शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शेतकऱ्यापर्यंत योजना पोचविण्यासाठी शेतीदूतांची नेमणूक करा : नीलम गोऱ्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 16:10 IST

शेतीदूत नेमण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना, शेतकऱ्यांना वादळी पावसाने झालेल्या नुकसानभरपाईची मागणी

नागपूर : ‘राज्यात शेतकऱ्यांचा खरा विकास व्हायचा असेल तर राज्यात तालुकानिहाय शेतीदूतांची नेमणूक  करण्यात यावी. यामुळे राज्य व केंद्र सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यास मदत होईल. मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. शासनाकडून त्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे. राज्यात गेल्या पाच महिन्यात १२५४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तसेच विषारी औषध फवारणीमुळे अनेक शेतकऱ्यांना आपले जीव गमवावे लागणे. ही अतिशय दुख: दायक गोष्ट आहे,’ असे शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या विधानपरिषद प्रतोद आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिपादन आज सभागृहात केले.

हिवाळी अधिवेशनात मांडलेल्या प्रस्तावात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, ‘शेतीजमिनीची सुधारणा करण्याची अत्यंत आवश्यकता असून शेतीतील उत्पादकता वाढायला हवी यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. शेतीमध्ये तयार होणाऱ्या मालाला योग्य ते संरक्षण मिळावे याकरिता कृषी विमा निधी (Agricultural Risk Fund),ग्रामीण विमा विकास निधी (Rural Insurance Development fund), मानवी विमा योजना (Human Health Insurance package), किमान आधारभूत किंमत  Minimum support Price या संकल्पना प्रत्यक्षात येण्याची अत्याधिक गरज असल्याची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. यावर नियंत्रण राहिले नाही तर साठेबाजांचे फावते हे आपण पाहिले आहे. शेतकरी आयोग व कृषीमुल्य आयोगाने अधिकाधिक प्रभावीपणे काम करावे अशी अपेक्षा आज सर्वत्र व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी सरकारला शेतकरी आणि शिवसेनेच्या दबावामुळे करावीच लागली. मात्र ही योजना राबवताना ऑनलाईनच्या घोळात आणि किती शेतकऱ्यांनी अर्ज केले व किती नाही याची शहानिशा करण्यात अधिक वेळ गेला. आता मात्र या योजनेंतर्गत किती  शेतकऱ्यांना खरोखरीच लाभ मिळाला आहे याबाबतच्या जिल्हानिहाय यादीची मागणी महसूल विभागाकडे सभागृहाच्या समोर मी करीत आहे. महसूल यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. विदर्भ विकासाचा अहवाल सभागृहासमोर सादर करण्यात यावा. ’

१९ मे २०१७ रोजी नाशिक येथे शेतकरी संघटना, शेतकरी नेते खा. राजू शेट्टी यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची बैठक झाली होती. यानंतर १ जून ला ग्रामसभेचा ठराव झाला आणि शेतकरी संप जाहीर झाला.  ५ जून २०१७ रोजी सुकाणू समितीची स्थापना करून सरकारने १८ जून २०१७ ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अस्तित्वात आली. ज्या ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्यासाठी रक्त सांडावे लागले त्यांना मनपूर्वक अभिवादन करते. शिवजलक्रांती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ही एक समाधानाची बाब आहे. बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. पण राज्यात घडलेल्या शीतल वायाळ सारख्या मुलींच्या आत्महत्या, हुंडाबळीच्या अनेक केसेस या अजूनही वेदनादायकच आहेत. किशोरी व किशोर यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे यावर शासनाने काम करावे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून ३१ जुलै २०१७ पर्यंतच्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्याच्या त्यांची सूचना अंमलात आणल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हार्दिक आभार मानले आहेत

टॅग्स :Shiv Senaशिवसेना