शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

महारॅली काढून आरक्षण वाचविण्यासाठी नागपुरातून एल्गार

By निशांत वानखेडे | Updated: September 24, 2024 18:59 IST

३ ऑक्टाेबरला मुंबई मंत्रालयावर धडकणार : ‘जाती तोडो - समाज जोडो’ अभियानाची गर्जना

नागपूर : ‘जाती तोडो - समाज जोडो’चा नारा देत आरक्षण बचाव महारॅलीला मंगळवारी नागपुरातून दणक्यात सुरुवात झाली. शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघ फिरून शहरातील रॅलीची सांगता मेडिकल चाैक येथे झाली. ही महारॅली बुधवारी मुंबईकडे रवाना हाेणार असून, ३ ऑक्टाेबरला मंत्रालयावर धडक देणार आहे.

मंगळवारी सकाळी संविधान चाैक येथून महारॅलीला सुरुवात झाली. कास्ट्राईब महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे तसेच माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घाेलप, प्रा. राहुल मून, प्रा. रमेश पिसे, प्रा. मधुकर उईके, मीना भागवतकर, नामा जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वात सुरू झालेली रॅली पश्चिम नागपूर, उत्तर नागपूर, मध्य, पूर्व, दक्षिण व दक्षिण-पश्चिम नागपूरच्या भागात फिरून रात्री मेडिकल चाैक येथे तिचे समापन झाले. बुधवारी अण्णा भाऊ साठे चाैक, दीक्षाभूमी येथून ही रॅली रवाना हाेणार असून, ३ ऑक्टाेबरला आझाद मैदान, मुंबई येथे महारॅलीचा समाराेप हाेणार आहे.

कास्ट्राईब महासंघ, संविधान परिवार, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन, भारतीय बौद्ध महासभा व इतर संघटना एकत्रित करून आरक्षण बचाव कृती समितीद्वारा आयोजित आरक्षण बचाव महारॅली काढण्यात आली आहे. राज्य सरकार ओबीसी, एससी/एसटी, भटके व विमुक्तांचे, आरक्षण बंद करण्याचे षड्यंत्र करीत असल्याचा आराेप महारॅलीतून करण्यात आला. पदोन्नतीतील आरक्षण तत्काळ लागू करावे, अनुसूचित जातींचे वर्गीकरण करण्यात येऊ नये, ओबीसी एस.सी. एस. टी.-व्हीजेएनटीसोबत भेदभाव बंद करावा. बार्टी, महाज्योती समाजकल्याण, आदिवासी विभागाचा निधी मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेसाठी वापरू नये, सर्व मुलामुलींना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावे, शिष्यवृत्ती वेळेवर व महागाईच्या प्रमाणात देण्यात यावी, मागासवर्गीयांवरील अन्याय दूर करावा, या व इतर मागण्या या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या मागासवर्गीय धोरणाविरोधात नागपूर ते मुंबई मंत्रालय महारॅली काढण्यात आल्याचे अरुण गाडे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरreservationआरक्षण