शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मीटरचा फोटो असलेले वीज बिल होणार कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 21:23 IST

महावितरण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वपर करीत ग्राहकांना उत्तमोत्तम व परदर्शी सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत घरातील वीज मीटरचा फोटो असलेले वीज बिल गाहकांना पाठवले जात होते. परंतु आता मोबाईलच्या काळात महावितरणने आणखी एक पाऊल पुढे टाकत थेट मोबाईल सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता थेट मोबाईलवरच वीज बिलाची संपूर्ण माहिती उपलब्ध केली जाईल.

ठळक मुद्देएसएमएस सेवा सुरू : वीज ग्राहकांना मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महावितरण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वपर करीत ग्राहकांना उत्तमोत्तम व परदर्शी सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत घरातील वीज मीटरचा फोटो असलेले वीज बिल गाहकांना पाठवले जात होते. परंतु आता मोबाईलच्या काळात महावितरणने आणखी एक पाऊल पुढे टाकत थेट मोबाईल सेवा सुरू केली आहे. त्यामुळे आता थेट मोबाईलवरच वीज बिलाची संपूर्ण माहिती उपलब्ध केली जाईल.वीज देयकांमध्ये अचूकता आणि पारदर्शकतेसाठी बिलांवर मीटरचा फोटो द्यायचा प्रयोग महावितरणने २००८ साली सुरू केला. अशा प्रकारची सुविधा देणारी महावितरण ही भारतातील पहिली वीज वितरण कंपनी ठरली होती, महावितरणच्या या यशस्वी प्रयोगाचे अनुकरण भारतातील इतरही वीज वितरण कंपन्यांसोबतच, पाणीपुरवठा आणि इतरही अनेकांनी केला आहे. तेव्हापासून आतापर्यंत महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्राहकसेवेत केलेल्या सकारात्मक सुधारणांमुळे महावितरणच्या वीज देयक प्रणालीत मोठ्या प्रमाणात पारदर्शकता आली. त्यातही महावितरण मोबाईल अ‍ॅपमुळे देयक प्रणालीत मानवी हस्तक्षेपाला संधीच उरलेली नाही, यासोबतच मीटर रिडरने मीटरवरील वीज वापराची नोंद घेताच त्याची माहिती देणारा एसएमएस काही क्षणातच संबंधित वीज ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर दिल्या जात असल्याने ग्राहकाला रिडींग योग्य असल्याची खातरजमा करणेही सहज शक्य झाले आहे. सोबतच वीजबिलावर हाय रिसोल्युशन फोटो छापण्यासाठी लागणारा कालावधी आणि फोटोचा दर्जा बघता उपलब्ध एसएमएसची सुविधा अधिक पारदर्शी, सोयीस्कर आणि तत्पर प्रक्रिया असल्याने मीटरचा फोटोसहित असणारी वीजदेयक प्रक्रिया लवकरच कालबाह्य होणार आहे. ग्राहकाला एसएमएसच्या माध्यमातून अशा प्रकारची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या देशातील काही निवडक वीज वितरण कंपन्यांमध्ये महावितरणचा समावेश आहे. महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीज रिडींग, वीज देयक आणि वीजपुरवठा आदीबाबतची माहिती एसएमएसच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जात आहे. राज्यात महावितरणचे सुमारे २ कोटी ५४ लाख ग्राहक असून त्यापैकी २ कोटींहुन अधिक ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. उर्वरित ग्राहकांनीही त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंद करून महावितरणच्या एसएमएस सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल