शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या समतोल प्रादेशिक विकासासाठी तज्ज्ञ समिती; घोषणांसोबतच अंमलबजावणीचाही निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 05:18 IST

एन. चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेत सल्लागार परिषद स्थापन करणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची करण्यासाठी टाटा सन्सचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषद स्थापन करण्यात येईल. राज्य विकासाचे २०४७ पर्यंतचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मित्र ही संस्था येत्या १ जानेवारीपासून सुरू होईल. तसेच राज्याच्या समतोल प्रादेशिक विकासासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली जाईल, अशा महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केल्या.

देश मजबूत होण्यासाठी महाराष्ट्र मजबूत हवा. विदर्भ मजबूत तर महाराष्ट्र मजबूत, विदर्भाचे माझ्या हृदयात विशेष स्थान आहे, अशी भावना व्यक्त करतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी विदर्भ विकासाच्या घोषणांचा  पाऊस तर पाडलाच पण या घोषणांची कालबद्ध पूर्तता केली जाईल, असा निर्धारही व्यक्त केला. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मूल्य साखळ्या स्थापन करण्यासाठी तीन हजार कोटी रुपये सरकार देईल, असे ते म्हणाले. सत्तापक्ष आणि विरोधकांच्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी हे घोषणाच नाही तर काम करणारे सरकार आहे, असे सुनावले.

समृद्धी महामार्ग विविध राज्यांनादेखील जोडणार

- आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांपर्यंत समृद्धी महामार्गाचा विस्तार केला जाईल. नांदेड, जालना, अमरावती, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत तो नेला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. समृद्धीचा गोसीखुर्द प्रकल्प होऊ द्यायचा नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना हाणला.

- मुख्यमंत्र्यांच्या घोषणांना फडणवीसांचीही साथ शिंदे यांच्यापूर्वी उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक न्याय, ऊर्जा क्षेत्रासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा केल्या. विदर्भ, मराठवाड्याच्या विकासासाठी एक पैसाही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

खचू नको तू बळीराजा, धरू एकमेकांचे हात रे

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एक सर्वंकष धोरण तयार केले जात आहे. ते लवकरच जाहीर केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘खचू नको तू बळीराजा, धरू एकमेकांचे हात रे, आली संकटे कितीही त्यावर, सोबत करू मात रे’, या ओळींतून त्यांनी शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले.

विधानसभाध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव

विधानसभेत विरोधकांना बोलण्याची संधी न देता एकतर्फी सभागृह चालवले जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. विधिमंडळ सचिवांकडे हा अविश्वास ठराव देण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांकडून अध्यक्षांवर एकतर्फी कामकाज चालवले जात असल्याचा आरोप केला जात आहे. अनेकदा विधानसभेत विरोधकांना बोलण्याची संधी न देता सत्ताधारी आमदारांना बोलण्याची संधी दिली जात असल्याचा आरोप विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांवर केला आहे.

विकास मंडळाच्या पुनर्गठनासाठी केंद्राला विनंती

विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या समतोल विकासाबाबत सरकारला शिफारशी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल. या आधी दांडेकर समिती व नंतर डॉ. विजय केळकर समिती नेमण्यात आली होती. राज्यातील तिन्ही विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्राला विनंती केली असून ते होताच अनुशेषासंबंधीची समिती स्थापन केली जाईल. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनEknath Shindeएकनाथ शिंदे