शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

वीज बिलाची थकबाकी पोहोचली ४२ हजार कोटीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 23:50 IST

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात विजेच्या बिलाची थकबाकी ४२ हजार कोटीवर पोहोचली आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या कामगार संघटनेने ही आकडेवारी सादर करीत महावितरणला या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारला पॅकेजची मागणी केली आहे.

ठळक मुद्देइलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन : महावितरणसाठी मागितले पॅकेज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात विजेच्या बिलाची थकबाकी ४२ हजार कोटीवर पोहोचली आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन या कामगार संघटनेने ही आकडेवारी सादर करीत महावितरणला या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारला पॅकेजची मागणी केली आहे.फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात वीजबिलाची थकबाकी दर महिन्याला वाढली आहे. फेब्रुवारीमध्ये बिलिंग डिमांड ७,७८५ कोटी रुपये होती. मार्च महिन्यात उन्हाळा वाढल्याने यात वाढ अपेक्षित होती. परंतु ती केवळ ६,१७० कोटी इतकीच राहिली. याप्रकारे एकाच महिन्यात १६२५ कोटी रुपयाची कमतरता नोंदविण्यात आली. याउपर वीज बिलाचे कलेक्शन ५०८५ कोटी रुपयेच झाले. एप्रिल व मे महिन्यात १६ हजार कोटी रुपयाची डिमांड अपेक्षित होती, परंतु केवळ ६,८४० कोटी रुपये होती. त्यातही बिलाची वसुली केवळ २०७० कोटी रुपयेच झाली. अशा परिस्थितीत वीज ग्राहकांवर विजेची एकूण थकबाकी ४२ हजार कोटीवर पोहोचली आहे. यात नागपूर विभागाचा वाटा ७,९३० कोटी रुपये इतका आहे.फेडरेशनचे म्हणणे आहे की, वीज बिलाद्वारे दरवर्षी ७६,००० कोटी रुपयाचा महसूल अपेक्षित असतो. लॉकडाऊनमुळे यात दोन हजार कोटीची कमतरता अपेक्षित आहे. परिस्थिती पाहता राज्य व केंद्र सरकारने महावितरणला दोन हजार कोटी रुपयाचे पॅकेज द्यायला हवे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजbillबिल