शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

‘फिक्स चार्ज’ बिघडवणार विजेचे बिल; महावितरणच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 10:25 IST

राज्यातील वीज ग्राहकांनी आणखी एका दरवाढीसाठी तयार राहावे. ही वाढ किती राहील हे राज्यातील विद्युत नियामक आयोगाच्या निर्णयावर अवलंबून आहे. यासंदर्भात आयोगासमोर महावितरणची याचिका विचाराधीन आहे.

ठळक मुद्दे१०० युनिटपर्यंत वापरानंतर लागणार अतिरिक्त ७५ रुपये

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील वीज ग्राहकांनी आणखी एका दरवाढीसाठी तयार राहावे. ही वाढ किती राहील हे राज्यातील विद्युत नियामक आयोगाच्या निर्णयावर अवलंबून आहे. यासंदर्भात आयोगासमोर महावितरणची याचिका विचाराधीन आहे. सध्या या प्रस्तावाबाबत दोन मतप्रवाह आहेत. महावितरणचे म्हणणे आहे की, त्यांनी जास्तीतजास्त १५ टक्क्यांपर्यंत वीज दरवाढीची मंजुरी मागितली आहे. परंतु ‘फिक्स चार्जेस’(स्थायी शुल्क) मध्ये प्रस्तावित दरवाढीला आधार बनवण्यात आले तर ही दरवाढ कितीतरी अधिक होईल.दावे-प्रतिदाव्यांमध्ये नियामक आयोग राज्यातील प्रत्येक विभागीय मुख्यालयात जनसुनावणी करून नागरिकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. याअंतर्गत मंगळवारी शहरातील वनामती सभागृहात सकाळी १० वाजेपासून जनसुनावणी होणार आहे. महावितरणने केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांसाठी केवळ ८ पैसे प्रति युनिट दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. ही दरवाढ ८३ पैसे प्रति युनिट इतकी राहील. कारण महावितरणने फिक्स चार्जेस (स्थायी शुल्क) वाढवून ६५ रुपयावरून १४० रुपये प्रति महिना करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना ७५ रुपये अधिक द्यावे लागेल. त्याचप्रकारे मोठ्या उद्योगांसाठी ९ पैसे प्रति युनिटची दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. परंतु महावितरणने यातही स्थायी शुल्क २७० केव्हीएवरून वाढवून ५५ रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. जर आयोगाने याला मंजूर केले तर १६ टक्के दरवाढ होईल. यासोबतच उद्योगांना प्रोत्साहन सवलत देण्याचा ‘फॉर्म्युला’ही बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत यासाठी ‘केव्हीए बिलिंग’ यालाच आधार बनवले जात होते. परंतु आता यासाठी केडब्ल्यूएला आधार बनवण्याची महावितरणची इच्छा आहे. अशावेळी या क्षेत्रातील माहिती असलेल्यांच्या दाव्यानुसार वास्तविक दरवाढ २३ टक्के इतकी होईल.

दर नव्हे उत्पन्न वाढवण्यावर भर द्याऊर्जा क्षेत्रातील विशेषज्ज्ञ महेंद्र जिचकार यांचे म्हणणे आहे की, नागरिकांवर आर्थिक भार टाकणे योग्य नाही. कंपनीला स्वत:चे महसूल नुकसानीची भरपाई करण्यासाठी उत्पन्न वाढवण्यावर भर द्यायला हवे. वीज दरांमध्ये वाढ करण्यापेक्षा कंपनीने वीजचोरी कशी थांबले यावर भर द्यायला हवा. यासोबतच थकीत वसुलीवरही लक्ष केंद्रित करायला हवे. असे झाले तर कंपनीला उत्पन्न वाढवण्यासाठी ग्राहकांवर बोजा टाकण्याची गरज पडणार नाही.

महावितरणच्या याचिकेतील महत्त्वाचे मुद्दे

  • प्रति वर्ष ३४,६४६ कोटी रुपयांचे महसूल नुकसान
  • नवीन उद्योगांना १ रुपये प्रति युनिटची सूट
  • १०० युनिटपर्यंत वापर केल्यास ८ पैसे दरवाढ
  • फिक्स चार्जेसमध्ये दरवाढ करण्याचा प्रस्ताव
  • राज्यातील १.२० कोटी ग्राहकांवर होणार परिणाम
  •  
  • अन्य राज्यांच्या तुलनेत स्थायी शुल्क कमी

महावितरण कंपनीने दावा केला आहे की, भारनियमन काळापासून आजवर कंपनीने कधीही स्थायी शुल्कात वाढ केलेली नाही. पहिल्यांदाच या शुल्कात वाढ केली जात आहे. त्यानतंरही अन्य राज्यांच्या तुलनेत हे शुल्क कमीच राहणार आहे. कंपनीचा असाही दावा आहे की, दिल्लीत ० ते १०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांकडून स्थायी शुल्क स्वरूपात २५० रुपये घेतले जातात. तर महावितरणने या श्रेणीतील ग्राहकांकडून १४० रुपये शुल्क घेण्याचा प्रस्ताव दिला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण