शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

राज्याच्या समतोल प्रादेशिक विकासासाठी तज्ज्ञ समिती; घोषणांसोबतच अंमलबजावणीचाही निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2022 05:18 IST

एन. चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेत सल्लागार परिषद स्थापन करणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरची करण्यासाठी टाटा सन्सचे अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक सल्लागार परिषद स्थापन करण्यात येईल. राज्य विकासाचे २०४७ पर्यंतचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मित्र ही संस्था येत्या १ जानेवारीपासून सुरू होईल. तसेच राज्याच्या समतोल प्रादेशिक विकासासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली जाईल, अशा महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केल्या.

देश मजबूत होण्यासाठी महाराष्ट्र मजबूत हवा. विदर्भ मजबूत तर महाराष्ट्र मजबूत, विदर्भाचे माझ्या हृदयात विशेष स्थान आहे, अशी भावना व्यक्त करतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी विदर्भ विकासाच्या घोषणांचा  पाऊस तर पाडलाच पण या घोषणांची कालबद्ध पूर्तता केली जाईल, असा निर्धारही व्यक्त केला. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मूल्य साखळ्या स्थापन करण्यासाठी तीन हजार कोटी रुपये सरकार देईल, असे ते म्हणाले. सत्तापक्ष आणि विरोधकांच्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना शिंदे यांनी हे घोषणाच नाही तर काम करणारे सरकार आहे, असे सुनावले.

समृद्धी महामार्ग विविध राज्यांनादेखील जोडणार

- आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांपर्यंत समृद्धी महामार्गाचा विस्तार केला जाईल. नांदेड, जालना, अमरावती, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत तो नेला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. समृद्धीचा गोसीखुर्द प्रकल्प होऊ द्यायचा नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना हाणला.

- मुख्यमंत्र्यांच्या घोषणांना फडणवीसांचीही साथ शिंदे यांच्यापूर्वी उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक न्याय, ऊर्जा क्षेत्रासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा केल्या. विदर्भ, मराठवाड्याच्या विकासासाठी एक पैसाही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.

खचू नको तू बळीराजा, धरू एकमेकांचे हात रे

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एक सर्वंकष धोरण तयार केले जात आहे. ते लवकरच जाहीर केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ‘खचू नको तू बळीराजा, धरू एकमेकांचे हात रे, आली संकटे कितीही त्यावर, सोबत करू मात रे’, या ओळींतून त्यांनी शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले.

विधानसभाध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव

विधानसभेत विरोधकांना बोलण्याची संधी न देता एकतर्फी सभागृह चालवले जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे. विधिमंडळ सचिवांकडे हा अविश्वास ठराव देण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांकडून अध्यक्षांवर एकतर्फी कामकाज चालवले जात असल्याचा आरोप केला जात आहे. अनेकदा विधानसभेत विरोधकांना बोलण्याची संधी न देता सत्ताधारी आमदारांना बोलण्याची संधी दिली जात असल्याचा आरोप विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांवर केला आहे.

विकास मंडळाच्या पुनर्गठनासाठी केंद्राला विनंती

विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या समतोल विकासाबाबत सरकारला शिफारशी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्यात येईल. या आधी दांडेकर समिती व नंतर डॉ. विजय केळकर समिती नेमण्यात आली होती. राज्यातील तिन्ही विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्राला विनंती केली असून ते होताच अनुशेषासंबंधीची समिती स्थापन केली जाईल. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनEknath Shindeएकनाथ शिंदे