शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा ‘दे धक्का’

By admin | Updated: August 5, 2016 02:56 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीचा कारभार ‘आॅनलाईन’ झाल्यामुळे निकालांतील गोंधळ होणारच नाही, अशी अपेक्षा होती.

तांत्रिक चुकीचा फटका : गुणपत्रिकेत शेकडो विद्यार्थ्यांना दाखविले अनुपस्थित नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा प्रणालीचा कारभार ‘आॅनलाईन’ झाल्यामुळे निकालांतील गोंधळ होणारच नाही, अशी अपेक्षा होती. परंतु ‘आॅल इज वेल’ची अपेक्षा करणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना जोरदार धक्का बसला आहे. परीक्षेला उपस्थित असूनदेखील अभियांत्रिकीच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत अनुपस्थित दाखविण्यात आले आहे. यामुळे ‘कॅम्पस प्लेसमेन्ट’मध्ये निवड होऊनदेखील बरेच विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. अनेक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे उन्हाळी परीक्षेपासून ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन सुरू झाले व निकालांचा वेग वाढला. अभियांत्रिकीचे मूल्यांकनदेखील ‘आॅनस्क्रीन’ झाले. परंतु त्याचा वेग संथ होता. यामुळे विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून निकालाची प्रतीक्षा होती. परंतु दोन दिवसांपूर्वी निकाल जाहीर झाल्यावर शेकडो विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांच्या गुणपत्रिकेत चक्क सोडविलेल्या पेपरमध्ये अनुपस्थित दाखवून त्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले. मागील सत्रांमध्ये प्रावीण्य श्रेणीतील गुण मिळविलेले काही हुशार विद्यार्थीदेखील या गोंधळामुळे अनुत्तीर्ण झाले आहेत. यात काही विशिष्ट अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. यात नागपूर व शहराबाहेरील महाविद्यालयांचा समावेश आहे. यासंदर्भात संबंधित विद्यार्थ्यांनी लगेच महाविद्यालयात धाव घेतली. त्यावेळी त्यांना विद्यापीठाकडे पाठविण्यात आले. संबंधित बाब विद्यापीठ अधिकाऱ्यांच्या कानी पडल्यावर तेदेखील बुचकळ््यात पडले.(प्रतिनिधी) विद्यार्थी चिंतेत अंतिम वर्षाच्या सुरुवातीलाच अनेक महाविद्यालयांत ‘कॅम्पस प्लेसमेन्ट’ आटोपले असते. विद्यार्थ्यांना पुढील परीक्षा उत्तीर्ण करायच्या असतात. परंतु पेपर चांगले गेले असतानादेखील त्यात अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण केल्यामुळे अनेक विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. हातातील लाखमोलाची नोकरी जाते की काय असा प्रश्न त्यांना पडला आहे. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवेशाची तयारी केली होती. त्यांचादेखील या निकालामुळे भ्रमनिरास झाला आहे. विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनादेखील फटका दरम्यान, विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनादेखील विद्यापीठातील भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. ‘बीए एलएलबी’च्या पाच वर्षीय अभ्यासक्रमातील चौथ्या सत्राचा निकाल जाहीर झाला. यात इंग्रजी व फिलॉसॉफी या दोन पेपरमध्ये अनेक विद्यार्थ्यांना चक्क अनुपस्थित दाखविण्यात आले आहे. विधी महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षा भवनात गेले असताना त्यांना तेथे कर्मचाऱ्यांनी योग्य उत्तर दिले नाही. एक तर निकाल वेळेवर लागले नाही आणि घाईगडबडीत उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकन योग्य प्रकारे झाले नसल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे. विधी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत प्रतिक्रियेसाठी परीक्षा नियंत्रकांशी संपर्क होऊ शकला नाही. विद्यापीठाचे विद्यार्थ्यांवरच खापर यासंदर्भात परीक्षा नियंत्रक डॉ.नीरज खटी यांना विचारणा केली असता त्यांनी विद्यार्थ्यांच्या तक्रारी येत असल्याचे मान्य केले. यात विद्यापीठाची काहीच चूक नाही. विद्यार्थ्यांनीच त्यांचा परीक्षा अर्ज योग्य पद्धतीने भरला नव्हता. अर्जात ‘इलेक्टिव्ह’ पेपर म्हणून एका विषयाचे नाव दिले आणि प्रत्यक्षात दुसराच पेपर दिला. महाविद्यालयांनीदेखील त्यांना मार्गदर्शन केले नाही व ऐनवेळी विद्यार्थ्यांची ही चूक सुधारण्याची पत्राद्वारे विनंती केली. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी झालेली चूक ‘मॅन्युअली’ बदलून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. गुणपत्रिकांमध्येदेखील त्रुटी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका संकेतस्थळावर आलेल्या आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमध्ये त्रुटी आहेत. कुठे विद्यार्थ्यांचे नाव बदलण्यात आले आहे, तर कुठे विद्यार्थ्यांना विद्यार्थिनी असे दाखविण्यात आले आहे. काही गुणपत्रिकांवर परीक्षा नियंत्रकांची सहीच नसल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.