शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

सबकुछ ‘वेटिंग’, जागेसाठी ‘सेटिंग’

By admin | Updated: November 13, 2015 02:41 IST

शिक्षण, रोजगारासाठी मुंबई-पुण्यात राहणारे हजारो तरुण-तरुणी दिवाळीसाठी उपराजधानीत पोहोचले आहेत.

मुंबई, पुण्याकडे परतण्यासाठी धडपड : बस तिकिटांचे दर विमानाएवढेनागपूर : शिक्षण, रोजगारासाठी मुंबई-पुण्यात राहणारे हजारो तरुण-तरुणी दिवाळीसाठी उपराजधानीत पोहोचले आहेत. दिवाळीचे पाच दिवस संपायचे असले तरी मात्र यातील अनेकांना आता चिंता लागली आहे ती परत जाण्याच्या व्यवस्थेची. जवळपास सर्वच मार्गांवरील बस, रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. खासगी बसेसचे दर दोन हजारांपर्यंत पोहोचले आहेत. अशास्थितीत ‘कन्फर्म’ जागा मिळविण्यासाठी धडपड सुरू असल्याचे दिसून येत आहे.दिवाळीत प्रवाशांची होणारी भरमसाट गर्दी पाहता, रेल्वे प्रशासनाने मुंबई तसेच पुण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यासाठी तर शुक्रवारी आणि सोमवारी विशेष गाडी आहे. परंतु सोमवारी कार्यालयात जायचे असल्यामुळे बहुतांश जण शनिवार किंवा रविवारी निघण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे विशेष गाडीमध्ये जागा असूनदेखील ती फायद्याची नसल्याचे मत काही तरुणांनी व्यक्त केले. एसटी महामंडळानेही पुणेसाठी विशेष बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. परंतु ‘एसटी’च्या बसेसची अवस्था लक्षात घेता १६ ते १८ तास प्रवास केल्यानंतर लगेच कार्यालयात जाणार कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अखेरचा पर्याय म्हणून ‘एसटी’ला प्राधान्य देण्यात येत आहे.त्यामुळे नाईलाजाने खासगी ट्रॅव्हल्सकडे प्रवाशांचा ओढा कायम असल्याची स्थिती पाहावयास मिळत आहे. पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसचे भाडे तीन हजारांहून अधिक पर्यंत पोहोचले आहे. दररोज पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ‘हाऊसफुल्ल’ होत असून, भाड्यात दुप्पट ते तिप्पट वाढ करण्यात आली आहे.त्यामुळे कशाही परिस्थितीत रेल्वेचे तिकीट मिळावे यासाठी तरुणाईची धडपड सुरू आहे. यासाठी वेगवेगळ््या ‘ट्रॅव्हल एजन्सी’, दलाल इत्यादींशी संपर्क साधण्यात येत आहे. परंतु त्यांच्याकडून तिकिटासाठीच्या ‘कमिशन’चे दर वाढवून देण्यात आलेले आहेत.एकेका तिकिटामागे चक्क हजारांहून अधिकचे ‘कमिशन’ घेण्यात येत आहे. काही जणांनी तर चक्क ‘व्हीआयपी’ तिकिटांसाठी ‘सेटिंग’ सुरू केली आहे. परंतु या तिकिटांची संख्या कमी असल्यामुळे यातील किती जणांचे तिकीट ‘कन्फर्म’ होतील हा देखील प्रश्नच आहे. (प्रतिनिधी)विमानाचे दर आवाक्याबाहेरबसच्या तिकिटांचे दर विमानाएवढे झाले आहेत. परंतु विमानाचे दर तर आवाक्याबाहेर पोहोचले आहेत. शनिवारी पुण्याला जाणाऱ्या विमानांचे दर आठ हजारांहून अधिक आहेत, तर रविवारचे दर तर चक्क दहा हजारांपर्यंत पोहोचले आहेत. मुंबईच्या तिकिटांचे दर तर चक्क १२ ते १५ हजारांच्या घरात आहेत.