शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
2
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
3
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
4
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
5
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
6
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
7
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
8
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
9
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
10
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
11
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
12
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
13
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
14
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
15
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
16
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
17
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
18
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
19
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
20
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

नागपूरच्या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार शेतकऱ्यांना प्रोत्साहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 23:09 IST

शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व शेतमालाला योग्य बाजारभाव उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात ‘आत्मा’ च्या माध्यमातून २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान रेशीमबाग मैदानावर पाच दिवसीय कृषी महोत्सव होणार आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महोत्सवात शेतीशी निगडित विविध विषयांवर परिसंवाद आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान देखील होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी सचिन कुर्वे : उत्पादक ते ग्राहक थेट विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व शेतमालाला योग्य बाजारभाव उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने जिल्हास्तरावर कृषी महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यात ‘आत्मा’ च्या माध्यमातून २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान रेशीमबाग मैदानावर पाच दिवसीय कृषी महोत्सव होणार आहे. उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, महोत्सवात शेतीशी निगडित विविध विषयांवर परिसंवाद आणि प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान देखील होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पत्रपरिषदेत दिली.कृषी महोत्सवात कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकºयांना मिळणार आहे. समूह, गट संघटित करून शेतकरी आणि उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव व ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री शृंखला विकसित करण्यात येणार आहे. कृषी विषयक परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणद्वारे शेतकºयांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. विक्रेता-खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास व विपणनास चालना देण्यात येणार आहे. महोत्सवात २०० स्टॉल राहणार आहे. यात शेतकऱ्यांना नि:शुल्क स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या महोत्सवाला किमान दहा हजार लोक भेटी देतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. पत्रपरिषदेला आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ.नलिनी भोयर व प्रकल्प उपसंचालक ए. एम. कुसळकर उपस्थित होते. नॉफ्प्स नावाने सेंद्रीय शेतकऱ्यांचे ब्रॅण्डिंगविषमुक्त अन्न काळाजी गरज झाली आहे. जिल्ह्यातील ३२ शेतकऱ्यांचे गट सेंद्रीय शेतमालाचे उत्पादन करीत आहे. या शेतमालाला चांगला भाव मिळावा व ग्राहकांना सुद्धा सेंद्रीय शेतमाल खरेदी केल्याची हमी मिळावी या दृष्टीने सेंद्रीय शेतमालाच्या उत्पादनाचा नागपूर ब्रॅण्ड तयार करण्यात आला आहे. नागपूर आॅर्गेनिक फार्म प्रोड्युस सिस्टीम नावाने हा ब्रॅण्डचे महोत्सवात लाँचिंग होणार आहे.

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरी