शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दाभोळ वीज विकण्यास तयार; पण महावितरणची खरेदीस ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2022 13:34 IST

सध्या महानिर्मितीकडे पुरेसा कोळसा नाही व कोयना प्रकल्पातील पाणी एप्रिलमध्ये संपण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देभारनियमन करून नागरिकांना दिला जातोय मनस्ताप

आशिष रॉय

नागपूर : बाजारात आवश्यक वीज उपलब्ध नसल्यामुळे भारनियमन करण्याची वेळ आली, असा दावा राज्य सरकार व महावितरण कंपनी करीत आहे. दोन हजार १०० मेगावॅटच्या दाभोळ वीज प्रकल्पाकडे वीज उपलब्ध आहे. परंतु, किंमत जास्त असल्यामुळे महावितरण वीज खरेदी करण्यास तयार नाही. त्याऐवजी राज्यातील विविध भागात दीर्घ वेळासाठी भारनियमन केले जात आहे. १३ एप्रिल रोजी दुपारी दोन हजार मेगावॅटपेक्षा अधिक विजेचे भारनियमन करण्यात आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभोळ प्रकल्पाचे अधिकाऱ्यांनी ९ रुपये प्रतियुनिटप्रमाणे वीज विकण्याची तयारी दर्शविली होती. परंतु, सरकार महागडी वीज खरेदी करण्यास तयार नसल्यामुळे महावितरणने हा प्रस्ताव अमान्य केला. राज्य सरकार चर्चा करून वीज दर कमी करू शकले असते. परंतु, तसे झाले नाही. दाभोळ प्रकल्प मार्चमध्ये बंद करण्यात आला. सरकारने हा प्रकल्प उन्हाळा संपेपर्यंत सुरू ठेवायला सांगणे आवश्यक होते. कारण, सध्या महानिर्मितीकडे पुरेसा कोळसा नाही व कोयना प्रकल्पातील पाणी एप्रिलमध्ये संपण्याची शक्यता आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लोकमतला सांगितले की, महावितरण कंपनी दाभोळकडून वीज खरेदी करणार नव्हती, तर गरज पडेल त्यावेळी एक्स्चेंजेसकडून वीज घेणार होती. १३ एप्रिल रोजी कमाल भारनियमन दोन हजार ३०० मेगावॅटचे होते. त्यामुळे महावितरण आवश्यक वीज खरेदी करीत नाही.

सूत्रांनी सांगितले की, सरकारी विभागांनी महावितरणला नऊ हजार कोटी रुपये देणे आहे. त्यापैकी अर्धी रक्कम मिळाली तरी, महावितरण दाभोळ व इतरांकडून आवश्यक वीज खरेदी करू शकेल. याशिवाय सरकारने महावितरणला विशेष निधी देणेही गरजेचे आहे. परंतु, सरकारची यात रुची नाही.

मागणी कमी झाल्याचा दावा

राज्यातील विविध भागांत भारनियमन केले जात असताना, महावितरणचे अधिकारी विजेची मागणी १५०० मेगावॅटने कमी झाल्याचा दावा करीत आहेत, तसेच लवकरच भारनियमन करण्याची गरज पडणार नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. सत्य परिस्थिती अशी आहे की, १३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता विजेची कमाल मागणी २४ हजार ६०० मेगावॅट होती आणि दोन हजार ३०० मेगावॉटचे भारनियमन करण्यात आले. असे असताना महावितरणचे अधिकारी विजेची मागणी कमी झाल्याचे गमतीदार दावे करीत आहेत. भारनियमनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी गुरुवारी भंडारा जिल्ह्यातील एका उपकेंद्राची तोडफोड केली. शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

राज्याचा केंद्र सरकारवर आरोप

राज्य सरकार कोणत्याही किमतीत वीज खरेदी करण्यास तयार आहे; पण वीज उपलब्ध नाही. याशिवाय केंद्र सरकारने वीज खरेदीसाठी १२ रुपये प्रतियुनिटची मर्यादा ठेवली आहे, असा आरोप राज्य सरकारने केला आहे. परंतु, सत्य असे आहे की, महावितरण ६ रुपयापेक्षा अधिक दराने वीज खरेदी करण्यास तयार नाही. त्याऐवजी भारनियमन केले जात आहे.

टॅग्स :electricityवीजNitin Rautनितीन राऊत