शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

रेल्वेत चढताना मृत्यू झाल्यासही भरपाई, वारसांना दिले आठ लाख 

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: February 6, 2023 12:27 IST

१२ फेब्रुवारी २००६ रोजी एका महिला प्रवाशाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्यामुळे मध्य रेल्वेने पीडित वारसदारांना भरपाई देण्यास हरकत घेतली होती.

राकेश घानोडे -नागपूर : प्रवाशाचा चालत्या रेल्वेत बसताना खाली पडून मृत्यू झाला म्हणून त्याच्या वारसदारांना भरपाई नाकारता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.१२ फेब्रुवारी २००६ रोजी एका महिला प्रवाशाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्यामुळे मध्य रेल्वेने पीडित वारसदारांना भरपाई देण्यास हरकत घेतली होती. रेल्वे कायद्यानुसार ही दुर्दैवी घटना नाही. प्रवाशाने स्वत:हून अपघात करून घेतला. त्यामुळे रेल्वे भरपाई देण्यास जबाबदार नाही, असा दावा न्यायालयात करण्यात आला होता.  प्रवाशाने स्वत:हून अपघात करून घेतला हे मान्य करण्यासाठी प्रवाशाचा तसा उद्देश होता, हे आधी सिद्ध करणे आवश्यक आहे. प्रकरणातील प्रवाशाने आत्महत्या केली, असे रेल्वेचे म्हणणे नाही. त्यामुळे अशा प्रकरणांत रेल्वेची काहीही चूक नसली तरी मृताच्या वारसदारांना भरपाई देणे बंधनकारक आहे, असे न्यायालयाने सांगितले. दीपलक्ष्मी बांधे (५०) असे मृत प्रवाशाचे नाव होते.  न्यायालयाने त्यांच्या वारसदारांना आठ लाख रुपये भरपाई मंजूर केली.

तिकिटाचा मुद्दाही रद्द प्रवासी महिलेकडे रेल्वेचे तिकीट नव्हते हा मुद्दाही न्यायालयाने खारीज केला. केवळ रेल्वे तिकीट मिळाले नाही म्हणून प्रवासी तिकिटाशिवाय रेल्वे प्रवास करीत होती, असे म्हणता येणार नाही. अपघातानंतर तिकीट हरवू शकते, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले.

कायद्यात दुर्दैवी घटनेची व्याख्या -रेल्वे कायद्यातील कलम १२३ (सी) मध्ये दुर्दैवी घटनेची व्याख्या देण्यात आली आहे. त्यानुसार, प्रवासी रेल्वेत, रेल्वे प्रतीक्षा कक्षात, आरक्षण व बुकिंग कार्यालयात, फलाटावर किंवा इतर रेल्वे परिसरात दहशतवादी घातपात घडणे, हिंसक हल्ला घडणे, दरोडा पडणे, दंगल, गोळीबार, जाळपोळ होणे किंवा रेल्वेतून प्रवासी खाली पडणे या घटना दुर्दैवी घटना आहेत. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेCourtन्यायालय