शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

इच्छामरणाने मरणासन्न रुग्णांची त्रासातून मुक्तता होईल; डॉक्टर सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 10:57 IST

इच्छामरण व ‘लिव्हिंग विल’बाबत शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली. या निर्णयावर नागपूरच्या डॉक्टरांनी सकारात्मकता दाखविली आहे. मरणासन्न असलेल्या रुग्णांसाठी हा निर्णय योग्य राहील, असे डॉक्टरांचे मत आहे.

ठळक मुद्देनागपुरातील डॉक्टरांनी दिल्या प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेली कित्येक वर्षे इच्छामरणावर देशात चर्चा सुरू होती. अनेकांनी आता आम्हाला जगायचे नाही, औषधोपचार करायचे नाहीत असे म्हणत इच्छामरणाची इच्छा व्यक्त केली होती. इच्छामरण व ‘लिव्हिंग विल’बाबत शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली. या निर्णयावर नागपूरच्या डॉक्टरांनी सकारात्मकता दाखविली आहे. मरणासन्न असलेल्या रुग्णांसाठी हा निर्णय योग्य राहील, असे डॉक्टरांचे मत आहे.

निर्णयात नीतीमत्ता राखली गेली पाहिजेवरिष्ठ कर्करोगतज्ज्ञ डॉ. कृष्णा कांबळे म्हणाले, इच्छामरण व ‘लिव्हिंग विल’बाबत सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय योग्य आहे. मात्र वैद्यकीय क्षेत्रामधील नीतिमत्तेलाही अलीकडे आव्हान दिले जात आहे आणि म्हणून त्या नीतिमत्तेच्या चौकटीत राहूनच यावर योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, अशिक्षित व दुर्लक्षित झालेला रुग्णही अगतिक झाल्यावर इच्छामरणाची मागणी करतो. यामुळे त्याला सर्व प्रकाराचे उपचार मिळाले का आणि मिळूनही तो मरणासन्न अवस्थेत दिवस काढत असेल तर नीतिमत्तेच्या चौकटीत राहून त्या पद्धतीचा निर्णय घ्यायला हरकत नाही.

मरणासन्न रुग्णासाठी योग्य निर्णयवरिष्ठ मेंदू शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद गिरी म्हणाले, कोमातून निघून एखादा रुग्ण मरणासन्न अवस्थेत गेला असेल किंवा एखाद्या रुग्णावर जेव्हा उपचारांचा काहीच फायदा होत नाही आणि तो वेदना सहन करीत दैनंदिन गोष्टींसाठी दुसऱ्यावर निर्भर असेल, त्याचा स्वत:चा शरीरावर ताबा नसेल या दोन्ही प्रकरणात इच्छामरणाचा मार्ग योग्य ठरू शकेल.

निर्णयाचा गैरवापर होऊ नयेइंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेच्या अध्यक्ष डॉ. वैशाली खंडाईत म्हणाल्या, प्रत्येक डॉक्टरच्या वैद्यकीय सेवेत एक तरी असे प्रकरण येते जेव्हा उपचारांचा काहीच फायदा होणार नाही असे डॉक्टरांना समजते. अशा प्रकरणांमध्ये डॉक्टर औषधोपचारांचे प्रमाण कमी करतात. पण, फक्त औषधांचा खर्च परवडत नाही म्हणून या निर्णयाचा गैरवापर होऊ नये.

टॅग्स :Healthआरोग्यEuthanasiaइच्छामरण