शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
2
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
3
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
4
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
5
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
6
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
7
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
8
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
9
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
10
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
11
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
12
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
13
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
14
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
15
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
16
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
17
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
18
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
19
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
20
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
Daily Top 2Weekly Top 5

जादा दंडाच्या कारवाईवरच जोर

By admin | Updated: June 16, 2014 01:05 IST

भारतात दररोज सरासरी २५० माणसे वाहन अपघातात मृत्युमुखी पडतात. ७०० व्यक्ती रोज जखमी अथवा कायमच्या अपंग होतात. एकट्या नागपुरात मागील १४ महिन्यांत १५१६ अपघात झाले असून

नागपूर : भारतात दररोज सरासरी २५० माणसे वाहन अपघातात मृत्युमुखी पडतात. ७०० व्यक्ती रोज जखमी अथवा कायमच्या अपंग होतात. एकट्या नागपुरात मागील १४ महिन्यांत १५१६ अपघात झाले असून यात ३७३ जणांचा मृत्यू तर १५१३ जण जखमी झाले आहेत. ही संख्या कोणत्याही प्रकाराच्या आजाराने किंवा नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या जीवहानीपेक्षाही मोठी आहे. असे असतानाही वाहतुकीचे नियम सांगणारे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) हतबल झाले आहे. शासनाकडून दिलेले टार्गेट (लक्ष्य) पूर्ण करण्यासाठी नियमांच्या पूर्ततेकडे विशेष लक्ष दिले जात नाही. जास्तीत जास्त महसूल गोळा करण्यासाठी जादा दंडाच्या कारवाईवरच जोर दिला जात असल्याचे चित्र आहे.वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच पार्किंगच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्र मणे व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड झाली आहे. मात्र, आरटीओचे वायू पथक क्वचितच शहरात दिसून येते. अनेकांचा जोर आवडीच्या सीमा तपासणी नाक्यांवरच असतो. आरटीओ, ग्रामीणअंतर्गत महत्त्वाचे चार नाके येतात. यात भंडारा मार्गावरील साकोलीपुढे देवरी येथे सीमा तपासणी नाका आहे. या नाक्यावर एका पाळीत ५०० ते ६०० ट्रक्स येतात. जबलपूर मार्गावर देवलापारच्या पुढे मानेगावटेक येथील सीमा तपासणी नाक्यावर २०० ते ४०० ट्रक्स, पांढुर्णा मार्गावरील उमरी नाक्यावर सुमारे ३००च्यावर ट्रक्स तर चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील देवाडा नाक्यावर ३०० च्यावर ट्रक्स येतात. या नाक्यांवर तीन पाळीत तपासणीचे काम सुरू असते. मोटार वाहन कायद्यातील कलम १९४ नुसार वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून नेला जात असेल तर प्रत्येक टनामागे सुमारे ४ हजार ५०० रुपये या दराने शुल्क आकारले जाते. मात्र वाहतूकदारांमध्ये हा दंड बुडविण्याची प्रवृत्ती अधिक असते. याचा फायदा निरीक्षक घेत असल्याने दिवसभरात हजारो रुपयांची माया जमा होते. शिवाय आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत मोठा महसूलही गोळा होतो. यामुळेच नाक्यांवर काम करण्यासाठी निरीक्षकांमध्ये चढाओढ लागते. या वर्षी नागपूर शहर आरटीओ कार्यालयाला विविध कामाचे लक्ष्य दिले होते, परंतु जादा दंडाचे लक्ष्य सोडल्यास इतरमध्ये ५० टक्केही लक्ष्य पूर्ण झालेले नाही. हेल्मेटवरील कारवाईत तर आतापर्यंत शून्य लक्ष्य आहे. अतिक्षमता प्रवासी रहदारीसाठी ३६५ प्रकरणांचे लक्ष्य दिले असताना फक्त ६९ लक्ष्य पूर्ण झाले आहे. सस्पेन्शन आॅफ परमिटची फक्त एक कारवाई तर वाहनाच्या छतावर सामान घेऊन जाणाऱ्या केवळ तीन वाहनांवर कारवाई झाली आहे. (प्रतिनिधी)