शहरं
Join us  
Trending Stories
1
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
2
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
3
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
4
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
5
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
6
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
7
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
8
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
9
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
10
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
11
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
12
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
13
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
14
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
15
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
16
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
17
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
18
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
19
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
20
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
Daily Top 2Weekly Top 5

पुढील पाच वर्षे वाढतील विजेचे दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 11:21 IST

महावितरण कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमक्ष ‘मल्टी इयर टॅरिफ’ याचिका दाखल करून ग्राहकांना महाग विजेचा धक्का दिला आहे.

ठळक मुद्दे ६० हजार ३१३ कोटींचा खर्च भरून काढणारमहावितरणची याचिका

कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरण कंपनीने महाराष्ट्र वीज नियामक आयोगासमक्ष ‘मल्टी इयर टॅरिफ’ याचिका दाखल करून ग्राहकांना महाग विजेचा धक्का दिला आहे. या याचिकेद्वारे पुढील पाच वर्षे वीज दरात वाढ करण्याची तयारी आहे. कंपनीने त्यांचा खर्च ८० हजार ३१३ कोटी ११ लाख रुपयांनी वाढल्याचा दावा केला आहे. तो खर्च भरून काढण्यासाठी दर वृद्धीचा निर्णय घेण्यात आला आहे.महाविकास आघाडी सरकारने वीज दर वाढविणार नाही, असे आश्वासन दिले आहे. असे असताना महावितरणने हे पाऊल उचलले आहे.त्याअंतर्गत २०२०-२१ मध्ये ५.८० टक्के, २०२१-२२ मध्ये ३.२५ टक्के, २०२२-२३ मध्ये २.९३ टक्के, २०२३-२४ मध्ये २.६१ टक्के तर, २०२४-२५ मध्ये २.५४ टक्के दर वृद्धी करण्यात येईल. कंपनीचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण यांच्यानुसार, वीज उत्पादन व पारेषण खर्चवाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, दरवृद्धी केवळ बीपीएल ते ५०० युनिटपर्यंत उपयोग करणाऱ्या ग्राहकांसाठीच आहे.त्यापेक्षा जास्त युनिट वापरणाºया ग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे. स्थिर शुल्क, वहन शुल्क, वीजहानी शुल्क यातही वृद्धी करण्याचा प्रस्ताव आहे.कृषी, उद्योगांना धक्काशेतकऱ्यांचे दोन लाख रुपये कर्ज माफ झाले आहे. परंतु, वीज दरात त्यांना धक्का बसला आहे. श्रेणीनुसार त्यांना बिना मीटरच्या कृषिपंप कनेक्शनच्या प्रति एचपी ६ ते ७ टक्के अधिक दर द्यावे लागतील. मीटरच्या कनेक्शनलाही पहिल्या वर्षी ५ ते ८ टक्के अधिक दर द्यावे लागतील. याशिवाय उद्योगांची बिलिंग प्रणालीही बदलण्यात आली आहे. सध्या उद्योगांच्या प्रति युनिट दरात ४ टक्के वृद्धी होईल. त्याचप्रमाणे अपारंपरिक ऊर्जेचा उपयोग करणाºयांकडून घेतला जाणारा अतिरिक्त अधिभारही पाच वर्षे वाढत राहील. सोलर रुफ टॉप लावणाºयांना प्रति एचपी लोड ग्रीड सहायता शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे.जनसुनावणीनंतर निर्णयमहाराष्ट्र वीज नियामक आयोग वीज दरात वृद्धी करण्यापूर्वी जनसुनावणी घेऊन नागरिकांचे आक्षेप व सूचना जाणून घेईल. निर्धारित कार्यक्रमानुसार नागपूर येथे ११ फेब्रुवारी, पुणे येथे ६ फेब्रुवारी, नवी मुंबईत ८ फेब्रुवारी, अमरावतीत १० फेब्रुवारी, औरंगाबाद येथे १३ फेब्रुवारी तर, नाशिक येथे १५ फेब्रुवारी रोजी जनसुनावणी होईल.

टॅग्स :mahavitaranमहावितरण