शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

बीएससीनंतर अभियांत्रिकीच्या थेट दुसर्‍या वर्षाला प्रवेश

By admin | Updated: May 21, 2014 01:03 IST

बीएससी झालेल्या विद्यार्थ्यांना आता अभियांत्रिकीच्या थेट दुसर्‍या वर्षाला प्रवेश मिळणार आहे. चार वर्षीय अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम केवळ तीन वर्षात पूर्ण करण्याची संधी मिळण्यासोबतच

करिअरचा पर्याय खुला : जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकीची माहिती

यवतमाळ : बीएससी झालेल्या विद्यार्थ्यांना आता अभियांत्रिकीच्या थेट दुसर्‍या वर्षाला प्रवेश मिळणार आहे. चार वर्षीय अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम केवळ तीन वर्षात पूर्ण करण्याची संधी मिळण्यासोबतच या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीत करिअर करण्याचा पर्याय खुला झाला आहे. बीएससी विद्यार्थ्यांना बी.ई. विद्यार्थ्यांच्या तुलनेत रोजगाराच्या अत्यंत कमी संधी आहेत. अशा विद्यार्थ्यांपुढे एमएससी, एम.फिल, बी.एड. या अभ्यासक्रमाशिवाय पर्याय नसतो. शैक्षणिक क्षेत्रात करिअर करायचे झाल्यास नेट/सेट परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. आता शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने बीएससी विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या थेट दुसर्‍या वर्षाला प्रवेश देण्याची प्रक्रिया अवलंबिली आहे. तीन वर्षातच अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासोबतच कुठल्याही शाखेत बीएससी करणार्‍या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेसाठी प्रवेश मिळणार आहे. बीएससी बायोलॉजी केलेला विद्यार्थी अभियांत्रिकीतील कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखेची निवड करून आयटीमध्ये आपले करिअर घडवू शकतो. बीएससी विद्यार्थ्याला अभियांत्रिकीच्या कुठल्याही शाखेत प्रवेशासाठी कोणत्याही शाखेची बीएससी पदवी तसेच बारावी इंग्रजी आणि गणित विषय घेवून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विद्यार्थी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होवून शासनातर्फे अभियांत्रिकी प्रवेशासाठी शिक्षण शुल्कात मिळणार्‍या विविध सवलती आणि शिष्यवृत्तीचाही लाभ घेवू शकतात. अभियांत्रिकीला प्रवेश घेतलेले बीएससी पदवीधर विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अभियांत्रिकी अभ्यासक्रम चांगल्यारीतीने पूर्ण करतात. अशा विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधीत इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक स्थान दिले जाते. त्यामुळे या संधीचा बीएससी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉ. संजय गुल्हाने यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८८१८३२१०० या क्रमांकाच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा, असे कळविले आहे. (वार्ताहर)