शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कामगारांच्या आरोग्याची हेळसांड : १४०० कोटीमधून मिळतात ४०० कोटीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:48 IST

केंद्र सरकारकडून महाराष्ट्र शासनाला कामगार विमा रुग्णालयांसाठी वर्षाकाठी १४०० कोटींचा निधी मिळतो. मात्र राज्य शासनाकडून वर्षभरात केवळ ४०० कोटी रुपये देण्यात आले, उर्वरित एक हजार कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळविण्यात आला, असा गंभीर आरोप ‘कार्पोरेशन मेंबर ऑफ ईएसआयसी’ दिल्ली व ‘टीयूसीसी’चे राष्ट्रीय महामंत्री एस. पी. तिवारी यांनी केला.

ठळक मुद्दे‘ईएसआयसी’चे सदस्य तिवारी यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारकडून महाराष्ट्र शासनाला कामगार विमा रुग्णालयांसाठी वर्षाकाठी १४०० कोटींचा निधी मिळतो. मात्र राज्य शासनाकडून वर्षभरात केवळ ४०० कोटी रुपये देण्यात आले, उर्वरित एक हजार कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळविण्यात आला, असा गंभीर आरोप ‘कार्पोरेशन मेंबर ऑफ ईएसआयसी’ दिल्ली व ‘टीयूसीसी’चे राष्ट्रीय महामंत्री एस. पी. तिवारी यांनी केला.कामगार विमा रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा अभाव असल्याच्या सततच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर एस.पी. तिवारी यांनी बुधवारी कमाल चौक आणि गणेशपेठ येथील कामगार विमा डिस्पेन्सरीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कामगारांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याचे सांगत तिवारी म्हणाले, ‘ईएसआयसी’अंतर्गत कामगाराच्या वेतनातून दरमहा ठराविक रक्कम कपात करण्यात येते. ही रक्कम केंद्र शासनाच्या तिजोरीत जमा होते. या रकमेतून केंद्राकडून राज्य शासनाकडे कामगार रुग्णालयांसाठी १४०० कोटींचा निधी दरवर्षी पाठविण्यात येतो. तर राज्य शासन बराचसा निधी इतरत्र वळवून खर्च करते. अशाप्रकारे कामगारांच्या आरोग्याशी राज्य शासन खेळ करीत आहे. कामगारांना मात्र उपचारासाठी खासगी व इतर रुग्णालयात भटकंती करावी लागत आहे. ‘हाफकिन’ कंपनीवर औषध पुरवठ्याची जबाबदारी देण्यात आली. परंतु या कंपनीकडून पुरवठाच होत नसल्याने औषधांचा तुटवडा पडला आहे. १५ दिवसांच्या औषधांसाठी रुग्णांना रुग्णालयाच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे. अनेक औषधे रुग्णांना स्वत:च्या खर्चाने खरेदी करावी लागत आहे. कामगारांना हा खर्च दवाखान्यातून देण्यात येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. खासगी रुग्णालयाचे लाखो रुपये शासनाकडे थकीत असल्याचेही ते म्हणाले.केंद्राने विमा रुग्णालये जबाबदारी घ्यावीतिवारी म्हणाले, कामगार रुग्णालये चालविण्यास राज्य शासन असमर्थ ठरल्याचे दिसून येते. केंद्र शासनाने राज्य शासनाला विमा रुग्णालये ताब्यात घेण्याबाबत तंबी देखील दिली आहे. केंद्राने ताब्यात घेतल्यास या विमा रुग्णालयांचा कारभार सुरळीत होऊ शकेल.

 

टॅग्स :Employeeकर्मचारीhospitalहॉस्पिटल