शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

शेतकऱ्यापर्यंत योजना पोचविण्यासाठी शेतीदूतांची नेमणूक करा : नीलम गोऱ्हे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 16:10 IST

शेतीदूत नेमण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना, शेतकऱ्यांना वादळी पावसाने झालेल्या नुकसानभरपाईची मागणी

नागपूर : ‘राज्यात शेतकऱ्यांचा खरा विकास व्हायचा असेल तर राज्यात तालुकानिहाय शेतीदूतांची नेमणूक  करण्यात यावी. यामुळे राज्य व केंद्र सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचण्यास मदत होईल. मराठवाडा आणि विदर्भात वादळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. शासनाकडून त्यांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे. राज्यात गेल्या पाच महिन्यात १२५४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तसेच विषारी औषध फवारणीमुळे अनेक शेतकऱ्यांना आपले जीव गमवावे लागणे. ही अतिशय दुख: दायक गोष्ट आहे,’ असे शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या विधानपरिषद प्रतोद आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रतिपादन आज सभागृहात केले.

हिवाळी अधिवेशनात मांडलेल्या प्रस्तावात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, ‘शेतीजमिनीची सुधारणा करण्याची अत्यंत आवश्यकता असून शेतीतील उत्पादकता वाढायला हवी यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. शेतीमध्ये तयार होणाऱ्या मालाला योग्य ते संरक्षण मिळावे याकरिता कृषी विमा निधी (Agricultural Risk Fund),ग्रामीण विमा विकास निधी (Rural Insurance Development fund), मानवी विमा योजना (Human Health Insurance package), किमान आधारभूत किंमत  Minimum support Price या संकल्पना प्रत्यक्षात येण्याची अत्याधिक गरज असल्याची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. यावर नियंत्रण राहिले नाही तर साठेबाजांचे फावते हे आपण पाहिले आहे. शेतकरी आयोग व कृषीमुल्य आयोगाने अधिकाधिक प्रभावीपणे काम करावे अशी अपेक्षा आज सर्वत्र व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी सरकारला शेतकरी आणि शिवसेनेच्या दबावामुळे करावीच लागली. मात्र ही योजना राबवताना ऑनलाईनच्या घोळात आणि किती शेतकऱ्यांनी अर्ज केले व किती नाही याची शहानिशा करण्यात अधिक वेळ गेला. आता मात्र या योजनेंतर्गत किती  शेतकऱ्यांना खरोखरीच लाभ मिळाला आहे याबाबतच्या जिल्हानिहाय यादीची मागणी महसूल विभागाकडे सभागृहाच्या समोर मी करीत आहे. महसूल यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. विदर्भ विकासाचा अहवाल सभागृहासमोर सादर करण्यात यावा. ’

१९ मे २०१७ रोजी नाशिक येथे शेतकरी संघटना, शेतकरी नेते खा. राजू शेट्टी यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची बैठक झाली होती. यानंतर १ जून ला ग्रामसभेचा ठराव झाला आणि शेतकरी संप जाहीर झाला.  ५ जून २०१७ रोजी सुकाणू समितीची स्थापना करून सरकारने १८ जून २०१७ ला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अस्तित्वात आली. ज्या ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्यासाठी रक्त सांडावे लागले त्यांना मनपूर्वक अभिवादन करते. शिवजलक्रांती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ही एक समाधानाची बाब आहे. बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. पण राज्यात घडलेल्या शीतल वायाळ सारख्या मुलींच्या आत्महत्या, हुंडाबळीच्या अनेक केसेस या अजूनही वेदनादायकच आहेत. किशोरी व किशोर यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे यावर शासनाने काम करावे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून ३१ जुलै २०१७ पर्यंतच्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्याच्या त्यांची सूचना अंमलात आणल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हार्दिक आभार मानले आहेत

टॅग्स :Shiv Senaशिवसेना