शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
5
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
6
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
7
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
8
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
9
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
10
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
11
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
12
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
13
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
14
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
15
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
16
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
17
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
18
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
19
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
20
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नोटीफायबल डिसीज म्हणून कॅन्सरची नोंद होण्याची गरज व्यक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 12:34 IST

कर्करोग ‘नोटीफायबल डिसीज’मध्ये येत नाही. परिणामी कुठला कर्करोग वाढत आहे, किती रुग्ण आहेत याची नोंदच होत नसल्याने या रोगावरील नियंत्रणात शासन कमी पडत आहे, असे मत मेडिकलच्या कर्करोग विभागाचे प्राध्यापक डॉ. कृष्णा कांबळे यांनी येथे मांडले.

ठळक मुद्देनागपूर मेडिकल कॉलेजच्या कृष्णा कांबळे यांचे मतनागपुरात जागतिक कर्करोग दिन साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात ‘एचआयव्ही’, स्वाईन फ्लू आदी रोगांची ‘नोटीफायबल डिसीज’ म्हणून नोंद होते. त्यामुळे या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनस्तरावर व्यापक प्रयत्न होतात, परंतु कर्करोग ‘नोटीफायबल डिसीज’मध्ये येत नाही. परिणामी कुठला कर्करोग वाढत आहे, किती रुग्ण आहेत याची नोंदच होत नसल्याने या रोगावरील नियंत्रणात शासन कमी पडत आहे, असे मत मेडिकलच्या कर्करोग विभागाचे प्राध्यापक डॉ. कृष्णा कांबळे यांनी येथे मांडले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) कर्करोग विभागाच्यावतीने जागतिक कर्करोग दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. मंचावर कर्करोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक दिवाण, पीएसएम विभागाचे प्रमुख डॉ. उदय नार्लावार, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्यअधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. लांजेवार, डॉ. पी.आर. भातकुले आदी उपस्थित होते.डॉ. अशोक दिवाण म्हणाले, कॅन्सरबद्दल आजही लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. अनेक प्रकारच्या काल्पनिक किंवा केवळ ऐकिवात असलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून असतात. परंतु प्रारंभिक अवस्थेत कर्करोगाचे निदान झाल्यास कर्करोग बरा होऊ शकतो. नवीन आणि महत्त्वपूर्ण संशोधनानी कॅन्सरला मोठ्या प्रमाणात उपाचारयोग्य बनविले आहे. आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि प्रभावी औषधे या सर्वांमुळे आता कॅन्सरसोबत सामान्य जीवन जगणे शक्य आहे, असेही ते म्हणाले.डॉ. उदय नार्लावार म्हणाले, सुरुवातीलाच कॅन्सरचे निदान झाल्यास उपचाराची यशस्विता वाढते, परंतु उशीर झाल्यास कॅन्सरची गुंतागुंत वाढून उपचाराची यशस्विताही कमी होते. यामुळे प्रत्येकाने कॅन्सरविषयी जास्तीतजास्त माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. संचालन श्याम पंजाला यांनी केले. कर्करोग विभागात आयोजित या कार्यक्रमाला मोठ्या संख्येत रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप रुग्णांना फळांचे वाटप करून करण्यात आले.

टॅग्स :cancerकर्करोगHealthआरोग्य