शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यापर्यंत योजना पोचविण्यासाठी शेतीदूतांची नेमणूक करा : नीलम गोऱ्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 16:10 IST

शेतीदूत नेमण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना, शेतकऱ्यांना वादळी पावसाने झालेल्या नुकसानभरपाईची मागणी

नागपूर : ‘राज्यात शेतकऱ्यांचा खरा विकास व्हायचा असेल तर राज्यात तालुकानिहाय शेतीदूतांची नेमणूक  करण्यात यावी. यामुळे राज्य व केंद्र सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यास मदत होईल. मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. शासनाकडून त्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे. राज्यात गेल्या पाच महिन्यात १२५४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तसेच विषारी औषध फवारणीमुळे अनेक शेतकऱ्यांना आपले जीव गमवावे लागणे. ही अतिशय दुख: दायक गोष्ट आहे,’ असे शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या विधानपरिषद प्रतोद आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिपादन आज सभागृहात केले.

हिवाळी अधिवेशनात मांडलेल्या प्रस्तावात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, ‘शेतीजमिनीची सुधारणा करण्याची अत्यंत आवश्यकता असून शेतीतील उत्पादकता वाढायला हवी यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. शेतीमध्ये तयार होणाऱ्या मालाला योग्य ते संरक्षण मिळावे याकरिता कृषी विमा निधी (Agricultural Risk Fund),ग्रामीण विमा विकास निधी (Rural Insurance Development fund), मानवी विमा योजना (Human Health Insurance package), किमान आधारभूत किंमत  Minimum support Price या संकल्पना प्रत्यक्षात येण्याची अत्याधिक गरज असल्याची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. यावर नियंत्रण राहिले नाही तर साठेबाजांचे फावते हे आपण पाहिले आहे. शेतकरी आयोग व कृषीमुल्य आयोगाने अधिकाधिक प्रभावीपणे काम करावे अशी अपेक्षा आज सर्वत्र व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी सरकारला शेतकरी आणि शिवसेनेच्या दबावामुळे करावीच लागली. मात्र ही योजना राबवताना ऑनलाईनच्या घोळात आणि किती शेतकऱ्यांनी अर्ज केले व किती नाही याची शहानिशा करण्यात अधिक वेळ गेला. आता मात्र या योजनेंतर्गत किती  शेतकऱ्यांना खरोखरीच लाभ मिळाला आहे याबाबतच्या जिल्हानिहाय यादीची मागणी महसूल विभागाकडे सभागृहाच्या समोर मी करीत आहे. महसूल यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. विदर्भ विकासाचा अहवाल सभागृहासमोर सादर करण्यात यावा. ’

१९ मे २०१७ रोजी नाशिक येथे शेतकरी संघटना, शेतकरी नेते खा. राजू शेट्टी यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची बैठक झाली होती. यानंतर १ जून ला ग्रामसभेचा ठराव झाला आणि शेतकरी संप जाहीर झाला.  ५ जून २०१७ रोजी सुकाणू समितीची स्थापना करून सरकारने १८ जून २०१७ ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अस्तित्वात आली. ज्या ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्यासाठी रक्त सांडावे लागले त्यांना मनपूर्वक अभिवादन करते. शिवजलक्रांती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ही एक समाधानाची बाब आहे. बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. पण राज्यात घडलेल्या शीतल वायाळ सारख्या मुलींच्या आत्महत्या, हुंडाबळीच्या अनेक केसेस या अजूनही वेदनादायकच आहेत. किशोरी व किशोर यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे यावर शासनाने काम करावे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून ३१ जुलै २०१७ पर्यंतच्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्याच्या त्यांची सूचना अंमलात आणल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हार्दिक आभार मानले आहेत

टॅग्स :Shiv Senaशिवसेना