शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार शेतकऱ्यांना प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 23:09 IST

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व शेतमालाला योग्य बाजारभाव उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात ‘आत्मा’ च्या माध्यमातून २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान रेशीमबाग मैदानावर पाच दिवसीय कृषी महोत्सव होणार आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महोत्सवात शेतीशी निगडित विविध विषयांवर परिसंवाद आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान देखील होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी सचिन कुर्वे : उत्पादक ते ग्राहक थेट विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व शेतमालाला योग्य बाजारभाव उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात ‘आत्मा’ च्या माध्यमातून २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान रेशीमबाग मैदानावर पाच दिवसीय कृषी महोत्सव होणार आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महोत्सवात शेतीशी निगडित विविध विषयांवर परिसंवाद आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान देखील होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पत्रपरिषदेत दिली.कृषी महोत्सवात कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकºयांना मिळणार आहे. समूह, गट संघटित करून शेतकरी आणि उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव व ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री शृंखला विकसित करण्यात येणार आहे. कृषी विषयक परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणद्वारे शेतकºयांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. विक्रेता-खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास व विपणनास चालना देण्यात येणार आहे. महोत्सवात २०० स्टॉल राहणार आहे. यात शेतकऱ्यांना नि:शुल्क स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या महोत्सवाला किमान दहा हजार लोक भेटी देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पत्रपरिषदेला आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ.नलिनी भोयर व प्रकल्प उपसंचालक ए. एम. कुसळकर उपस्थित होते. नॉफ्प्स नावाने सेंद्रीय शेतकऱ्यांचे ब्रॅण्डिंगविषमुक्त अन्न काळाजी गरज झाली आहे. जिल्ह्यातील ३२ शेतकऱ्यांचे गट सेंद्रीय शेतमालाचे उत्पादन करीत आहे. या शेतमालाला चांगला भाव मिळावा व ग्राहकांना सुद्धा सेंद्रीय शेतमाल खरेदी केल्याची हमी मिळावी या दृष्टीने सेंद्रीय शेतमालाच्या उत्पादनाचा नागपूर ब्रॅण्ड तयार करण्यात आला आहे. नागपूर आॅर्गेनिक फार्म प्रोड्युस सिस्टीम नावाने हा ब्रॅण्डचे महोत्सवात लाँचिंग होणार आहे.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरी