शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

गडचिरोलीतील हत्ती नेणार गुजरातमधील अंबानी प्राणीसंग्रहालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 07:00 IST

Gadchiroli News कमलापूर आणि आलापल्लीतील मिळून ७ हत्ती आता रिलायन्स ग्रुपच्या वतीने गुजरातमध्ये उभारल्या जात असलेल्या प्राणिसंग्रहालयाला दिले जाणार आहेत.

ठळक मुद्देपर्यटकांचे आकर्षण असणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्पचे अस्तित्व धोक्यात

 

मनोज ताजने

गडचिरोली : संपूर्ण राज्यभरात हत्तींना पाहण्यासाठी एकमेव आकर्षण असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कारण कमलापूर आणि आलापल्लीतील मिळून ७ हत्ती आता रिलायन्स ग्रुपच्या वतीने गुजरातमध्ये उभारल्या जात असलेल्या प्राणिसंग्रहालयाला दिले जाणार आहेत. एका खासगी प्राणिसंग्रहालयाची शान वाढविण्यासाठी ही अनमोल सरकारी मालमत्ता देण्याच्या या खटाटोपाबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, गुजरातच्या जामनगर भागात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून देशातील सर्वांत मोठे प्राणिसंग्रहालय उभारले जात आहे. या खासगी प्राणिसंग्रहालयासाठी देशभरातून विविध वन्यप्राणी मागविले जात आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाकडून अनेक ठिकाणचे दुर्मीळ प्राणी या प्राणिसंग्रहालयासाठी देण्याची अनुमतीही दिली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाच्या ताब्यातील कमलापूर हत्ती कॅम्पमधून ७ पैकी ४ हत्ती, तर आलापल्लीतील ३ पैकी ३ हत्ती गुजरातला पाठविले जाणार आहेत. कमलापूरमधील कोणते ४ हत्ती घेऊन जायचे हे रिलायन्सने पाठविलेले डॉक्टरच ठरवतील. त्यामुळे चांगले हत्ती गेल्यानंतर कमलापुरात शिल्लक राहणाऱ्या ३ हत्तींची वंशावळ वाढू शकली नाही तर येथील हत्ती कॅम्पचे अस्तित्वच संपुष्टात येणार आहे.

पर्यटकांचा हिरमोड होणार

कमलापूर आणि आलापल्ली येथील नैसर्गिक जंगलात ४० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून वन विभागाकडून हत्तींचे पालनपोषण केले जाते. या हत्तींची वंशावळ वाढून कमलापुरात १० पेक्षा जास्त हत्ती झाले होते. त्यामुळे नक्षलग्रस्त भाग असूनही राज्यभरातील पर्यटक येथे हत्तींना पाहण्यासाठी येतात आणि येथील नैसर्गिक वातावरणात रमतात; पण आता हत्ती गेल्यानंतर हा कॅम्प ओसाड पडणार आहे.

राज्य सरकारची उदासीनता

कमलापूरमधील हत्तींच्या पालनपोषणासाठी राज्य सरकारकडून वेळेवर निधी मिळत नाही. हत्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, पशुवैद्यकीय अधिकारीही नाही. गेल्या दोन वर्षांत या कॅम्पमधील तीन हत्तींची पिले आजारांनी मरण पावली. राज्यात एकमेव असलेल्या या हत्ती कॅम्पकडे सरकारने लक्ष दिल्यास गडचिरोलीतील पर्यटन वाढून रोजगारनिर्मिती होऊ शकते.

टॅग्स :wildlifeवन्यजीव