शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

मायक्रो फायन्सान्स कंपन्यांकडून ग्रामस्थांची पिळवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 00:16 IST

ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्यां(सूक्ष्म पतपुरवठा संस्था)चा चांगलाच सुळसुळाट आहे. कुठल्याही कागदपत्रांविना या संस्था ग्रामस्थांना कर्जपुरवठा करतात. या पतपुरवठा संस्थांकडून सध्या कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे ग्रामस्थांची प्रचंड मानसिक पिळवणूक होत आहे. यात सर्वाधिक ग्रामीण भागातील महिला टार्गेट होत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्यां(सूक्ष्म पतपुरवठा संस्था)चा चांगलाच सुळसुळाट आहे. कुठल्याही कागदपत्रांविना या संस्था ग्रामस्थांना कर्जपुरवठा करतात. या पतपुरवठा संस्थांकडून सध्या कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे ग्रामस्थांची प्रचंड मानसिक पिळवणूक होत आहे. यात सर्वाधिक ग्रामीण भागातील महिला टार्गेट होत आहेत.महिला बचत गटांचे सक्षमीकरण करण्याकरिता  बँकांसोबत केंद्र शासनाद्वारे काही खासगी संस्थांना सूक्ष्म पतपुरवठा करण्याची परवानगी दिली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये मोठ्या संख्येने मायक्रो फायनान्स कंपन्या पतपुरवठा करीत आहेत. कागदपत्रांची कुठलीही अट न लादता १० हजारापासून ते लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मात्र त्यावर वर्षाला २४ टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जाते. कर्जाची वसुली चक्रवाढ व्याजाने करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनामुळे ग्रामीण भागात रोजगार ठप्प पडले आहेत. दोन वेळेचे पोट कसेबसे भरले जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना विशेष करून ग्रामीण भागातील महिला बचत गटांना या मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरता आले नाहीत. आता लॉकडाऊन उघडला तरी, अजूही हाताला काम मिळाले नाही. पण मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या पथकांकडून वसुलीचा तगादा लावला जात आहे. मनसर तालुक्यातील एका महिलेने केलेल्या तक्रारीनुसार तिच्या पतीचा पानठेल्याचा व्यवसाय होता. तिने या कंपन्यांकडून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. तीन महिन्यांपासून पानठेला बंद असल्याने कर्जाचे हप्ते ती भरू शकली नाही. आता कंपन्यांचे पथक येऊन चक्रवाढ व्याजाने वसुली करण्यात येईल, असे सांगून कर्जाचे हप्ते भरा असे सांगत आहे.सध्या देशात सुरू असलेल्या कोविड-१९ वैश्विक महामारीच्या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जाच्या वसुलीसाठी तगादा लावू नये, कर्जदारांना व्याजातून सहा महिन्यांची सूट देण्याबाबत दिशानिर्देश दिलेले आहेत. तरीही जिल्ह्यातील ग्रामीण भागात सूक्ष्म पतपुरवठा करणाऱ्या या खासगी कंपन्यांकडून ग्रामीण भागातील महिलांच्या घरी वसुलीकरिता तगादा लावण्यात येत असून, त्यांची प्रचंड मानसिक पिळवणूक करण्यात येत आहे.ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेज. या खासगी कंपन्यांवर कुणाचाही अंकुश नाही. त्यामुळे अधिकाराचा गैरवापर करीत आहेज. यात गरीब महिलांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे अशा कंपन्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवून कार्यवाही करावी, अशी मागणी पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे.गज्जू यादव, महासचिव, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटी

टॅग्स :nagpurनागपूर