शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीच आरएसएसची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 19:09 IST

देशात पुन्हा एकदा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि महिलांची दास्यता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) स्थापना झाली आहे. असे रोखठोक मत प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरावसाहेब कसबे : जनसंवादच्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात पुन्हा एकदा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि महिलांची दास्यता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) स्थापना झाली आहे. असे रोखठोक मत प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.सोमवारी त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेजच्या जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जगाच्या उत्पत्तीपासून ते मानवाच्या विकासापर्यंत आणि देशातील सध्याच्या परिस्थितीपर्यंत रोखठोक मते व्यक्त केली. यावेळी अमिताभ पावडे, नागेश चौधरी, डॉ. पी.एस. चंगोले उपस्थित होते.कसबे म्हणाले, चातुर्वर्ण्य व्यवस्था व महिलांच्या दास्यतेमुळेच या देशाचा इतिहास पराभवाचा, गुलामगिरीचा राहिलेला आहे. भारतावर अनेक राजांनी आक्रमण केले. राज्य केले. त्याचे कारण म्हणजे ही चातुर्वर्ण्यव्यवस्थाच आहे. कुणीही राज्य करावे, परंतु त्यांनी आमच्या या व्यवस्थेला धक्का लावू नये, असे त्यांचे म्हणणे होते. इंग्रज आले, तेव्हा त्यांनीही चातुर्वर्ण्यव्यवस्थेला धक्का लावू नये, अशीच अपेक्षा होती. परंतु इंग्रज हे आधुनिक विचारसरणीतून आलेले होते. त्यांना ही व्यवस्था मान्य नव्हती. त्यांनी आधुनिक शिक्षण पद्धती आणली. महात्मा गांधीजींच्या रूपात एक नवीन विचारांचा सर्वांना घेऊन जाणारा नेता उदयास आला. तेव्हा आता आपली व्यवस्था नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती निर्माण झाल्याने आरएसएसची स्थापना झाली. म्हणूनच स्वातंत्र्याच्या लढ्याशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. पुढे देश स्वतंत्र झाला आणि संविधानाच्या माध्यमातून या देशात लोकशाही प्रस्थापित झाली. म्हणूनच आरएसएसला हे संविधान मान्य नाही. संविधान कसे कमकुवत होईल आणि पुन्हा चातुवर्ण्यव्यवस्था निर्माण करता येईल, यासाठीच ते काम करीत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. बबन नाखले यांनी केले. संचालन मनीषा देशमुख यांनी केले. तर संदेश सिंगलकर यांनी आभार मानले. देशात अराजक वातावरणसंविधानाच्या माध्यमातून राजकीय लोकशाही प्रस्थापित झाली. परंतु सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित झाली नाही, तर एक दिवस लोक संविधान नष्ट करून फॅसिझम आणतील, अशी भीती संविधाननिर्मात्यांनी तेव्हाच वर्तविली होती. तशी परिस्थिती निर्माण करण्याचे काम आरएसएस करीत आहे. त्यामुळे देशात अराजक वातावरण निर्माण झाले आहे. देशाला वाचवायचे असेल तर शेतक ऱ्यांना केंद्र स्थानी माणून धोरण ठरवण्याची आणि युवकांना रोजगार देण्याची गरज आहे, असेही रावसाहेब कसबे म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ