शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

टपाल विभागाच्या ग्राहक सेवेत त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:25 IST

एका प्रकरणात टपाल विभागाकडून महिला ग्राहकाला समाधानकारक सेवा प्रदान करण्यात आली नाही, असा निष्कर्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकत्याच दिलेल्या निर्णयात नोंदवला आहे. तसेच, टपाल विभागाच्या त्रुटीपूर्ण सेवेमुळे ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागला, असेही निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देग्राहक मंचचा निष्कर्ष : आवश्यक कागदपत्रे देऊनही ग्राहकाला मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका प्रकरणात टपाल विभागाकडून महिला ग्राहकाला समाधानकारक सेवा प्रदान करण्यात आली नाही, असा निष्कर्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकत्याच दिलेल्या निर्णयात नोंदवला आहे. तसेच, टपाल विभागाच्या त्रुटीपूर्ण सेवेमुळे ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागला, असेही निर्णयात नमूद करण्यात आले आहे.मंचचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी व सदस्य नितीन घरडे यांनी हा निर्णय दिला आहे. मंगला चव्हाण असे ग्राहकाचे नाव असून, त्या रेशीमबाग येथील रहिवासी आहेत. त्यांचे आई, वडील व भावाचे टपाल विभागात संयुक्त खाते होते. या तिघांच्याही मृत्यूनंतर चव्हाण यांनी टपाल विभागाकडे खात्यातील रकमेची मागणी केली. यासाठी त्यांना वारसान प्रमाणपत्र मागण्यात आले. त्यांनी जिल्हा न्यायालयातून वारसान प्रमाणपत्र मिळवून टपाल विभागात सादर केले. त्यानंतर त्यांना विनाकारण २०० रुपयांचा स्टॅम्प पेपर मागण्यात आला. यासह अन्य सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही त्यांना खात्यातील रक्कम देण्यात आली नाही. परिणामी त्यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली. मंचने त्यांना दिलासा दिला. प्रकरणातील तथ्ये पडताळल्यानंतर मंचला टपाल विभागाच्या सेवेत त्रुटी आढळून आल्या.रक्कम परत करण्याचा आदेशग्राहक चव्हाण यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या खात्यातील १ लाख ९ हजार १८९.४५ रुपये परत करण्यात यावेत, असा आदेश मंचने टपाल विभागाला दिला आहे. त्या रकमेवर २७ नोव्हेंबर २०१५ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करेपर्यंतच्या कालावधीत ७ टक्के व्याज देण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, चव्हाण यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी १० हजार तर, तक्रारीच्या खर्चापोटी पाच हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे.

टॅग्स :consumerग्राहकnagpurनागपूर