शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भिंतीला पाणी देत असलेल्या युवकाला विजेचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 23:03 IST

एका निर्माणाधीन इमारतीच्या भिंतीला पाणी देत असताना युवकाला विजेचा धक्का बसला. युवकाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना हसनबाग येथे गुरुवारी घडली.युवकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेसाठी निष्काळजीपणाही कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देनागपूरच्या हसनबाग येथील घटना : निष्काळजीपणाही कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका निर्माणाधीन इमारतीच्या भिंतीला पाणी देत असताना युवकाला विजेचा धक्का बसला. युवकाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना हसनबाग येथे गुरुवारी घडली.युवकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेसाठी निष्काळजीपणाही कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.हसनबाग मोठी मशीद जवळ रजा परिवार यांच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. प्रत्यक्षदर्शीनुसार गुरुवारी सकाळी हुसैन रजा (२६) हा युवक नव्या इमारतीच्या भिंतीला पाणी देत होता. विजेच्या वाहिनी तेथून फार दूर नव्हती. त्यामुळे पाणीचा वाहिनीला स्पर्श झाला. यामुळे हुसैन रजाला जोरदार विजेचा धक्का बसला. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर युवकाला दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हुसैन रजाचे मोठे भाऊ अमजद रजा यांच्यानुसार इमारतीचे बांधकाम सुरु करण्यापूर्वी १० जानेवारी रोजी एसएनडीएलला पत्र पाठवून एलटी लाईनमुळे धोका होण्याची शंका व्यक्त केली होती. त्यांनी तेव्हा स्पष्ट केले होते, की ही लाईन खूप खाली आहे. त्याच्याशी अनेक तार जुळलेले आहेत. त्यामुळे कधीही अपघात होऊ शकतो. त्याचप्रकारचे एक पत्र स्थानिक नगरसेवक व मनपाचे विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी एसएनडीएलच्या पारडी सबस्टेशनच्या अभियंत्यांनाही लिहिले होते. विजेची लाईन रजा कुटुंबाच्या घरापासून खूप जवळ असल्याने अपघात होऊ शकतो, असे पत्रात लिहिले होते. अमजद रजा यांचे म्हणणे आहे की, हे पत्र लिहिल्यानंतरही एसएनडीएलने कुठलीही कारवाई केली नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी सुद्धा केली नाही. यामुळेच आज हा अपघात घडला.प्रकरणाची चौकशी करूवीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनी एसएनडीएलचे म्हणणे आहे की, हसनबाग परिसरात मोठ्या प्रमाणावर जुनी विजेची लाईन आहे. एखाद्या ग्राहकाच्या मागणीवरून कंपनी लाईन हटवू शकत नाही. यासाठी इलेक्ट्रीकल इनस्पेक्टरची परवानगी घेणे बंधनकारक असते. कंपनीचे म्हणणे आहे की, लाईनमध्ये एबी केबल लागलेला आहे, अशा परिस्थितीत विजेचा धक्का बसण्याचा धोका नसतो. त्यामुळे दुसऱ्या लाईनमधून विजेचा धक्का बसू शकतो. कंपनीतर्फे घटनास्थळावर चमू पाठवून या प्रकरणाची चौकशी केली जाईल.नागरिकांनीही धडा घ्यावाउच्च न्यायालयाने सुगतनगर प्रकरणात या परिसरातील ११ केव्ही मॉडेल मिल फीडरला धोकादायक परिसर घोषित करून बांधकामावर बंदी घातली आहे. दुसरीकडे हसनबाग येथे अनेक नागरिक वीज वितरण प्रणालीसह खेळत आहेत. अनेक ठिकाणी विजेच्या खांबाभोवतीच बांधकाम करण्यात आले आहे. या घटनेतून नागरिकांनीही धडा घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Deathमृत्यूelectricityवीज