शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

कामगारांच्या आरोग्याची हेळसांड : १४०० कोटीमधून मिळतात ४०० कोटीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:48 IST

केंद्र सरकारकडून महाराष्ट्र शासनाला कामगार विमा रुग्णालयांसाठी वर्षाकाठी १४०० कोटींचा निधी मिळतो. मात्र राज्य शासनाकडून वर्षभरात केवळ ४०० कोटी रुपये देण्यात आले, उर्वरित एक हजार कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळविण्यात आला, असा गंभीर आरोप ‘कार्पोरेशन मेंबर ऑफ ईएसआयसी’ दिल्ली व ‘टीयूसीसी’चे राष्ट्रीय महामंत्री एस. पी. तिवारी यांनी केला.

ठळक मुद्दे‘ईएसआयसी’चे सदस्य तिवारी यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारकडून महाराष्ट्र शासनाला कामगार विमा रुग्णालयांसाठी वर्षाकाठी १४०० कोटींचा निधी मिळतो. मात्र राज्य शासनाकडून वर्षभरात केवळ ४०० कोटी रुपये देण्यात आले, उर्वरित एक हजार कोटी रुपयांचा निधी इतरत्र वळविण्यात आला, असा गंभीर आरोप ‘कार्पोरेशन मेंबर ऑफ ईएसआयसी’ दिल्ली व ‘टीयूसीसी’चे राष्ट्रीय महामंत्री एस. पी. तिवारी यांनी केला.कामगार विमा रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा अभाव असल्याच्या सततच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर एस.पी. तिवारी यांनी बुधवारी कमाल चौक आणि गणेशपेठ येथील कामगार विमा डिस्पेन्सरीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कामगारांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याचे सांगत तिवारी म्हणाले, ‘ईएसआयसी’अंतर्गत कामगाराच्या वेतनातून दरमहा ठराविक रक्कम कपात करण्यात येते. ही रक्कम केंद्र शासनाच्या तिजोरीत जमा होते. या रकमेतून केंद्राकडून राज्य शासनाकडे कामगार रुग्णालयांसाठी १४०० कोटींचा निधी दरवर्षी पाठविण्यात येतो. तर राज्य शासन बराचसा निधी इतरत्र वळवून खर्च करते. अशाप्रकारे कामगारांच्या आरोग्याशी राज्य शासन खेळ करीत आहे. कामगारांना मात्र उपचारासाठी खासगी व इतर रुग्णालयात भटकंती करावी लागत आहे. ‘हाफकिन’ कंपनीवर औषध पुरवठ्याची जबाबदारी देण्यात आली. परंतु या कंपनीकडून पुरवठाच होत नसल्याने औषधांचा तुटवडा पडला आहे. १५ दिवसांच्या औषधांसाठी रुग्णांना रुग्णालयाच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे. अनेक औषधे रुग्णांना स्वत:च्या खर्चाने खरेदी करावी लागत आहे. कामगारांना हा खर्च दवाखान्यातून देण्यात येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. खासगी रुग्णालयाचे लाखो रुपये शासनाकडे थकीत असल्याचेही ते म्हणाले.केंद्राने विमा रुग्णालये जबाबदारी घ्यावीतिवारी म्हणाले, कामगार रुग्णालये चालविण्यास राज्य शासन असमर्थ ठरल्याचे दिसून येते. केंद्र शासनाने राज्य शासनाला विमा रुग्णालये ताब्यात घेण्याबाबत तंबी देखील दिली आहे. केंद्राने ताब्यात घेतल्यास या विमा रुग्णालयांचा कारभार सुरळीत होऊ शकेल.

 

टॅग्स :Employeeकर्मचारीhospitalहॉस्पिटल