शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दरवर्षी ६० लाख हृदयरोग रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 20:08 IST

देशात हृदयरोगाचे तीन कोटींच्यावर रुग्ण आहेत. यात दरवर्षी सुमारे ६० लाख नव्या हृदयरोग रुग्णांची भर पडत आहे. अनेकांना आपण हृदयरोगाचे रुग्ण आहोत हे हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आल्यानंतरच कळते. विशेष म्हणजे, याकडे वेळीच लक्ष न दिल्यास २०२५पर्यंत तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण १२० ते १२५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता हृदयरोग तज्ज्ञांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देहार्ट अटॅकचे प्रमाण १२५ टक्क्यांनी वाढणार : युवकांमध्ये वाढतोय आजारजागतिक हृदय रोगदिवस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात हृदयरोगाचे तीन कोटींच्यावर रुग्ण आहेत. यात दरवर्षी सुमारे ६० लाख नव्या हृदयरोग रुग्णांची भर पडत आहे. अनेकांना आपण हृदयरोगाचे रुग्ण आहोत हे हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आल्यानंतरच कळते. विशेष म्हणजे, याकडे वेळीच लक्ष न दिल्यास २०२५पर्यंत तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण १२० ते १२५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता हृदयरोग तज्ज्ञांनी व्यक्त केली.हृदयरोग होणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. त्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम हे प्रतिबंधात्मक उपाय आयोजले पाहिजेत. चरबीयुक्त पदार्थांचे सेवन टाळावे. साखरेचे प्रमाण वाढू देऊ नये. जीवनात ताणतणाव निर्माण होतील असे प्रसंग टाळावे. रागाला आवर घालणे, पथ्य पाळणे व वजन नियंत्रित ठेवणे या गोष्टी आचरणात आणणे आवश्यक आहे. चाळीशी गाठलेल्या प्रत्यकाने नियमित रक्तदाब, ईसीजी, इको व टीएमटीची चाचणी करणे आवश्यक आहे, असे आवाहन शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञानी केले आहे.भारतात ३२ टक्के मृत्यू हृदयविकारामुळे-डॉ. संचेतीहृदय शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती म्हणाले, भारतात दरवर्षी ३२ टक्के मृत्यू हृदयविकारामुळे होतो. देशात एक लाख लोकसंख्यामध्ये २७२ रुग्ण हे हृदयविकाराचे असतात. भारतात साधारण तीन कोटी लोक हृदयविकाराने ग्रासले आहेत. २०१६ मध्ये १७ लाख भारतीयांचा मृत्यू हृदयविकाराने झाला आहे. हृदयरोगापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तंबाखूचे व्यसन, धूम्रपान, स्थूलतेचे प्रमाण टाळले पाहिजेत.८० टक्के हृदयरोग टाळता येतो-डॉ. अर्नेजाप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जसपाल अर्नेजा म्हणाले, हृदयविकाराच्या रुग्णांत दिवसेगणिक वाढ होत आहे. विशेषत: कमी वयात हा आजार दिसून येत असल्याने चिंताजनक स्थिती आहे. यामुळे आता प्रत्येकाने हृदयाशी मैत्री करणे आवश्यक आहे. यासाठी तीन गोष्टी आत्मसात करायला हव्यात. पहिले म्हणजे, ‘अ‍ॅक्टिव्ह लाईफ’ म्हणजे नियमित व्यायाम, दुसरे तंबाखू व सिगारेटपासून मुक्ती आणि तिसरे म्हणजे खाण्यावर नियंत्रण ठेवून आहारात समतोल साधणे. या गोष्टींचे पालन झाल्यास ८० टक्के हृदयरोग दूर ठेवणे शक्य आहे.हृदयविकार तज्ज्ञ डॉ. मोहन नेरकर म्हणाले, तीन पुरुषांच्या तुलनेत एका महिलेला हृदयविकाराचा आजार होऊ शकतो. विशेषत: रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये हृदयविकाराची जोखीम वाढते. महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर ‘इस्ट्रोजेन’ या हार्मोनची पातळी कमी होते. त्याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. महिलांसोबतच पन्नाशीच्या आतील पुरुषांमध्ये हृदयविकार वाढत आहे. रुग्णालयात येणाऱ्या दोन हजार रुग्णांमध्ये साधारण १० टक्के पुरुष रुग्ण हे हृदयविकाराच्या तक्रारी घेऊन येतात.वाढत्या व्यसनामुळे युवकांमध्ये हृदयरोग-डॉ. वाशिमकरकार्डिओलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया विदर्भ शाखेचे अध्यक्ष डॉ. सुनील वाशिमकर म्हणाले, युवा वर्ग देशाचा मुख्य आधारस्तंभ आहे. मात्र, अयोग्य जीवनशैली व वाढत्या व्यसनामुळे त्यांच्यात हृदयरोग बळावत चालला आहे. जे युवक खूप जास्त तंबाखू आणि दारूचे सेवन करतात, जंक फूड खातात, व्यायाम करीत नाही त्यांना हृदयाचे आजार होतात, हे सत्य आहे. परंतु हे सुद्धा पहायला मिळत आहे की, जे युवक निरोगी दिसतात, ज्यांना कुठलेच व्यसन नाही, त्यांच्यामध्येही हृदयाचे विकार होतात. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे वाढलेले प्रदूषण होय.

 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाnagpurनागपूर