शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ बंद होण्याच्या स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 20:49 IST

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत चालविल्या जाणाऱ्या योजना गेल्या चार वर्षांपासून जवळपास बंद पडल्या आहेत. परिणामी मातंग समाजातील विद्यार्थी व समाजबांधवांचे मोठे नुकसान होत आहे. सरकारच्या उदासीनतेमुळे हा विभागच धूळखात बसला असून महामंडळच बंद होते की काय, अशी अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देचार वर्षांपासून योजनाच बंद : कसा होणार मातंग समाजाचा विकास?

लोकमत न्यूज नेटवर्कआनंद डेकाटेनागपूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळांतर्गत चालविल्या जाणाऱ्या योजना गेल्या चार वर्षांपासून जवळपास बंद पडल्या आहेत. परिणामी मातंग समाजातील विद्यार्थी व समाजबांधवांचे मोठे नुकसान होत आहे. सरकारच्या उदासीनतेमुळे हा विभागच धूळखात बसला असून महामंडळच बंद होते की काय, अशी अवस्था झाली आहे.राज्यातील मातंग व तत्सम समाजातील लोकांचे जीवनमान उंचावणे आणि समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळविण्याच्या उद्देशाने त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय विभागांतर्गत ११ जुलै १९८५ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली. या महामंडळांतर्गत मातंग समाजाच्या मांग, मातंग, मिनी मादिग, मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी व मादिगा अशा एकूण १२ पोटजातीतील व्यक्तींना अर्थसाहाय्य करण्यात येते. महामंडळ स्थापनेच्या वेळी महामंडळाचे अधिकृत भागभांडवल २.५० कोटी इतके होते. २० डिसेंबर २००६ रोजीच्या निर्णयानुसार ते ७५ कोटीपर्यंत वाढविण्यात आले. २०१३ च्या शासन निर्णयानुसार महामंडळाचे भागभांडवल ३०० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आले. परंतु महामंडळाच्या तत्कालीन अध्यक्षांनी केलेल्या घोटाळ्यापासून या विभागाकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे.महामंडळातर्फे विशेष केंद्रीय अर्थसाहाय्य योजना (एससीए) व बीज भांडवल योजना सोडली तर शिष्यवृत्ती योजना, एनएसएफडीसीच्या योजना यात मुख्यत: मुदत कर्ज योजना, लघु ऋण वित्त योजना, महिला समृद्धी योजना, महिला किसान योजना, शैक्षणिक कर्ज योजना आदी जवळपास सर्वच योजना बंद पडलेल्या आहेत. या योजनांसाठी चार वर्षांपासून निधी येणेच बंद झाला आहे. परिणामी मातंग समाजातील विद्यार्थ्यांसह समाजबांधवांचे मोठे नुकसान होत आहे.महामंडळाचे कार्यालयही पडले ओससामाजिक न्याय भवनात महामंडळाचे जिल्हा व विभागीय कार्यालय आहे. योजनांबाबत विचारणा केली असता कुणीही उघडपणे काही सांगायला तयार नाही. परंतु शासनाकडूनच योजना बंद असल्याचे अधिकारी खासगीत सांगतात. ज्या दोन योजना सुरू आहेत असे सांगितले जाते त्या बँकेच्या कर्ज योजना असून, महामंडळाची पत घसरल्याने बँकही याबाबत उदासीन आहे. परिणामी समाजबांधवांनीही मंडळाकडे पाठ फिरविल्याने हे कार्यालयही ओस पडले आहे.मातंग समाजाला शिक्षा का?साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभऊ साठे विकास मंडळात ज्या व्यक्तीने घोटाळा केला, त्याला शिक्षा मिळालीच पाहिजे; परंतु त्याच शिक्षा समाजाला का?, चार वर्षांपासून महामंडळ जवळपास बंदच आहे. योजना बंद आहे. केवळ कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांचे पगार सुरू आहेत. महामंडळाच्या योजना बंद करून मातंग समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. समाजाची प्रगती पुन्हा ठप्प पडली आहे. समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचे हाल सुरू आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी याकडे विशेष लक्ष देऊन महामंडळाला ५०० कोटी रुपये देऊन अध्यक्ष व संचालक मंडळाची घोषणा करावी तसेच योजना पुन्हा सुरू कराव्यात.संजय कठाळेअध्यक्ष, लहू सेना

 

टॅग्स :nagpurनागपूर