शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
3
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
4
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
5
सुनील गावस्कर यांचा घरच्या मैदानावर होणार सन्मान, वानखेडे स्टेडियममध्ये MCA उभारणार पुतळा
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
8
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
9
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
10
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
11
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
12
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
13
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
14
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
15
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
16
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
17
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
18
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
19
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
20
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा

दाभोळ वीज विकण्यास तयार; पण महावितरणची खरेदीस ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 13:34 IST

सध्या महानिर्मितीकडे पुरेसा कोळसा नाही व कोयना प्रकल्पातील पाणी एप्रिलमध्ये संपण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभारनियमन करून नागरिकांना दिला जातोय मनस्ताप

आशिष रॉय

नागपूर : बाजारात आवश्यक वीज उपलब्ध नसल्यामुळे भारनियमन करण्याची वेळ आली, असा दावा राज्य सरकार व महावितरण कंपनी करीत आहे. दोन हजार १०० मेगावॅटच्या दाभोळ वीज प्रकल्पाकडे वीज उपलब्ध आहे. परंतु, किंमत जास्त असल्यामुळे महावितरण वीज खरेदी करण्यास तयार नाही. त्याऐवजी राज्यातील विविध भागात दीर्घ वेळासाठी भारनियमन केले जात आहे. १३ एप्रिल रोजी दुपारी दोन हजार मेगावॅटपेक्षा अधिक विजेचे भारनियमन करण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभोळ प्रकल्पाचे अधिकाऱ्यांनी ९ रुपये प्रतियुनिटप्रमाणे वीज विकण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, सरकार महागडी वीज खरेदी करण्यास तयार नसल्यामुळे महावितरणने हा प्रस्ताव अमान्य केला. राज्य सरकार चर्चा करून वीज दर कमी करू शकले असते. परंतु, तसे झाले नाही. दाभोळ प्रकल्प मार्चमध्ये बंद करण्यात आला. सरकारने हा प्रकल्प उन्हाळा संपेपर्यंत सुरू ठेवायला सांगणे आवश्यक होते. कारण, सध्या महानिर्मितीकडे पुरेसा कोळसा नाही व कोयना प्रकल्पातील पाणी एप्रिलमध्ये संपण्याची शक्यता आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लोकमतला सांगितले की, महावितरण कंपनी दाभोळकडून वीज खरेदी करणार नव्हती, तर गरज पडेल त्यावेळी एक्स्चेंजेसकडून वीज घेणार होती. १३ एप्रिल रोजी कमाल भारनियमन दोन हजार ३०० मेगावॅटचे होते. त्यामुळे महावितरण आवश्यक वीज खरेदी करीत नाही.

सूत्रांनी सांगितले की, सरकारी विभागांनी महावितरणला नऊ हजार कोटी रुपये देणे आहे. त्यापैकी अर्धी रक्कम मिळाली तरी, महावितरण दाभोळ व इतरांकडून आवश्यक वीज खरेदी करू शकेल. याशिवाय सरकारने महावितरणला विशेष निधी देणेही गरजेचे आहे. परंतु, सरकारची यात रुची नाही.

मागणी कमी झाल्याचा दावा

राज्यातील विविध भागांत भारनियमन केले जात असताना, महावितरणचे अधिकारी विजेची मागणी १५०० मेगावॅटने कमी झाल्याचा दावा करीत आहेत, तसेच लवकरच भारनियमन करण्याची गरज पडणार नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. सत्य परिस्थिती अशी आहे की, १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता विजेची कमाल मागणी २४ हजार ६०० मेगावॅट होती आणि दोन हजार ३०० मेगावॉटचे भारनियमन करण्यात आले. असे असताना महावितरणचे अधिकारी विजेची मागणी कमी झाल्याचे गमतीदार दावे करीत आहेत. भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी भंडारा जिल्ह्यातील एका उपकेंद्राची तोडफोड केली. शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

राज्याचा केंद्र सरकारवर आरोप

राज्य सरकार कोणत्याही किमतीत वीज खरेदी करण्यास तयार आहे; पण वीज उपलब्ध नाही. याशिवाय केंद्र सरकारने वीज खरेदीसाठी १२ रुपये प्रतियुनिटची मर्यादा ठेवली आहे, असा आरोप राज्य सरकारने केला आहे. परंतु, सत्य असे आहे की, महावितरण ६ रुपयापेक्षा अधिक दराने वीज खरेदी करण्यास तयार नाही. त्याऐवजी भारनियमन केले जात आहे.

टॅग्स :electricityवीजNitin Rautनितीन राऊत