शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

चातुर्वर्ण्य व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठीच आरएसएसची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 19:09 IST

देशात पुन्हा एकदा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि महिलांची दास्यता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) स्थापना झाली आहे. असे रोखठोक मत प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरावसाहेब कसबे : जनसंवादच्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात पुन्हा एकदा चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि महिलांची दास्यता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) स्थापना झाली आहे. असे रोखठोक मत प्रसिद्ध विचारवंत रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.सोमवारी त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेजच्या जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जगाच्या उत्पत्तीपासून ते मानवाच्या विकासापर्यंत आणि देशातील सध्याच्या परिस्थितीपर्यंत रोखठोक मते व्यक्त केली. यावेळी अमिताभ पावडे, नागेश चौधरी, डॉ. पी.एस. चंगोले उपस्थित होते.कसबे म्हणाले, चातुर्वर्ण्य व्यवस्था व महिलांच्या दास्यतेमुळेच या देशाचा इतिहास पराभवाचा, गुलामगिरीचा राहिलेला आहे. भारतावर अनेक राजांनी आक्रमण केले. राज्य केले. त्याचे कारण म्हणजे ही चातुर्वर्ण्यव्यवस्थाच आहे. कुणीही राज्य करावे, परंतु त्यांनी आमच्या या व्यवस्थेला धक्का लावू नये, असे त्यांचे म्हणणे होते. इंग्रज आले, तेव्हा त्यांनीही चातुर्वर्ण्यव्यवस्थेला धक्का लावू नये, अशीच अपेक्षा होती. परंतु इंग्रज हे आधुनिक विचारसरणीतून आलेले होते. त्यांना ही व्यवस्था मान्य नव्हती. त्यांनी आधुनिक शिक्षण पद्धती आणली. महात्मा गांधीजींच्या रूपात एक नवीन विचारांचा सर्वांना घेऊन जाणारा नेता उदयास आला. तेव्हा आता आपली व्यवस्था नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती निर्माण झाल्याने आरएसएसची स्थापना झाली. म्हणूनच स्वातंत्र्याच्या लढ्याशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. पुढे देश स्वतंत्र झाला आणि संविधानाच्या माध्यमातून या देशात लोकशाही प्रस्थापित झाली. म्हणूनच आरएसएसला हे संविधान मान्य नाही. संविधान कसे कमकुवत होईल आणि पुन्हा चातुवर्ण्यव्यवस्था निर्माण करता येईल, यासाठीच ते काम करीत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. बबन नाखले यांनी केले. संचालन मनीषा देशमुख यांनी केले. तर संदेश सिंगलकर यांनी आभार मानले. देशात अराजक वातावरणसंविधानाच्या माध्यमातून राजकीय लोकशाही प्रस्थापित झाली. परंतु सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित झाली नाही, तर एक दिवस लोक संविधान नष्ट करून फॅसिझम आणतील, अशी भीती संविधाननिर्मात्यांनी तेव्हाच वर्तविली होती. तशी परिस्थिती निर्माण करण्याचे काम आरएसएस करीत आहे. त्यामुळे देशात अराजक वातावरण निर्माण झाले आहे. देशाला वाचवायचे असेल तर शेतक ऱ्यांना केंद्र स्थानी माणून धोरण ठरवण्याची आणि युवकांना रोजगार देण्याची गरज आहे, असेही रावसाहेब कसबे म्हणाले.

टॅग्स :nagpurनागपूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ