शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

आॅटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करा : मोर्चाची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 20:07 IST

आॅटोरिक्षा चालकांसाठी परिवहन मंत्रालयांतर्गत कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या मुख्य मागणीला घेऊन आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली.

ठळक मुद्देआॅटोरिक्षा चालकांची मागणीमुंबईत लवकरच बैठक - मंत्र्यांची ग्वाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : आॅटोरिक्षा चालकांसाठी परिवहन मंत्रालयांतर्गत कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याच्या मुख्य मागणीला घेऊन आॅटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने गुरुवारी विधिमंडळावर धडक दिली. या मोर्चात राज्यभरातून आॅटोरिक्षा चालक सहभागी झाले होते. मोर्चाला परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भेट देऊन कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी लवकरच मुंबई येथे बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.राज्यातील १५ लाख आॅटोरिक्षा चालक सुमारे ११०० कोटी रुपये खासगी विमा कंपन्यांना देतात. परंतु आॅटोचालकाला विम्यातून १०हजार रुपयांचा परतावा मिळाला नाही. विशेष म्हणजे, महाराष्ट्र  शासनाकडे विमा उतरविण्याचा परवाना आहे. यामुळे जर आॅटोरिक्षा चालकाचा विमा राज्य सरकारने आपल्या परवानाअंतर्गत उतरविला तर राज्य सरकारला फायदा मिळेल, सोबतच कल्याणकारी महामंडळ स्थापन केल्यास महामंडळाद्वारे आॅटोरिक्षा चालकांना पेन्शन, कुटुंबीयांचे आरोग्य, शिक्षण आदी सर्व सोयीसुविधा मिळू शकतील. परंतु गेल्या तीन वर्षांपासून या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप यावेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष विलास भालेकर यांनी केला. मोर्चाचे शिष्टमंडळ मंत्र्यांच्या भेटीला जाणार नाही, परिवहन मंत्र्यांनी मोर्चात यावे, ही अट मोर्चेकरांनी ठेवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोर्चाला भेट देऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारताच तणाव निवळला. या मोर्चात विदर्भ आॅटोरिक्षा चालक फेडरेशन, टायगर आॅटोरिक्षा संघटना, आझाद हिंद आॅटो सेना, राष्ट्रवादी आॅटो युनियन व जिल्हा ग्रामीण आॅटोरिक्षा संघटनांचा सहभाग होता. या मोर्चाला आ. कपिल पाटील, आ. जयदेव गायकवाड व आ. प्रतापसिंग पाटील चिखलीकर आदींनी भेटी दिल्या.अवैध वाहतुकीवर कारवाईमोर्चाला सामोरे जाताना परिवहन मंत्री रावते म्हणाले, आॅटोरिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महांमडळ स्थापन करण्यासाठी लवकरच मुंबईला बैठक घेतली जाईल. जानेवारी महिन्यापासून अवैध वाहतुकीवर कारवाईची मोहीम हाती राबविली जाईल तर ओला, उबेर यासारख्या कॅब कंपन्यांवर बंधने घातली जातील, असे आश्वासन यावेळी रावते यांनी दिले.अवैध प्रवासी वाहतूक बंद करा,ओला-उबेर कंपन्यांवर कारवाई करा, ई-रिक्षा बंद करा, बोगस परमिटधारकांवर व वाहनांवर कारवाई करा, विमा व शुल्कात झालेली वाढ कमी करा, आदी मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या . मोर्चाचे नेतृत्व शशांक राव, विलास भालेकर, बाबा कांबळे यांनी केले.

टॅग्स :nagpurनागपूर