल सात महिने व्यवसाय बंद होता. यामुळे अनेकजण कर्जबाजारी झाले. राज्यभरातील सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या. नागपुरात आणि विदर्भातही आत्महत्यांच्या घटना घडल्या. हा अनुभव लक्षात घेता यावेळी लॉकडाऊन लागू करताना सरकारकडून अर्थसाहाय्य मिळण्याची अपेक्षा होती. मात्र आंदोलने करूनही ही मागणी दुर्लक्षित ठरली.

लॉकडाऊनला पुन्हा १५ दिवसांची मुदतवाढ मिळाल्याने सलून कारागीर वर्गाचा संयम सुटला आहे. जगण्याचा आणि कुटुंबाला जगविण्याचा प्रश्न या वर्गासमोर असल्याने जटील सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. ही अवस्था लक्षात घेऊन सरकारने सर्व सलून कारागीर, दुकानदारांना अर्थसाहाय्य द्यावे, अशी मागणी नागपुरातील सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी केली आहे.

सरकारने उपवासाने मारू नये : संघटनांची मागणी

मागील वर्षीच्या लाॅकडाऊनमध्ये समाजसेवी संस्थांकडून धान्याच्या किटवाटपाची मदत झाली. यंदा परिस्थिती विपरीत आहे. रुग्णसंख्या वाढली आहे. उपचारासाठी पैसा नाही. आजाराने मरण्यासोबतच सरकारने समाजातील कारागिरांना आणि व्यावसायिकांना उपवासाने मारू नये, अशी भावनिक विनंती सामाजिक संघटनांनी केली आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष श्याम आस्करकर, नाभिक एकता मंचचे संस्थापक-अध्यक्ष धनराज वालुकार, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सतीश तलवारकर आदींनी संघटनांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्याची तयार दर्शविली आहे. लॉकडाऊन काळात सरकारने अनुदान द्यावे, दुकानदारांचे हाल ओळखावे, पॅकेजबद्दल सहानुभूतीने विचार करावा, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर