शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नागपुरात ४० हजार एलईडी लावल्यानंतरही वीज बिल वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 21:35 IST

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरूअसलेल्या उपराजधानीतील पथदिवेही स्मार्ट असावे. सोबतच वीज बिलावर होणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून १ लाख ३० हजार एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आजवर ४० हजार एलईडी पथदिवे लावण्यात आले. परंतु २०१६-१७ या वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ या वर्षात महापालिकेचा पथदिव्यावरील वीज खर्च १ कोटी १५ लाखांनी वाढला आहे. खर्चात कपात तर दूरच खर्च वाढल्याने या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देवीज बचतीचा दावा कागदारवच : तीन महिन्यात ८.६० कोटी वीज बिलावर खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरूअसलेल्या उपराजधानीतील पथदिवेही स्मार्ट असावे. सोबतच वीज बिलावर होणाऱ्या खर्चात बचत व्हावी, यासाठी २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून १ लाख ३० हजार एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आजवर ४० हजार एलईडी पथदिवे लावण्यात आले. परंतु २०१६-१७ या वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ या वर्षात महापालिकेचा पथदिव्यावरील वीज खर्च १ कोटी १५ लाखांनी वाढला आहे. खर्चात कपात तर दूरच खर्च वाढल्याने या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या प्रकल्पावर ४७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात नादुरुस्त केबल बदलणे, तुटलेल्या खांबांच्या ठिकाणी नवीन खांब बसविणे, फिडबॅक देणारे नवीन फिडर बसविणे आदी कामांचा समावेश आहे. यावर ५९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात शहरालगतच्या भागात एलईडी दिवे लावण्याचे काम करण्यात आले. त्यानंतर शहरातील मार्गावरील एलईडी दिवे लावण्याचे काम हाती घेण्यात आले. मार्च २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आर्थिक टंचाईमुळे प्रकल्पाचे काम संथ आहे. आजवर ४० हजार एलईडी पथदिवे लावण्यात आलेले आहेत. जवळपास ३०टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर काही वर्षांतच वीज बचतीतून प्रकल्पावरील खर्च निघून ३५० कोटींची बचत होईल असा दावा पदाधिकारी व अधिकाºयांकडून केला जात आहे. मात्र ४० हजार एलईडी लावल्यानंतरही विजेवरील खर्च कमी झालेला नाही.२०१७-१८ या वर्षात पथदिव्यांच्या वीज बिलावर ३५ कोटी ५९ लाख रुपये खर्च करण्यात आले. तर २०१८-१९ या वर्षात पथदिव्यांच्या वीज बिलावर ३६ कोटी ७४ लाख खर्च करण्यात आले. मार्च ते मे २०१८ या तीन महिन्यात पथदिव्यांच्या वीज बिलावर ८ कोटी ६० लाखांचा खर्च करण्यात आला. ३५ ते ४०हजार एलईडी पथदिवे लावल्यानंतर वीज बिलाच्या खर्चात २५ ते ३० टक्के कपात होणे अपेक्षित होते. परंतु वीज बिलावरील खर्च कमी झालेला नाही. यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.लेखापरीक्षण अहवाल उपलब्ध नाहीपथदिव्यावरील खर्चात बचत होण्यासाठी जुने पथदिवे बदलवून एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. एलईडी पथदिवे लावण्याचे काम हाती घेतल्यानंतर पथदिव्यावर होणाºया वीज खर्चात नेमकी किती बचत झाली, याची माहिती लेखा परीक्षणातून समोर आली असती. परंतु महापालिकेच्या प्रकाश विभागाकडे याबाबतचा लेखापरीक्षण अहवाल उपलब्ध नसल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.पथदिव्यावरील वीज खर्चवर्ष                               खर्च(कोटी)२०१६-१७                     ३५.५९२०१७-१८                     ३६.७४२०१८-१९(मार्च ते मे )   ८.६०नवीन एलईडी दुरुस्तीवर खर्चकोणतीही नवीन वस्तू विकत घेताना तिचा ‘वॉरंटी’ कालावधी असतो. अर्थातच एलईडी पथदिव्यांनाही अशी वॉरंटी असते. परंतु महापालिका वॉरंटी कालावधीतही या दिव्यांच्या दुरुस्ती व देखभालीवर वर्षाला २२ ते २३ कोटींचा खर्च करीत आहे. महापालिकेच्या प्रकाश विभागातर्फे एलईडी दिव्यामुळे वीज खर्चात बचत होणार असल्याचा दावा केला जात आहे. परंतु देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली प्रत्येक दिव्यावर महिन्याला ६२ रुपये, तर जुन्या पथदिव्यांच्या खांबावर ८२ रुपये खर्च होत आहे. एवढेच नव्हेतर यात दरवर्षी १० टक्के वाढ होणार आहे. यामुळे कंत्राटातील अटी व शर्ती कुणाच्या सोयीनुसार निश्चित करण्यात आल्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रकरणाची चौकशी व्हावीपथदिव्यांवरील वीज खर्चात बचत व्हावी, या हेतूने शहरातील १.३०लाख पथदिवे बदलवून एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र २०१६-१७ या वर्षाच्या तुलनेत २०१७-१८ या वर्षात पथदिव्यावरील वीज खर्च १ कोटी १५ लाखांनी वाढला आहे. विभागाकडे याचा लेखापरीक्षण अहवालही उपलब्ध नसल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली. हा प्रकल्प संशयास्पद असल्याने याची उच्चस्तरीय अधिकाºयांमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी केली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर