शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

नागपूरसह पाचही जिल्हा परिषदांची निवडणूक घ्या : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 20:55 IST

कार्यकाळ संपलेल्या नागपूर, अकोला, वाशीम, धुळे व नंदूरबार जिल्हा परिषद आणि त्यांतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीपुढील अडथळे दीर्घ काळानंतर शुक्रवारी दूर झाले. सर्वोच्च न्यायालयाने या पाचही जिल्हा परिषदा व संबंधित पंचायत समित्यांची एक महिन्यात निवडणूक घेण्यात यावी असा आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिला. त्यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. याशिवाय न्यायालयाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवर तडकाफडकी प्रशासकांची नियुक्ती केल्यामुळे राज्य सरकारची प्रशंसा केली.

ठळक मुद्देप्रशासकांची नियुक्ती केल्यामुळे सरकारची प्रशंसा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कार्यकाळ संपलेल्या नागपूर, अकोला, वाशीम, धुळे व नंदूरबार जिल्हा परिषद आणि त्यांतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीपुढील अडथळे दीर्घ काळानंतर शुक्रवारी दूर झाले. सर्वोच्च न्यायालयाने या पाचही जिल्हा परिषदा व संबंधित पंचायत समित्यांची एक महिन्यात निवडणूक घेण्यात यावी असा आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिला. त्यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. याशिवाय न्यायालयाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांवर तडकाफडकी प्रशासकांची नियुक्ती केल्यामुळे राज्य सरकारची प्रशंसा केली.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय अजय खानविलकर व दिनेश माहेश्वरी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. या जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपला आहे. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिलेल्या अंतरिम आदेशामुळे या जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांची निवडणूक थांबवून ठेवण्यात आली होती. ही बाब गेल्या १० जुलै रोजी निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने परखड निरीक्षण नोंदवून राज्य सरकारला फटकारले होते. राज्यघटनेनुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच निवडणूक घेणे आवश्यक आहे. निवडणूक कोणत्याही कारणामुळे बेमुदत काळाकरिता पुढे ढकलली जाऊ शकत नाही. तसेच, जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ संपल्यास प्रशासकाची नियुक्ती करायला पाहिजे असे मत त्या आदेशात नोंदविण्यात आले होते. त्यानंतर राज्य सरकारने वेगवान हालचाली करून १८ जुलै रोजी प्रशासकांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तो आदेश रेकॉर्डवर घेतला व निवडणुकीला हिरवी झेंडी दाखवली.यामुळे लांबली निवडणूकमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम १२(२)(सी) मधील तरतुदीच्या वैधतेला आणि नागपूर, अकोला व वाशीम जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिका प्रलंबित आहेत. या कलममध्ये इतर मागासवर्गाला २७ टक्के आरक्षण देण्याची तरतूद आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील आरक्षण ५० टक्क्यांवर जाते. ही तरतूद राज्यघटनेतील २४३-डी, २४३-टी व १४ व्या आर्टिकलचे आणि ‘के. कृष्णमूर्ती व इतर वि. केंद्र सरकार व इतर’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे उल्लंघन करणारी आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यास मनाई केली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने यासोबत धुळे व नंदुरबार जिल्हा परिषदेचीही निवडणूक थांबवून ठेवली होती.

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयzpजिल्हा परिषदElectionनिवडणूक