शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
2
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
3
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
4
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
6
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
7
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
8
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
9
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
10
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
11
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
12
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
13
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
14
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
15
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
16
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
17
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
18
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
19
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
20
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करा : मोर्चाची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 20:07 IST

आॅटोरिक्षा चालकांसाठी परिवहन मंत्रालयांतर्गत कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या मुख्य मागणीला घेऊन आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली.

ठळक मुद्देआॅटोरिक्षा चालकांची मागणीमुंबईत लवकरच बैठक - मंत्र्यांची ग्वाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : आॅटोरिक्षा चालकांसाठी परिवहन मंत्रालयांतर्गत कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या मुख्य मागणीला घेऊन आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. या मोर्चात राज्यभरातून आॅटोरिक्षा चालक सहभागी झाले होते. मोर्चाला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भेट देऊन कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी लवकरच मुंबई येथे बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.राज्यातील १५ लाख आॅटोरिक्षा चालक सुमारे ११०० कोटी रुपये खासगी विमा कंपन्यांना देतात. परंतु आॅटोचालकाला विम्यातून १०हजार रुपयांचा परतावा मिळाला नाही. विशेष म्हणजे, महाराष्ट्र  शासनाकडे विमा उतरविण्याचा परवाना आहे. यामुळे जर आॅटोरिक्षा चालकाचा विमा राज्य सरकारने आपल्या परवानाअंतर्गत उतरविला तर राज्य सरकारला फायदा मिळेल, सोबतच कल्याणकारी महामंडळ स्थापन केल्यास महामंडळाद्वारे आॅटोरिक्षा चालकांना पेन्शन, कुटुंबीयांचे आरोग्य, शिक्षण आदी सर्व सोयीसुविधा मिळू शकतील. परंतु गेल्या तीन वर्षांपासून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष विलास भालेकर यांनी केला. मोर्चाचे शिष्टमंडळ मंत्र्यांच्या भेटीला जाणार नाही, परिवहन मंत्र्यांनी मोर्चात यावे, ही अट मोर्चेकरांनी ठेवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोर्चाला भेट देऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारताच तणाव निवळला. या मोर्चात विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशन, टायगर आॅटोरिक्षा संघटना, आझाद हिंद आॅटो सेना, राष्ट्रवादी आॅटो युनियन व जिल्हा ग्रामीण आॅटोरिक्षा संघटनांचा सहभाग होता. या मोर्चाला आ. कपिल पाटील, आ. जयदेव गायकवाड व आ. प्रतापसिंग पाटील चिखलीकर आदींनी भेटी दिल्या.अवैध वाहतुकीवर कारवाईमोर्चाला सामोरे जाताना परिवहन मंत्री रावते म्हणाले, आॅटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महांमडळ स्थापन करण्यासाठी लवकरच मुंबईला बैठक घेतली जाईल. जानेवारी महिन्यापासून अवैध वाहतुकीवर कारवाईची मोहीम हाती राबविली जाईल तर ओला, उबेर यासारख्या कॅब कंपन्यांवर बंधने घातली जातील, असे आश्वासन यावेळी रावते यांनी दिले.अवैध प्रवासी वाहतूक बंद करा,ओला-उबेर कंपन्यांवर कारवाई करा, ई-रिक्षा बंद करा, बोगस परमिटधारकांवर व वाहनांवर कारवाई करा, विमा व शुल्कात झालेली वाढ कमी करा, आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या . मोर्चाचे नेतृत्व शशांक राव, विलास भालेकर, बाबा कांबळे यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर