शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक नागरिकाला धार्मिक मिरवणूक काढण्याचा अधिकार

By admin | Updated: October 27, 2016 02:12 IST

भारत हा धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेला देश असून येथील प्रत्येक नागरिकाला त्याच्या विश्वासानुसार धार्मिक व धर्माशी संबंध नसलेली मिरवणूक

हायकोर्टाचे मत : कुणालाही प्रतिबंध करता येणार नाहीनागपूर : भारत हा धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेला देश असून येथील प्रत्येक नागरिकाला त्याच्या विश्वासानुसार धार्मिक व धर्माशी संबंध नसलेली मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात व्यक्त केले आहे. कोणालाही अशाप्रकारची मिरवणूक काढण्यापासून थांबविता येणार नाही, असेही निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांनी हा निर्णय दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती संपूर्ण जगात साजरी केली जात आहे. परंतु, मालेगाव तालुक्यातील (जि. वाशीम) पांगरी नवघरे गावात बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. गावातील जातीय भेदभावामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे कारण प्रशासनाने परवानगी नाकारताना दिले होते. न्यायालयाने हा प्रश्न निकाली काढताना वरीलप्रमाणे मत नोंदविले. या गावात बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यासाठी ५ नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. ही मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी वाशीम जिल्हा पोलीस अधीक्षक व मालेगाव पोलीस निरीक्षकांनी आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरवावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच, अन्य समाजाच्या नागरिकांनी मिरवणुकीला सहकार्य करावे असे सांगितले आहे. नियमापेक्षा जास्त आवाज होणार नाही अशा पद्धतीने मिरवणुकीत साऊंड सिस्टिम वापरण्याची आयोजकांना अनुमती देण्यात आली आहे. डी. जे. वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयावर अंमलबजावणी झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी प्रकरणावर १६ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)असे आहे प्रकरणयाविषयी रामदास वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, पांगरी नवघरे गावातील लोकसंख्या ३८०० असून यापैकी केवळ ५०० लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. गावात बाबासाहेबांच्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम आयोजित करण्यास नेहमीच विरोध होतो. २००७ मध्ये यावरून मोठा वाद झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे नोंदविले होते. तेव्हापासून गावात कोणत्याही धर्माच्या मिरवणुका निघाल्या नाहीत. यंदा बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०१६ रोजी मिरवणूक काढण्याची परवानगी मिळण्यासाठी ५ एप्रिल २०१६ रोजी मालेगाव पोलीस ठाण्यात अर्ज सादर करण्यात आला होता. परंतु, कायदा व सुव्यवस्थेचे कारण देऊन हा अर्ज नामंजूर करण्यात आला होता. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रदीप वाठोरे तर, शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता एम. जे. खान यांनी बाजू मांडली.