शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

पोलीस दल अधिक मजबूत करण्यावर भर : पालकमंत्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:42 IST

पोलीस दल अधिक मजबूत आणि आवश्यक त्या सुविधांसह सज्ज असणे आवश्यक आहे, यासाठी पोलीस दलाला आवश्यक सुविधांसह परिपूर्ण करण्यावर शासन भर देत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ठळक मुद्देकपिलनगर, पारडी, वाठोडा पोलीस ठाण्याचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांचे आणि त्यांच्या मालमत्तांचे रक्षण करणे शासनाचे कर्तव्य आहे. यासाठी पोलीस दल अधिक मजबूत आणि आवश्यक त्या सुविधांसह सज्ज असणे आवश्यक आहे, यासाठी पोलीस दलाला आवश्यक सुविधांसह परिपूर्ण करण्यावर शासन भर देत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.शहरातील उत्तर नागपुरात कपिलनगर, पूर्व नागपुरात पारडी व वाठोडा या तीन पोलीस ठाण्यांचे उद्घाटन बुधवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आ. डॉ. मिलिंद माने, आ. कृष्णा खोपडे, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अपर पोलीस आयुक्त (दक्षिण विभाग) बी.जी.गायकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) निलेश भरणे, अपर पोलीस आयुक्त, (उत्तर विभाग) शशिकांत महावरकर, पोलीस उपआयक्त निर्मलादेवी, पोलीस उपायुक्त निलोत्पल, पोलीस उपआयुक्त (डीटेक्शन)गजानन राजमाने, पोलीस उपआयुक्त, (मुख्यालय) विक्रम साळी, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, पांडुरंग मेहर, बाल्या बोरकर, नगरसेविका चेतना टांक, पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, पोलिसांना देण्यात येणाऱ्या सुविधा, निवासस्थानांचे बांधकाम, पोलीस ठाण्यांच्या इमारतीची दुरुस्ती व अन्य कारणांसाठी मागील चार वर्षात शासनाने ९०० कोटी रुपये नागपूर पोलिसांना दिले असून आजपर्यंत पोलीस विभागाला एवढा निधी कधीच मिळाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हा निधी प्राप्त होऊ शकला, असेही त्यांनी स्पष्ट केले.जरीपटका पोलीस ठाण्यावर येणारा भार कमी करण्यासाठी कपिलनगर व कळमना पोलीस ठाण्यावरील भार कमी करण्यासाठी पारडी आणि वाठोडा अशा पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. या तीनही पोलीस ठाण्यांना आवश्यक तेवढे पोलीस कर्मचारी देण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.अनधिकृत वस्त्यांमधील घरे नियमित करूशहराला लागून असलेल्या पण एनएमआरडीएच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या नागरिकांच्या अनधिकृत घरांचे नियमितीकरण एनएमआरडीएमार्फत करून देण्यात येईल. नागरिकांनी याबद्दल कोणतीही काळजी करू नये. एकही घर अनधिकृत राहणार नाही याची काळजी शासन घेणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी गोन्हीसिम येथे बोलताना केले.पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते बहादुरा, खरबी व गोन्हीसिम या तीनही ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेPolice Stationपोलीस ठाणे