शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

प्रत्येक नागरिकाला धार्मिक मिरवणूक काढण्याचा अधिकार

By admin | Updated: October 27, 2016 02:12 IST

भारत हा धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेला देश असून येथील प्रत्येक नागरिकाला त्याच्या विश्वासानुसार धार्मिक व धर्माशी संबंध नसलेली मिरवणूक

हायकोर्टाचे मत : कुणालाही प्रतिबंध करता येणार नाहीनागपूर : भारत हा धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेला देश असून येथील प्रत्येक नागरिकाला त्याच्या विश्वासानुसार धार्मिक व धर्माशी संबंध नसलेली मिरवणूक काढण्याचा अधिकार आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात व्यक्त केले आहे. कोणालाही अशाप्रकारची मिरवणूक काढण्यापासून थांबविता येणार नाही, असेही निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांनी हा निर्णय दिला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती संपूर्ण जगात साजरी केली जात आहे. परंतु, मालेगाव तालुक्यातील (जि. वाशीम) पांगरी नवघरे गावात बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. गावातील जातीय भेदभावामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे कारण प्रशासनाने परवानगी नाकारताना दिले होते. न्यायालयाने हा प्रश्न निकाली काढताना वरीलप्रमाणे मत नोंदविले. या गावात बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यासाठी ५ नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. ही मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी वाशीम जिल्हा पोलीस अधीक्षक व मालेगाव पोलीस निरीक्षकांनी आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरवावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे. तसेच, अन्य समाजाच्या नागरिकांनी मिरवणुकीला सहकार्य करावे असे सांगितले आहे. नियमापेक्षा जास्त आवाज होणार नाही अशा पद्धतीने मिरवणुकीत साऊंड सिस्टिम वापरण्याची आयोजकांना अनुमती देण्यात आली आहे. डी. जे. वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयावर अंमलबजावणी झाली किंवा नाही हे पाहण्यासाठी प्रकरणावर १६ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)असे आहे प्रकरणयाविषयी रामदास वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्याच्या म्हणण्यानुसार, पांगरी नवघरे गावातील लोकसंख्या ३८०० असून यापैकी केवळ ५०० लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. गावात बाबासाहेबांच्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम आयोजित करण्यास नेहमीच विरोध होतो. २००७ मध्ये यावरून मोठा वाद झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे नोंदविले होते. तेव्हापासून गावात कोणत्याही धर्माच्या मिरवणुका निघाल्या नाहीत. यंदा बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०१६ रोजी मिरवणूक काढण्याची परवानगी मिळण्यासाठी ५ एप्रिल २०१६ रोजी मालेगाव पोलीस ठाण्यात अर्ज सादर करण्यात आला होता. परंतु, कायदा व सुव्यवस्थेचे कारण देऊन हा अर्ज नामंजूर करण्यात आला होता. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रदीप वाठोरे तर, शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता एम. जे. खान यांनी बाजू मांडली.