शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

महाराष्ट्रात वीज स्वस्त होणार नाहीच ! महावितरण आणि आयोगातील वादाचा बसणार ग्राहकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 11:02 IST

Nagpur : आयोगाच्या निर्णयामुळे काही ग्राहक वर्गाचे नुकसान होईल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग आणि महावितरण यांच्यातील वादामुळे राज्यातील नागरिकांना सध्या तरी स्वस्त वीज मिळणार नाही. नागरिकांना सध्याच्याच जुन्या दरानुसार वीजबिल भरावे लागेल. महावितरणच्या आक्षेपानंतर नियामक आयोगाने सर्व श्रेणीच्या वीज दरात सुमारे १० टक्के कपात करण्याच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

महावितरणने २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीसाठी दर निश्चिती याचिका दाखल केली होती. आयोगाने २८ मार्च रोजी त्यावर निर्णय घेत वीज दरात सरासरी १० टक्के कपात जाहीर केली. नवीन दर १ एप्रिलपासून लागू होणार होते. मात्र, महावितरणने या आदेशावर आक्षेप घेत पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. 

आयोगाचे अध्यक्ष संजय कुमार, सदस्य सुरेंद्र बियाणी आणि आनंद लिमये यांच्या खंडपीठाने बुधवारी आपल्या जुन्या आदेशाला स्थगिती देत स्पष्ट केले की, सध्या नागरिकांना जुन्या दरानेच वीजबिल भरावे लागेल. आयोगाने सांगितले की, महावितरणच्या वकिलांनी त्यांच्या आदेशावर आक्षेप घेतला. 

कंपनी एप्रिलच्या अखेरीस पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले. कंपनीने आदेशावर स्थगिती देण्याची विनंती केली, जी आयोगाने मान्य केली. विशेष म्हणजे 'लोकमत' ने बुधवारच्या अंकात म्हटले होते की महावितरणला आयोगाच्या निर्णयावर आक्षेप असून पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. 

महावितरणच्या आक्षेपाचे मुद्दे

  • महावितरणने आयोगाकडे ४८,०६६ कोटी रुपयांच्या भरपाईची परवानगी मागितली होती, मात्र आयोगाने ४४,४८० कोटींचा अधिशेष घोषित केला.
  • घरगुती ग्राहकांचे दर कमी करण्याऐवजी औद्योगिक दरात मोठी कपात करण्यात आली. 
  • महावितरण टप्प्याटप्प्याने दर सवलत देण्याच्या बाजूने होते, मात्र आयोगाने एकदम कपात केली.
  • आयोगाच्या अभिलेखांमध्ये स्पष्ट त्रुटी असल्याचा महावितरणचा दावा.
  • आयोगाच्या निर्णयामुळे काही ग्राहक वर्गाचे नुकसान होईल.
टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर