शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

जादा दंडाच्या कारवाईवरच जोर

By admin | Updated: June 16, 2014 01:05 IST

भारतात दररोज सरासरी २५० माणसे वाहन अपघातात मृत्युमुखी पडतात. ७०० व्यक्ती रोज जखमी अथवा कायमच्या अपंग होतात. एकट्या नागपुरात मागील १४ महिन्यांत १५१६ अपघात झाले असून

नागपूर : भारतात दररोज सरासरी २५० माणसे वाहन अपघातात मृत्युमुखी पडतात. ७०० व्यक्ती रोज जखमी अथवा कायमच्या अपंग होतात. एकट्या नागपुरात मागील १४ महिन्यांत १५१६ अपघात झाले असून यात ३७३ जणांचा मृत्यू तर १५१३ जण जखमी झाले आहेत. ही संख्या कोणत्याही प्रकाराच्या आजाराने किंवा नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या जीवहानीपेक्षाही मोठी आहे. असे असतानाही वाहतुकीचे नियम सांगणारे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) हतबल झाले आहे. शासनाकडून दिलेले टार्गेट (लक्ष्य) पूर्ण करण्यासाठी नियमांच्या पूर्ततेकडे विशेष लक्ष दिले जात नाही. जास्तीत जास्त महसूल गोळा करण्यासाठी जादा दंडाच्या कारवाईवरच जोर दिला जात असल्याचे चित्र आहे.वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच पार्किंगच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्र मणे व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड झाली आहे. मात्र, आरटीओचे वायू पथक क्वचितच शहरात दिसून येते. अनेकांचा जोर आवडीच्या सीमा तपासणी नाक्यांवरच असतो. आरटीओ, ग्रामीणअंतर्गत महत्त्वाचे चार नाके येतात. यात भंडारा मार्गावरील साकोलीपुढे देवरी येथे सीमा तपासणी नाका आहे. या नाक्यावर एका पाळीत ५०० ते ६०० ट्रक्स येतात. जबलपूर मार्गावर देवलापारच्या पुढे मानेगावटेक येथील सीमा तपासणी नाक्यावर २०० ते ४०० ट्रक्स, पांढुर्णा मार्गावरील उमरी नाक्यावर सुमारे ३००च्यावर ट्रक्स तर चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील देवाडा नाक्यावर ३०० च्यावर ट्रक्स येतात. या नाक्यांवर तीन पाळीत तपासणीचे काम सुरू असते. मोटार वाहन कायद्यातील कलम १९४ नुसार वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून नेला जात असेल तर प्रत्येक टनामागे सुमारे ४ हजार ५०० रुपये या दराने शुल्क आकारले जाते. मात्र वाहतूकदारांमध्ये हा दंड बुडविण्याची प्रवृत्ती अधिक असते. याचा फायदा निरीक्षक घेत असल्याने दिवसभरात हजारो रुपयांची माया जमा होते. शिवाय आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत मोठा महसूलही गोळा होतो. यामुळेच नाक्यांवर काम करण्यासाठी निरीक्षकांमध्ये चढाओढ लागते. या वर्षी नागपूर शहर आरटीओ कार्यालयाला विविध कामाचे लक्ष्य दिले होते, परंतु जादा दंडाचे लक्ष्य सोडल्यास इतरमध्ये ५० टक्केही लक्ष्य पूर्ण झालेले नाही. हेल्मेटवरील कारवाईत तर आतापर्यंत शून्य लक्ष्य आहे. अतिक्षमता प्रवासी रहदारीसाठी ३६५ प्रकरणांचे लक्ष्य दिले असताना फक्त ६९ लक्ष्य पूर्ण झाले आहे. सस्पेन्शन आॅफ परमिटची फक्त एक कारवाई तर वाहनाच्या छतावर सामान घेऊन जाणाऱ्या केवळ तीन वाहनांवर कारवाई झाली आहे. (प्रतिनिधी)