शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

ऊर्जा निर्मितीसाठी इराई धरणाचे करणार संवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 21:48 IST

चंद्र्रपूर जिल्ह्यातील महाजेनको अंतर्गत येणाऱ्या वीज निर्मिती प्रकल्पास इराई धरणाचे पाणी वापरले जाते, या धरणात पाणी मुबलक असावे, यासाठी या धरणाचे संवर्धन केले जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली.

ठळक मुद्देऊर्जामंत्री बावनकुळे : मनपा व महाजेनकोत होणार करार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्र्रपूर जिल्ह्यातील महाजेनको अंतर्गत येणाऱ्या वीज निर्मिती प्रकल्पास इराई धरणाचे पाणी वापरले जाते, या धरणात पाणी मुबलक असावे, यासाठी या धरणाचे संवर्धन केले जाईल, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली.नवी दिल्ली नार्थ ब्लॉक येथे केंद्र्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या कक्षात बुधवारी चंद्र्रपूर जिल्ह्यातील ऊर्जा विभागाशी निगडित विविध समस्यांवर बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस महाजनेकोचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक राजीव मित्तल , संचालक (खाण) श्याम वर्धने, उपस्थित होते.चंद्र्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी (महाजेनको) चा वीजनिर्मिती प्रकल्प आहे. याला लागणारे पाणी इराई धराणातून आणले जाते. सध्या धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे वीजनिर्मिती करण्यास पुढील काळात समस्या निर्माण होऊ शकते. ती निर्माण होऊ नये, यासाठी चारगाव धरणाचे पाणी इराई धरणाला सोडले जाईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याशिवाय पाण्याची पातळी वाढविण्यासंदर्भातील इतर उपाययोजनाही आखण्यात येतील, असे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. इराई धरणाचे संवर्धन करण्यासाठी चंद्र्रपूर महानगरपालिका आणि महाजनकोमध्ये करार करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.चंद्रपूर जिल्ह्यातील जी गावे खाणीसाठी अथवा ऊर्जा प्रकल्पांसाठी अधिग्रहीत केलेली आहेत. अशा ५२ गावांमध्ये आतापर्यंत कोणताच लाभ सामाजिक दायित्व (सीएसआर) च्या माध्यमातून मिळालेला नाही. या गांवाना सीएसआरच्या निधीतून पायाभूत सुविधांचा विकास करणे आणि प्रकल्पग्रस्तांची बैठक घेऊन त्यांचे प्रश्न तातडीने सोडवून, त्यांच्या शैक्षणीक पात्रतेप्रमाणे ऊर्जा विभागातील विविध ठिकाणी असणाºया रिक्त जागांवर सामावून घेण्यासंदर्भात निर्णय यावेळी झाला.याशिवाय वीज निर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी होणारी चोरी थांबविण्यसाठी अत्याधुनिक निगराणी तंत्रज्ञान बसविण्याबाबत मंजुरी देण्यात आली. सोबतच येथील वीज निर्मिती प्रकल्पामध्येच कोळसा वॉशरी प्रकल्प उभारण्यात येईल. यामुळे वाहतुकीवरील खर्चामध्ये बचत होईल.बरांज कोळसा खाणीशी करार करण्यात येईलचंद्र्रपूर जिल्ह्यात असणाऱ्या वीज निर्मिती प्रकल्पाला रेल्वेमार्गाने कोळसा पुरविण्याकरिता अधिक खर्च येतो. हा खर्च कमी करण्यासाठी जवळच असलेल्या बरांज कोळसा खाणीतुन कोळसा मिळाल्यास सुविधा होऊ शकते. यासाठी बरांज कोळसा खाणीशी पुढील काळात करार करण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

सौरऊर्जा महामंडळाच्या मदतीने  ऊर्जा प्रकल्प उभारणार महाजनकोचा चंद्र्रपूर जिल्ह्यातील रिकाम्या जागेचा अभ्यास करून या ठिकाणी भारत सरकारच्या सौरऊर्जा महामंडळ आणि महाजनकोमध्ये करार करून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याबाबतचे बैठकीत निश्चित करण्यात आले. घाटंजी येथे बायोमास प्रकल्पयवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे बायोमास प्रकल्प उभारण्याकरिता लवकरच शासकीय स्तरावरील प्रक्रिया सुरू करण्यात येईल. 

 

टॅग्स :DamधरणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे