शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आॅटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करा : मोर्चाची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 20:07 IST

आॅटोरिक्षा चालकांसाठी परिवहन मंत्रालयांतर्गत कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या मुख्य मागणीला घेऊन आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली.

ठळक मुद्देआॅटोरिक्षा चालकांची मागणीमुंबईत लवकरच बैठक - मंत्र्यांची ग्वाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : आॅटोरिक्षा चालकांसाठी परिवहन मंत्रालयांतर्गत कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या मुख्य मागणीला घेऊन आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. या मोर्चात राज्यभरातून आॅटोरिक्षा चालक सहभागी झाले होते. मोर्चाला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भेट देऊन कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी लवकरच मुंबई येथे बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.राज्यातील १५ लाख आॅटोरिक्षा चालक सुमारे ११०० कोटी रुपये खासगी विमा कंपन्यांना देतात. परंतु आॅटोचालकाला विम्यातून १०हजार रुपयांचा परतावा मिळाला नाही. विशेष म्हणजे, महाराष्ट्र  शासनाकडे विमा उतरविण्याचा परवाना आहे. यामुळे जर आॅटोरिक्षा चालकाचा विमा राज्य सरकारने आपल्या परवानाअंतर्गत उतरविला तर राज्य सरकारला फायदा मिळेल, सोबतच कल्याणकारी महामंडळ स्थापन केल्यास महामंडळाद्वारे आॅटोरिक्षा चालकांना पेन्शन, कुटुंबीयांचे आरोग्य, शिक्षण आदी सर्व सोयीसुविधा मिळू शकतील. परंतु गेल्या तीन वर्षांपासून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष विलास भालेकर यांनी केला. मोर्चाचे शिष्टमंडळ मंत्र्यांच्या भेटीला जाणार नाही, परिवहन मंत्र्यांनी मोर्चात यावे, ही अट मोर्चेकरांनी ठेवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोर्चाला भेट देऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारताच तणाव निवळला. या मोर्चात विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशन, टायगर आॅटोरिक्षा संघटना, आझाद हिंद आॅटो सेना, राष्ट्रवादी आॅटो युनियन व जिल्हा ग्रामीण आॅटोरिक्षा संघटनांचा सहभाग होता. या मोर्चाला आ. कपिल पाटील, आ. जयदेव गायकवाड व आ. प्रतापसिंग पाटील चिखलीकर आदींनी भेटी दिल्या.अवैध वाहतुकीवर कारवाईमोर्चाला सामोरे जाताना परिवहन मंत्री रावते म्हणाले, आॅटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महांमडळ स्थापन करण्यासाठी लवकरच मुंबईला बैठक घेतली जाईल. जानेवारी महिन्यापासून अवैध वाहतुकीवर कारवाईची मोहीम हाती राबविली जाईल तर ओला, उबेर यासारख्या कॅब कंपन्यांवर बंधने घातली जातील, असे आश्वासन यावेळी रावते यांनी दिले.अवैध प्रवासी वाहतूक बंद करा,ओला-उबेर कंपन्यांवर कारवाई करा, ई-रिक्षा बंद करा, बोगस परमिटधारकांवर व वाहनांवर कारवाई करा, विमा व शुल्कात झालेली वाढ कमी करा, आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या . मोर्चाचे नेतृत्व शशांक राव, विलास भालेकर, बाबा कांबळे यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर