शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

‘फिक्स चार्ज’ बिघडवणार विजेचे बिल; महावितरणच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 10:25 IST

राज्यातील वीज ग्राहकांनी आणखी एका दरवाढीसाठी तयार राहावे. ही वाढ किती राहील हे राज्यातील विद्युत नियामक आयोगाच्या निर्णयावर अवलंबून आहे. यासंदर्भात आयोगासमोर महावितरणची याचिका विचाराधीन आहे.

ठळक मुद्दे१०० युनिटपर्यंत वापरानंतर लागणार अतिरिक्त ७५ रुपये

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील वीज ग्राहकांनी आणखी एका दरवाढीसाठी तयार राहावे. ही वाढ किती राहील हे राज्यातील विद्युत नियामक आयोगाच्या निर्णयावर अवलंबून आहे. यासंदर्भात आयोगासमोर महावितरणची याचिका विचाराधीन आहे. सध्या या प्रस्तावाबाबत दोन मतप्रवाह आहेत. महावितरणचे म्हणणे आहे की, त्यांनी जास्तीतजास्त १५ टक्क्यांपर्यंत वीज दरवाढीची मंजुरी मागितली आहे. परंतु ‘फिक्स चार्जेस’(स्थायी शुल्क) मध्ये प्रस्तावित दरवाढीला आधार बनवण्यात आले तर ही दरवाढ कितीतरी अधिक होईल.दावे-प्रतिदाव्यांमध्ये नियामक आयोग राज्यातील प्रत्येक विभागीय मुख्यालयात जनसुनावणी करून नागरिकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. याअंतर्गत मंगळवारी शहरातील वनामती सभागृहात सकाळी १० वाजेपासून जनसुनावणी होणार आहे. महावितरणने केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी केवळ ८ पैसे प्रति युनिट दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. ही दरवाढ ८३ पैसे प्रति युनिट इतकी राहील. कारण महावितरणने फिक्स चार्जेस (स्थायी शुल्क) वाढवून ६५ रुपयावरून १४० रुपये प्रति महिना करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना ७५ रुपये अधिक द्यावे लागेल. त्याचप्रकारे मोठ्या उद्योगांसाठी ९ पैसे प्रति युनिटची दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. परंतु महावितरणने यातही स्थायी शुल्क २७० केव्हीएवरून वाढवून ५५ रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. जर आयोगाने याला मंजूर केले तर १६ टक्के दरवाढ होईल. यासोबतच उद्योगांना प्रोत्साहन सवलत देण्याचा ‘फॉर्म्युला’ही बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत यासाठी ‘केव्हीए बिलिंग’ यालाच आधार बनवले जात होते. परंतु आता यासाठी केडब्ल्यूएला आधार बनवण्याची महावितरणची इच्छा आहे. अशावेळी या क्षेत्रातील माहिती असलेल्यांच्या दाव्यानुसार वास्तविक दरवाढ २३ टक्के इतकी होईल.

दर नव्हे उत्पन्न वाढवण्यावर भर द्याऊर्जा क्षेत्रातील विशेषज्ज्ञ महेंद्र जिचकार यांचे म्हणणे आहे की, नागरिकांवर आर्थिक भार टाकणे योग्य नाही. कंपनीला स्वत:चे महसूल नुकसानीची भरपाई करण्यासाठी उत्पन्न वाढवण्यावर भर द्यायला हवे. वीज दरांमध्ये वाढ करण्यापेक्षा कंपनीने वीजचोरी कशी थांबले यावर भर द्यायला हवा. यासोबतच थकीत वसुलीवरही लक्ष केंद्रित करायला हवे. असे झाले तर कंपनीला उत्पन्न वाढवण्यासाठी ग्राहकांवर बोजा टाकण्याची गरज पडणार नाही.

महावितरणच्या याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे

  • प्रति वर्ष ३४,६४६ कोटी रुपयांचे महसूल नुकसान
  • नवीन उद्योगांना १ रुपये प्रति युनिटची सूट
  • १०० युनिटपर्यंत वापर केल्यास ८ पैसे दरवाढ
  • फिक्स चार्जेसमध्ये दरवाढ करण्याचा प्रस्ताव
  • राज्यातील १.२० कोटी ग्राहकांवर होणार परिणाम
  •  
  • अन्य राज्यांच्या तुलनेत स्थायी शुल्क कमी

महावितरण कंपनीने दावा केला आहे की, भारनियमन काळापासून आजवर कंपनीने कधीही स्थायी शुल्कात वाढ केलेली नाही. पहिल्यांदाच या शुल्कात वाढ केली जात आहे. त्यानतंरही अन्य राज्यांच्या तुलनेत हे शुल्क कमीच राहणार आहे. कंपनीचा असाही दावा आहे की, दिल्लीत ० ते १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांकडून स्थायी शुल्क स्वरूपात २५० रुपये घेतले जातात. तर महावितरणने या श्रेणीतील ग्राहकांकडून १४० रुपये शुल्क घेण्याचा प्रस्ताव दिला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण