शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

जीव गेला तरी चालेल, पण ओबीसीच्या मुळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, वडेट्टीवार यांचा निर्धार

By कमलेश वानखेडे | Updated: September 5, 2023 15:11 IST

बावनकुळे यांची भूमिका दोन समाजात भांडण लावणारी

नागपूर :मराठा आरक्षणावर लवकर तोडगा काढा. ओबीसींचे आरक्षण वाढवून द्या. आंदोलनस्थळी जाऊन मी हेच बोललो. ओबीसी समाजाची जी भूमिका असेल तीच माझी भूमिका आहे. जीव गेला तरी चालेल, पण ओबीसी कार्यकर्ता म्हणून मुळ आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, असा निर्धार विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

मंगळवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, भुजबळ साहेब म्हणले ओबीसीचे आरक्षण वाढवून देत असल्यास अडचण नाही म्हणून समर्थन दिले. त्यांच्याशी फोनवर बोलणे झाले. सरकार कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊ म्हणतात. पण ३० महिने घेतले तरी हे होऊ शकणार नाही. पांघरून घालण्याचे काम सरकार करत आहे. अशी बनवा बनवी करू नका, अशी टीका त्यांनी केली. सरकार वेगळी भूमिका घेत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे वेगळे बोलतात. दोन समाजात भांडणं लावायची भूमिका बावनकुळे यांची असले तर मराठा समाज ठरवेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

गृहमंत्र्यांनी माफी मागितली पण उशीर केला

- गहमंत्री फडणवीस यांनी माफी मागून चूक मान्य केली, यात मोठेपण दाखवला चांगला आहे. पण उशीर झाला. या माफीसाठी मराठा समाजाला आनंद आहे का ते ठरवतील, असेही वडेट्टीवार म्हणाले. चुकीचे गुन्हे मागे घेऊ असा शब्दाचा खेळ केला जात आहे. सरकारने सरसकट गुन्हे मागे घ्यावे. या सगळ्यांची नार्को टेस्ट करा,पोलीस अधिक्षकांना आदेश कुणी दिला. दोषीला रजा आणि पोलीस उप अधिक्षक निलंबित कसे ? दूध का दूध पाणी का पाणी हे नार्कोतून स्पष्ट होईल, अशी मागणीही त्यांनी केली

टॅग्स :PoliticsराजकारणMaratha Reservationमराठा आरक्षणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षण