शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

५२ महिन्यांनंतरही टेकडी उड्डाणपूल तुटेना, सहा पदरी रस्त्याचे स्वप्न मात्र अपूर्णच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 13:16 IST

‘वाय शेप’ उड्डाणपुलाचे काम ९० टक्के पूर्ण; ५८ दुकानदारांचे प्रकरण रखडलेलेच

राजीव सिंह

नागपूर : रामझुला ते श्रीमोहिनी कॉम्प्लेक्स, एलआयसी चौकपर्यंत ‘वाय शेप’ पुलाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, रेल्वे स्टेशन समोर उभारण्यात येणाऱ्या सहा पदरी रस्त्याचे स्वप्न अद्याप अपूर्णच आहे. विशेष म्हणजे महापालिका सभागृहाने टेकडी उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय घेऊन ५२ महिने झाले आहेत. मात्र, अजूनही पुलाला धक्का लागलेला नाही. एवढेच नव्हे तर पंतप्रधानांचा डिसेंबरमध्ये झालेल्या दौऱ्यासाठी या पुलाचे डांबरीकरण व सौंदर्यीकरणावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते.

रेल्वे स्टेशनसमोर उड्डाणपूल बांधण्याचा प्रस्ताव २००३-०४ मध्ये महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर या पुलाखाली १७५ दुकाने बांधण्यात आली. २००८-०९ मध्ये १६० दुकाने ३० वर्षांच्या लीजवर दुकानदारांना देण्यात आली. यानंतर २९ सप्टेंबर २०१८ मध्ये उड्डाणपूल तोडून ६ पदरी रस्ता बांधण्याचा प्रस्ताव महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला. मनपाच्या माहितीनुसार १६० पैकी १०२ दुकानदारांचा तोडगा निघाला आहे. ४२ दुकानदारांनी भरपाई घेतली असून ६० जणांनी दुकान घेतले आहे. ५८ दुकानदारांचे प्रकरण रखडले आहे.

२३ दुकानदारांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले. मात्र, तेथे ते खटला हरले. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला. उच्च न्यायालयात त्यांना दिलासा मिळाला. आता संबंधित प्रकरणी लवकरच तोडगा निघेल, असा महापालिकेचा दावा आहे. उर्विरत २० दुकानदार लकी ड्रॉ च्या वेळी आले होते; पण त्यांनी चिठ्ठी काढली नाही. १५ दुकानदारांनी चिठ्ठी काढली व ते दुकान घेण्यास तयार आहेत; पण त्यावेळी केवळ ११ दुकाने शिल्लक होती. आता मेट्रोतर्फे नव्याने ३९ दुकाने तयार केली जात आहेत. ती लवकरच दिली जातील.

८१२ मीटर लांब आहे टेकडी उड्डाणपूल

  •  ८१२ मीटर लांब व १०.५ मीटर रुंद असलेल्या टेकडी उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी मनपाने १६.२३ कोटी खर्च केले होते. दुकानदारांनी ११.९६ कोटी रुपये अग्रिम राशी जमा केली होती.
  •  ४४ दुकानदार मोबदला घेण्यास तयार झाले व त्यांनी धनादेश घेतला आहे.
  •  ७१ दुकानदारांनी दुकानाच्या बदली दुकान घेण्यास संमती दर्शवली. यापैकी ६० दुकानदारांना महामेट्रोकडून दुकाने देण्यात आली आहेत.
  •  न्यायालयात गेलेले दुकानदार आता समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला देण्याची मागणी करीत आहेत.
टॅग्स :road transportरस्ते वाहतूकnagpurनागपूर